शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब बागा जगविण्यासाठी पावसाळ्यातही टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:44 IST

संगेवाडी परिसर : नीरा उजवा कालव्याचे पाणीच मिळाले नाही

सांगोला : नीरा उजवा कॅनॉलचे पाणी न मिळाल्याने संगेवाडीसह परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकºयांकडून ऐन पावसाळ्यातही डाळिंब बागांना टँकरने पाणीपुरवठा करून बागा जगविल्या जात आहेत. 

संगेवाडी, मांजरी, शिरभावी, धायटी, मेथवडे, देवकतेवाडी, हलदहिवडी या भागात डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. नीरा उजवा कालव्याचे पाणी उन्हाळा हंगामात मिळाले नव्हते. ऐन पावसाळ्यातही अद्याप नीरा उजवा कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे डाळिंब बागा सुकून जाऊ लागल्या आहेत. सांगोला तालुक्यातील सर्वात कमी पावसाची नोंद संगेवाडी मंडलमध्ये झाली आहे. यामुळे डाळिंब बागा जगविण्यासाठी शेतकºयांना विकतचे टँकरने पाणी आणून बागांना द्यावे लागत आहेत.

ज्या शेतकºयांकडे मोठी तळी आहेत, अशा शेतकºयांच्या बागा सध्या सुस्थितीत आहेत, परंतु ज्यांना शेततळी नाहीत, अशा डाळिंब उत्पादक शेतकºयांना बागा जगविणे मुश्कील बनले आहे. खडकाळ जमिनीमध्ये असलेल्या डाळिंब बागांना सतत पाणी द्यावे लागत आहे. एका छोट्या-मोठ्या टँकरसाठी शेतकरी २२०० ते २५०० रुपये देऊन विकतचे पाणी घेत आहेत. शेतकरी आपल्या शेतात छोटासा खड्डा घेऊन त्यामध्ये ते कागद टाकून टँकरचे पाणी साठवून ठेवून ते पाणी विद्युत मोटारीने बागांना देत आहेत.

टॅँकरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही- विहिरी व विंधन विहिरी कोरड्या पडल्याने शेतकºयांना सध्या बागा जगविण्यासाठी टँकरच्या पाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. काही शेतकºयांनी पाऊस पडेल या आशेवर डाळिंबाचा बहर धरला आहे. मात्र पाऊस नसल्याने या परिसरातील पशुधन छावणीवर असून बहरलेल्या बागा सुकू लागल्या आहेत. बागांना नीरा उजवा कॅनॉलचे पाणी मिळेपर्यंत जगविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी ऐन पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करून बागा जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पाऊस पडेल या आशेवर मी डाळिंबाचा बहार धरला आहे. सध्या विहीर व बोअर कोरडे पडल्याने मला कॅनॉलचे पाणी येईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. एका टँकरसाठी २५०० रुपये द्यावे लागत आहेत.- सोपान खंडागळेडाळिंब उत्पादक शेतकरी, संगेवाडी

नीरा उजवा कालव्याच्या पाण्याचे राजकारण सोडून नियमानुसार टेल टू हेड पाणी दिले असते तर या भागातील नागरिकांवर पाणीसंकट ओढवले नसते. उन्हाळ्यातही पाणी मिळाले नव्हते. सध्या तरी कॅनॉलचे लवकर पाणी सोडावे.- आप्पासोा खंडागळेडाळिंब उत्पादक शेतकरी

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकFarmerशेतकरीagricultureशेतीdroughtदुष्काळ