शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

डाळिंब बागा जगविण्यासाठी पावसाळ्यातही टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:44 IST

संगेवाडी परिसर : नीरा उजवा कालव्याचे पाणीच मिळाले नाही

सांगोला : नीरा उजवा कॅनॉलचे पाणी न मिळाल्याने संगेवाडीसह परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकºयांकडून ऐन पावसाळ्यातही डाळिंब बागांना टँकरने पाणीपुरवठा करून बागा जगविल्या जात आहेत. 

संगेवाडी, मांजरी, शिरभावी, धायटी, मेथवडे, देवकतेवाडी, हलदहिवडी या भागात डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. नीरा उजवा कालव्याचे पाणी उन्हाळा हंगामात मिळाले नव्हते. ऐन पावसाळ्यातही अद्याप नीरा उजवा कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे डाळिंब बागा सुकून जाऊ लागल्या आहेत. सांगोला तालुक्यातील सर्वात कमी पावसाची नोंद संगेवाडी मंडलमध्ये झाली आहे. यामुळे डाळिंब बागा जगविण्यासाठी शेतकºयांना विकतचे टँकरने पाणी आणून बागांना द्यावे लागत आहेत.

ज्या शेतकºयांकडे मोठी तळी आहेत, अशा शेतकºयांच्या बागा सध्या सुस्थितीत आहेत, परंतु ज्यांना शेततळी नाहीत, अशा डाळिंब उत्पादक शेतकºयांना बागा जगविणे मुश्कील बनले आहे. खडकाळ जमिनीमध्ये असलेल्या डाळिंब बागांना सतत पाणी द्यावे लागत आहे. एका छोट्या-मोठ्या टँकरसाठी शेतकरी २२०० ते २५०० रुपये देऊन विकतचे पाणी घेत आहेत. शेतकरी आपल्या शेतात छोटासा खड्डा घेऊन त्यामध्ये ते कागद टाकून टँकरचे पाणी साठवून ठेवून ते पाणी विद्युत मोटारीने बागांना देत आहेत.

टॅँकरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही- विहिरी व विंधन विहिरी कोरड्या पडल्याने शेतकºयांना सध्या बागा जगविण्यासाठी टँकरच्या पाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. काही शेतकºयांनी पाऊस पडेल या आशेवर डाळिंबाचा बहर धरला आहे. मात्र पाऊस नसल्याने या परिसरातील पशुधन छावणीवर असून बहरलेल्या बागा सुकू लागल्या आहेत. बागांना नीरा उजवा कॅनॉलचे पाणी मिळेपर्यंत जगविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी ऐन पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करून बागा जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पाऊस पडेल या आशेवर मी डाळिंबाचा बहार धरला आहे. सध्या विहीर व बोअर कोरडे पडल्याने मला कॅनॉलचे पाणी येईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. एका टँकरसाठी २५०० रुपये द्यावे लागत आहेत.- सोपान खंडागळेडाळिंब उत्पादक शेतकरी, संगेवाडी

नीरा उजवा कालव्याच्या पाण्याचे राजकारण सोडून नियमानुसार टेल टू हेड पाणी दिले असते तर या भागातील नागरिकांवर पाणीसंकट ओढवले नसते. उन्हाळ्यातही पाणी मिळाले नव्हते. सध्या तरी कॅनॉलचे लवकर पाणी सोडावे.- आप्पासोा खंडागळेडाळिंब उत्पादक शेतकरी

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकFarmerशेतकरीagricultureशेतीdroughtदुष्काळ