शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

सोलापूर जिल्ह्यातील पाणीपातळी सव्वादोन मीटरने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 11:06 AM

अरुण बारसकरसोलापूर: जिल्ह्यात यावर्षी सरासरी ४०. ७१ टक्के इतकाच पाऊस पडला असल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी २.२८ मीटरने खाली गेली आहे. वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयाने आॅक्टोबरमधील पाणी पातळीच्या मोजणीत पातळी ६.७० मीटरने खाली गेल्याचे स्पष्ट झाले असून, पाणी टंचाईची तीव्रता वाढल्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत.जिल्ह्यातील १५६ निरीक्षण विहिरींंची पाणीपातळी वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयामार्फत ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील १०० गावांतील खरीप पिकांच्या परिस्थितीचा अंदाज घेतलापर्जन्यमान घटल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी खोलवर गेलीउजनी धरण वगळता अन्य तलावांतील पाणीसाठे शून्यावर

अरुण बारसकरसोलापूर: जिल्ह्यात यावर्षी सरासरी ४०. ७१ टक्के इतकाच पाऊस पडला असल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी २.२८ मीटरने खाली गेली आहे. वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयाने आॅक्टोबरमधील पाणी पातळीच्या मोजणीत पातळी ६.७० मीटरने खाली गेल्याचे स्पष्ट झाले असून, पाणी टंचाईची तीव्रता वाढल्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत.

जिल्ह्यातील १५६ निरीक्षण विहिरींंची पाणीपातळी वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयामार्फत मोजणी केली जाते. वर्षातून जानेवारी, मार्च, मे व आॅक्टोबर असे चार वेळा पाणीपातळी मोजून त्याचा अहवाल शासनाला सादर केला जातो. यावरच पाणी नियोजन केले जाते. मे महिन्यात पाऊस पडण्याअगोदर व आॅक्टोबरमध्ये पाऊस पडल्यानंतर मोजणी केलेली पाणीपातळी महत्त्वाची समजली जाते. यावर्षी जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने वरिष्ठ भू- वैज्ञानिक कार्यालयाच्या पाणीपातळी अहवालावर प्रशासनाला पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे. मागील पाच वर्षांच्या पाणी पातळीचा विचार केला असता  सरासरीआॅक्टोबर महिन्यात ४.४२ मीटर पाणीपातळी होती. यावर्षीची आॅक्टोबर महिन्यात निरीक्षण विहिरींची पाणीपातळी ६.७० मीटर खाली गेली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेचा विचार केला असता यावर्षी २.२८ मीटरने पाणीपातळी खोलवर गेली आहे.

बार्शी तालुक्यात ६१ टक्के, माळशिरस तालुक्यात ४८ टक्के, दक्षिण तालुक्यात ४२ टक्के, सांगोला व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी ४१ टक्के, मोहोळ तालुक्यात ४० टक्के, उत्तर सोलापूर तालुक्यात ३९ टक्के, मंगळवेढा तालुक्यात ३७ टक्के, अक्कलकोट तालुक्यात ३६ टक्के, माढा तालुक्यात ३२ तर करमाळा तालुक्यात २८ टक्के पाऊस पडला आहे. 

सर्वच तालुक्यांची पाणीपातळी वजा- मागील वर्षी आॅक्टोबर महिन्याची पाणीपातळी वरती (अधिक) आली होती. यावर्षी मात्र सर्वच तालुक्यांची पाणीपातळी वजा झाली आहे. २०१७ मध्ये(जून ते सप्टेंबर) ४८८.८ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होता, प्रत्यक्षात ४१५.३ मि.मी. तर ८५ टक्के पाऊस पडला होता. यावर्षी ४८८.८३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना १९९.०२ मि.मी. म्हणजे ४०.७१ मि.मी. पाऊस पडला आहे.

यावर्षी पर्जन्यमान घटल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी खोलवर गेली आहे. सरासरी ४० टक्के पाऊस पडल्याची नोंद असली तरी अनेक भागात यापेक्षा कमी पाऊस पडला आहे. आमचा अहवाल जिल्हाधिकारी व वरिष्ठ कार्यालयाला दिला आहे.- मुश्ताक शेख, वरिष्ठ भू-वैज्ञानिक सोलापूर 

उजनी धरण वगळता अन्य तलावांतील पाणीसाठे शून्यावर आहेत. लहान-मोठे तलावही कोरडे आहेत. आता पशुधन जगविणे व नागरिकांना पिण्यासाठीच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. उजनी धरण भरले असले तरी सर्वांना पाणी मिळेल याची दक्षता घेण्याची गरज आहे.- राजन पाटील, माजी आमदार, सोलापूर 

जिल्ह्यातील १०० गावांतील खरीप पिकांच्या परिस्थितीचा अंदाज घेतला आहे. या १०० गावांतील पिकांची परिस्थिती आॅनलाईन भरण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक उद्या(रविवारी) करणार आहेत. - बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :Solapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती