शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सोलापुरात पाणीटंचाई; आता २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:23 IST

सोलापूर : शहर पाणीपुरवठ्याचा महत्त्वपूर्ण स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा दोन दिवसांत कोरडा पडणार आहे. टाकळी इनटेकमधील ...

ठळक मुद्देदक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा दोन दिवसांत कोरडा पडणार टाकळी इनटेकमधील जलसाठा पाहता २५ मार्चपर्यंत पाणी पुरेल अशी शक्यताउजनी धरणातून १५ मार्चपर्यंत पाणी सोडण्यात यावे, असे तिसरे स्मरणपत्र मनपा प्रशासनाकडून जलसंपदा विभागाला

सोलापूर : शहर पाणीपुरवठ्याचा महत्त्वपूर्ण स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा दोन दिवसांत कोरडा पडणार आहे. टाकळी इनटेकमधील जलसाठा पाहता २५ मार्चपर्यंत पाणी पुरेल अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून १५ मार्चपर्यंत पाणी सोडण्यात यावे, असे तिसरे स्मरणपत्र मंगळवारी मनपा प्रशासनाकडून जलसंपदा विभागाला देण्यात येणार आहे. 

उजनी धरणातून १५ जानेवारीला औज बंधाºयासाठी पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी २१ जानेवारीपर्यंत औज बंधाºयात पोहोचले. हे पाणी १० एप्रिलपर्यंत पुरेल, अशी आशा होती. परंतु, कर्नाटक हद्दीतून दररोज ७० एमएलडी पाण्याचा बेकायदेशीर उपसा सुरू झाला. तो रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने कर्नाटक प्रशासनाशी संपर्क करावा, असे महापालिका प्रशासनाने कळविले होते. पण जलसंपदा विभागाने हात वर केले. यामुळे औज बंधाºयातील पाणी लवकर कमी झाले.

पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी औज बंधाºयात ०.६५ मीटर पाणी होते. बंधाºयातील पाणी टाकळी इनटेकमध्ये घेण्यात आले आहे. टाकळी इनटेकमध्ये ११ फूट पाणी आहे. हे पाणी २५ मार्चपर्यंत पुरेल, अशी आशा आहे. यादरम्यानच्या काळात १५ मार्चपर्यंत उजनीतून पाणी सोडण्यात यावे. हे पाणी २१ मार्चपर्यंत औज बंधाºयात येईल, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रशासनाने यापूर्वी ५ फेब्रुवारी आणि १८ फेब्रुवारीला पत्र पाठविले आहे. मंगळवारी तिसरे स्मरणपत्र पाठविले जाईल. 

बेकायदेशीर पाणी उपशाचा बंदोबस्त कोण करणार?- महापालिका औज बंधाºयातून दररोज ९० एमएलडी पाणी उपसा करते तर कर्नाटक हद्दीतून दररोज ७० एमएलडी पाणी उपसा होतो. जलसंपदा विभागाने पाण्याच्या संरक्षणासाठी पावले उचलावीत, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्यात शहराला जादा पाणी लागते. मार्चनंतर पुन्हा मे महिन्यात उजनीतून पाणी सोडण्याची मागणी होती. सध्या उजनीची पाणीपातळी खालावत आहे. एप्रिल महिन्यात बेकायदेशीर पाणी उपसा न रोखल्यास शहरावर जलसंकट ओढावणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई