शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात पाणीटंचाई; आता २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:23 IST

सोलापूर : शहर पाणीपुरवठ्याचा महत्त्वपूर्ण स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा दोन दिवसांत कोरडा पडणार आहे. टाकळी इनटेकमधील ...

ठळक मुद्देदक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा दोन दिवसांत कोरडा पडणार टाकळी इनटेकमधील जलसाठा पाहता २५ मार्चपर्यंत पाणी पुरेल अशी शक्यताउजनी धरणातून १५ मार्चपर्यंत पाणी सोडण्यात यावे, असे तिसरे स्मरणपत्र मनपा प्रशासनाकडून जलसंपदा विभागाला

सोलापूर : शहर पाणीपुरवठ्याचा महत्त्वपूर्ण स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा दोन दिवसांत कोरडा पडणार आहे. टाकळी इनटेकमधील जलसाठा पाहता २५ मार्चपर्यंत पाणी पुरेल अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून १५ मार्चपर्यंत पाणी सोडण्यात यावे, असे तिसरे स्मरणपत्र मंगळवारी मनपा प्रशासनाकडून जलसंपदा विभागाला देण्यात येणार आहे. 

उजनी धरणातून १५ जानेवारीला औज बंधाºयासाठी पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी २१ जानेवारीपर्यंत औज बंधाºयात पोहोचले. हे पाणी १० एप्रिलपर्यंत पुरेल, अशी आशा होती. परंतु, कर्नाटक हद्दीतून दररोज ७० एमएलडी पाण्याचा बेकायदेशीर उपसा सुरू झाला. तो रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने कर्नाटक प्रशासनाशी संपर्क करावा, असे महापालिका प्रशासनाने कळविले होते. पण जलसंपदा विभागाने हात वर केले. यामुळे औज बंधाºयातील पाणी लवकर कमी झाले.

पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी औज बंधाºयात ०.६५ मीटर पाणी होते. बंधाºयातील पाणी टाकळी इनटेकमध्ये घेण्यात आले आहे. टाकळी इनटेकमध्ये ११ फूट पाणी आहे. हे पाणी २५ मार्चपर्यंत पुरेल, अशी आशा आहे. यादरम्यानच्या काळात १५ मार्चपर्यंत उजनीतून पाणी सोडण्यात यावे. हे पाणी २१ मार्चपर्यंत औज बंधाºयात येईल, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रशासनाने यापूर्वी ५ फेब्रुवारी आणि १८ फेब्रुवारीला पत्र पाठविले आहे. मंगळवारी तिसरे स्मरणपत्र पाठविले जाईल. 

बेकायदेशीर पाणी उपशाचा बंदोबस्त कोण करणार?- महापालिका औज बंधाºयातून दररोज ९० एमएलडी पाणी उपसा करते तर कर्नाटक हद्दीतून दररोज ७० एमएलडी पाणी उपसा होतो. जलसंपदा विभागाने पाण्याच्या संरक्षणासाठी पावले उचलावीत, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्यात शहराला जादा पाणी लागते. मार्चनंतर पुन्हा मे महिन्यात उजनीतून पाणी सोडण्याची मागणी होती. सध्या उजनीची पाणीपातळी खालावत आहे. एप्रिल महिन्यात बेकायदेशीर पाणी उपसा न रोखल्यास शहरावर जलसंकट ओढावणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई