शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवात सोलापूर शहरात पाणीटंचाई, नागरिकांचा ‘जागरण गोंधळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 10:41 IST

नियोजन बिघडले : दोन दिवसांत स्थिती सुधारेल, मनपा प्रशासनाचा दावा; वीजपुरवठ्यात समस्या

ठळक मुद्देदोन दिवसांत हा विस्कळीतपणा दूर होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केलाशहराच्या विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाअनेक भागात पाणीच न आल्याने तारांबळ

सोलापूर : ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पाण्यासाठी ‘जागरण’ करावे लागत असल्याने लोकप्रतिनिधींनी ‘गोंधळ’ सुरू केला आहे. दोन दिवसांत हा विस्कळीतपणा दूर होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. 

उजनी आणि टाकळी पंपहाऊसमधील वीज पुरवठा मागील बुधवारी १२ तासाहून अधिक वेळ खंडित झाला होता. पंपहाऊसमधील वीज पुरवठा तासभर खंडित झाला की, शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळा किमान चार तासांनी पुढे जातात. घटस्थापनेपूर्वी शहरातील नागरिक घराच्या स्वच्छतेची कामे हाती घेतात. अनेक भागात पाणीच न आल्याने तारांबळ झाली. पाच दिवसांपासून विडी घरकूल, जुळे सोलापूर, शेळगी आदी भागात पाणीच न आल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.

बुधवारी सकाळी ११ वा.च्या दरम्यान साखरपेठ, भद्रावती पेठ, दाजीपेठ, अक्कलकोट रोड, जुळे सोलापूर या परिसरात पाणी सोडण्यात येईल, असे झोन कार्यालयांकडून सांगण्यात आले होते. साखरपेठेसह परिसरात सायंकाळी ४ नंतर पाणी सोडण्यात आले. मात्र कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. जुळे सोलापुरातील रजनी पार्क, गोकुळ नगर, ज्ञानेश्वर नगर, रुबी नगर, जगदंबा नगर, लक्ष्मी पार्क, नरसिंह नगर या भागातही पहाटे पाणी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, सायंकाळपर्यंत अनेक भागात पाणी आलेच नव्हते. झोन कार्यालयाकडे विचारणा केल्यानंतर धीर धरा, पाणी येईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले. 

पाणीपुरवठा उशिराने होईल, असे महापालिकेने जाहीर केले होते. मंगळवारी पहाटेपर्यंत अक्कलककोट रोड, विडी घरकूल भागातील नागरिक  पाणी येईल याची वाट पाहत होते. मंगळवारी पाणी आले, पण कमी दाबाने, त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला.- गुरुशांत धुत्तरगावकर,नगरसेवक, शिवसेना. 

 जुळे सोलापुरातील नागरिकांनी पहाटे ५.३० वाजल्यापासूनच पाणी कधी येईल, याबाबत विचारणा करायला सुरुवात केली होती. सणासुदीचे दिवस पाहून वेळेवर पाणी येईल, असे नियोजन करणे आवश्यक होते. पाणीच न आल्याने लोकांचा संताप अनावर होणे सहाजिकच आहे. - संगीता जाधव, नगरसेविका, भाजप. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीNavratriनवरात्री