शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

सोलापूर जिल्ह्यातील २१७ गावे अन् १४२५ वाड्यांवर पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 13:03 IST

झळा टंचाईच्या : पावणेपाच लाख लोकांची तहान भागतेय २४१ टँकरच्या पाण्यावर

ठळक मुद्देटँकरच्या पाण्यावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चपारदर्शकता व नियंत्रण आणण्यासाठी टँकरवर जीपीएस प्रणाली सुरू टँकरच्या खेपा व गावातील वस्तुस्थिती याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हाभरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने टँकरची मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ६२ हजार ९0९ लोकांची तहान सध्या टँकरच्या पाण्यावर भागत आहे. २४१ गावे तर १ हजार ४२५ वाड्यांना टँकरच्या पाण्याचा मोठा आधार झाला आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्यात १२ टँकर सुरू असून, ११ गावांतील ३५ हजार ९७0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.बार्शी तालुक्यात १0 टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावे व एका वाडीवरील १६ हजार ८0८ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय ४२ खासगी विंधन विहीर व विहीर अधिग्रहित करून टंचाई गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

दक्षिण सोलापूर तालुक्यात २२ टँकर सुरू करण्यात आले असून, १३ गावांतील ५८ हजार ५0६ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय १९ विंधन विहीर व विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे. अक्कलकोट तालुक्यात ११ टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावांतील १६ हजार ८0६ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. २0 विंधन विहीर व विहिरीचेही पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. 

माढा तालुक्यात १७ टँकर सुरू करण्यात आले असून, १४ गावे व २९ वाड्यांवरील ४१ हजार २७६ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय १४ विंधन विहिरी व विहीरही पाण्यासाठी अधिग्रहित करण्यात आले आहे. करमाळा तालुक्यात ४३ टँकर सुरू असून, ४३ गावे व ३३९ वाड्यांवरील ८८ हजार ८५७ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय १0 विंधन विहीर व विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. 

मोहोळ तालुक्यात १२ टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावे व ७४ वाड्यांवरील २५ हजार ५९0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय २ विहीर व विंधन विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे. मंगळवेढा तालुक्यात ५५ टँकर सुरू करण्यात आले असून, ४७ गावे व ५२३ वाड्यांवरील ८३ हजार ६00 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

सांगोला तालुक्यात ४८ टँकर सुरू करण्यात आले असून, ४३ गावे व ३२३ वाड्यांतील ६५ हजार २३२ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. माळशिरस तालुक्यात ११ टँकर सुरू असून, १३ गावे व १३६ वाड्यांवरील ३0 हजार २६४ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

टँकर फेºयांच्या तपासणीसाठी पथके - दुष्काळी परिस्थितीमुळे रोज टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. टँकरच्या पाण्यावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असल्याने यात पारदर्शकता व नियंत्रण आणण्यासाठी टँकरवर जीपीएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे टँकर गेला कोठे, थांबला कुठे याची माहिती अधिकाºयांना कार्यालयात बसून मिळत आहे. याशिवाय टँकरच्या खेपा व गावातील वस्तुस्थिती याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय