शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील २१७ गावे अन् १४२५ वाड्यांवर पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 13:03 IST

झळा टंचाईच्या : पावणेपाच लाख लोकांची तहान भागतेय २४१ टँकरच्या पाण्यावर

ठळक मुद्देटँकरच्या पाण्यावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चपारदर्शकता व नियंत्रण आणण्यासाठी टँकरवर जीपीएस प्रणाली सुरू टँकरच्या खेपा व गावातील वस्तुस्थिती याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हाभरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने टँकरची मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ६२ हजार ९0९ लोकांची तहान सध्या टँकरच्या पाण्यावर भागत आहे. २४१ गावे तर १ हजार ४२५ वाड्यांना टँकरच्या पाण्याचा मोठा आधार झाला आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्यात १२ टँकर सुरू असून, ११ गावांतील ३५ हजार ९७0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.बार्शी तालुक्यात १0 टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावे व एका वाडीवरील १६ हजार ८0८ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय ४२ खासगी विंधन विहीर व विहीर अधिग्रहित करून टंचाई गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

दक्षिण सोलापूर तालुक्यात २२ टँकर सुरू करण्यात आले असून, १३ गावांतील ५८ हजार ५0६ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय १९ विंधन विहीर व विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे. अक्कलकोट तालुक्यात ११ टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावांतील १६ हजार ८0६ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. २0 विंधन विहीर व विहिरीचेही पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. 

माढा तालुक्यात १७ टँकर सुरू करण्यात आले असून, १४ गावे व २९ वाड्यांवरील ४१ हजार २७६ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय १४ विंधन विहिरी व विहीरही पाण्यासाठी अधिग्रहित करण्यात आले आहे. करमाळा तालुक्यात ४३ टँकर सुरू असून, ४३ गावे व ३३९ वाड्यांवरील ८८ हजार ८५७ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय १0 विंधन विहीर व विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. 

मोहोळ तालुक्यात १२ टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावे व ७४ वाड्यांवरील २५ हजार ५९0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय २ विहीर व विंधन विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे. मंगळवेढा तालुक्यात ५५ टँकर सुरू करण्यात आले असून, ४७ गावे व ५२३ वाड्यांवरील ८३ हजार ६00 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

सांगोला तालुक्यात ४८ टँकर सुरू करण्यात आले असून, ४३ गावे व ३२३ वाड्यांतील ६५ हजार २३२ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. माळशिरस तालुक्यात ११ टँकर सुरू असून, १३ गावे व १३६ वाड्यांवरील ३0 हजार २६४ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

टँकर फेºयांच्या तपासणीसाठी पथके - दुष्काळी परिस्थितीमुळे रोज टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. टँकरच्या पाण्यावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असल्याने यात पारदर्शकता व नियंत्रण आणण्यासाठी टँकरवर जीपीएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे टँकर गेला कोठे, थांबला कुठे याची माहिती अधिकाºयांना कार्यालयात बसून मिळत आहे. याशिवाय टँकरच्या खेपा व गावातील वस्तुस्थिती याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय