शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील २१७ गावे अन् १४२५ वाड्यांवर पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 13:03 IST

झळा टंचाईच्या : पावणेपाच लाख लोकांची तहान भागतेय २४१ टँकरच्या पाण्यावर

ठळक मुद्देटँकरच्या पाण्यावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चपारदर्शकता व नियंत्रण आणण्यासाठी टँकरवर जीपीएस प्रणाली सुरू टँकरच्या खेपा व गावातील वस्तुस्थिती याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हाभरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने टँकरची मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ६२ हजार ९0९ लोकांची तहान सध्या टँकरच्या पाण्यावर भागत आहे. २४१ गावे तर १ हजार ४२५ वाड्यांना टँकरच्या पाण्याचा मोठा आधार झाला आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्यात १२ टँकर सुरू असून, ११ गावांतील ३५ हजार ९७0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.बार्शी तालुक्यात १0 टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावे व एका वाडीवरील १६ हजार ८0८ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय ४२ खासगी विंधन विहीर व विहीर अधिग्रहित करून टंचाई गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

दक्षिण सोलापूर तालुक्यात २२ टँकर सुरू करण्यात आले असून, १३ गावांतील ५८ हजार ५0६ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय १९ विंधन विहीर व विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे. अक्कलकोट तालुक्यात ११ टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावांतील १६ हजार ८0६ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. २0 विंधन विहीर व विहिरीचेही पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. 

माढा तालुक्यात १७ टँकर सुरू करण्यात आले असून, १४ गावे व २९ वाड्यांवरील ४१ हजार २७६ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय १४ विंधन विहिरी व विहीरही पाण्यासाठी अधिग्रहित करण्यात आले आहे. करमाळा तालुक्यात ४३ टँकर सुरू असून, ४३ गावे व ३३९ वाड्यांवरील ८८ हजार ८५७ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय १0 विंधन विहीर व विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. 

मोहोळ तालुक्यात १२ टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावे व ७४ वाड्यांवरील २५ हजार ५९0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय २ विहीर व विंधन विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे. मंगळवेढा तालुक्यात ५५ टँकर सुरू करण्यात आले असून, ४७ गावे व ५२३ वाड्यांवरील ८३ हजार ६00 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

सांगोला तालुक्यात ४८ टँकर सुरू करण्यात आले असून, ४३ गावे व ३२३ वाड्यांतील ६५ हजार २३२ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. माळशिरस तालुक्यात ११ टँकर सुरू असून, १३ गावे व १३६ वाड्यांवरील ३0 हजार २६४ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

टँकर फेºयांच्या तपासणीसाठी पथके - दुष्काळी परिस्थितीमुळे रोज टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. टँकरच्या पाण्यावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असल्याने यात पारदर्शकता व नियंत्रण आणण्यासाठी टँकरवर जीपीएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे टँकर गेला कोठे, थांबला कुठे याची माहिती अधिकाºयांना कार्यालयात बसून मिळत आहे. याशिवाय टँकरच्या खेपा व गावातील वस्तुस्थिती याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय