शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोहोळवर जलसंकट, पाणीसाठा उरला फक्त २० दिवसांपुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 15:38 IST

मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा आष्टे-कोळेगाव बंधारा यंदा मे महिन्यात कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्दे पावसाने पाठ फिरविल्याने परिसरातील विहिरी व बोअर आताच बंद पडू लागलेभविष्यात  शहरासह वाड्यावस्त्यांवर पाणी प्रश्न निर्माण होणार मोहोळ  शहराला सीना नदीवरील कोळेगाव बंधाºयातून पाणीपुरवठा होतो

अशोक कांबळे

मोहोळ : ४० ते ४५ हजार लोकसंख्या असणाºया मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा आष्टे-कोळेगाव बंधारा यंदा मे महिन्यात कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. दीड महिन्यात ३ मीटरने पाणी पातळी कमी झाली असून, उरलेला पाणीसाठा केवळ  २० दिवस पुरेल, एवढाच उरला आहे.

चालूवर्षी तालुक्यासह शहर परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने परिसरातील विहिरी व बोअर आताच बंद पडू लागले आहेत. भविष्यात  शहरासह वाड्यावस्त्यांवर पाणी प्रश्न निर्माण होणार आहे.  अशा परिस्थितीत ४० ते ४५ हजार लोकसंख्या असणाºया मोहोळ  शहराला सीना नदीवरील कोळेगाव बंधाºयातून पाणीपुरवठा होतो. बंधाºयात पाणी राहिले तरच शहराला पाणी मिळणार, अशी अवस्था शहराची आहे.

उजनी धरणातून मार्चच्या पहिल्या आठवड्यात केवळ मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून पाणी सोडण्यात आले होते. पाणी संथगतीने पोहोचले होते. बंधारा चार मीटरने भरला होता. परिसरातील वीजपुरवठा खंडितही केला आहे, परंतु चोरुन व सिंगल फेज लाईनवर चालणारे नवीन विद्युत पंप सर्वांकडे असल्याने नदी परिसरात रात्रंदिवस पाणी उपसा सुरु आहे. याकडे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. यामुळे बंधाºयातील पाणी दीड महिन्यातच तीन मीटरने कमी झाले आहे. आजमितीला एक मीटर इतकेच पाणी शिल्लक राहिले असून ते केवळ २० दिवस पुरेल इतकेच आहे.

मुख्याधिकारी म्हणतात, निवडणुकीमुळे दुर्लक्ष- याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन.के. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता,  मागील महिनाभरात महसूल विभागाने निवडणुकीसाठी नगरपरिषदेची सर्वच यंत्रणा गुंतविल्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडे दुर्लक्ष झाले. याशिवाय वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडण्याबाबत सहकार्य केले नाही. पाटबंधारे विभागाची ही कसलीच मदत मिळाली नसल्याने ही पाणी पातळी घटल्याचे ते म्हणाले. शिल्लक राहिलेल्या पाण्याबाबत तातडीने उपाययोजना करून हे पाणी पुरविण्याबाबत तातडीने उपाय योजना  करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोहोळ शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून सीना नदीद्वारे ५ मार्च २०१९ दरम्यान कोळेगाव बंधाºयात पाणी पोहोचले होते. चार मीटर क्षमतेने बंधारा भरून देण्याचे आम्ही काम केले आहे .- वाय.व्ही. पाटील कालवा निरीक्षक, पाटबंधारे विभाग, मोहोळ

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ