शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

मोहोळवर जलसंकट, पाणीसाठा उरला फक्त २० दिवसांपुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 15:38 IST

मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा आष्टे-कोळेगाव बंधारा यंदा मे महिन्यात कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्दे पावसाने पाठ फिरविल्याने परिसरातील विहिरी व बोअर आताच बंद पडू लागलेभविष्यात  शहरासह वाड्यावस्त्यांवर पाणी प्रश्न निर्माण होणार मोहोळ  शहराला सीना नदीवरील कोळेगाव बंधाºयातून पाणीपुरवठा होतो

अशोक कांबळे

मोहोळ : ४० ते ४५ हजार लोकसंख्या असणाºया मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा आष्टे-कोळेगाव बंधारा यंदा मे महिन्यात कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. दीड महिन्यात ३ मीटरने पाणी पातळी कमी झाली असून, उरलेला पाणीसाठा केवळ  २० दिवस पुरेल, एवढाच उरला आहे.

चालूवर्षी तालुक्यासह शहर परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने परिसरातील विहिरी व बोअर आताच बंद पडू लागले आहेत. भविष्यात  शहरासह वाड्यावस्त्यांवर पाणी प्रश्न निर्माण होणार आहे.  अशा परिस्थितीत ४० ते ४५ हजार लोकसंख्या असणाºया मोहोळ  शहराला सीना नदीवरील कोळेगाव बंधाºयातून पाणीपुरवठा होतो. बंधाºयात पाणी राहिले तरच शहराला पाणी मिळणार, अशी अवस्था शहराची आहे.

उजनी धरणातून मार्चच्या पहिल्या आठवड्यात केवळ मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून पाणी सोडण्यात आले होते. पाणी संथगतीने पोहोचले होते. बंधारा चार मीटरने भरला होता. परिसरातील वीजपुरवठा खंडितही केला आहे, परंतु चोरुन व सिंगल फेज लाईनवर चालणारे नवीन विद्युत पंप सर्वांकडे असल्याने नदी परिसरात रात्रंदिवस पाणी उपसा सुरु आहे. याकडे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. यामुळे बंधाºयातील पाणी दीड महिन्यातच तीन मीटरने कमी झाले आहे. आजमितीला एक मीटर इतकेच पाणी शिल्लक राहिले असून ते केवळ २० दिवस पुरेल इतकेच आहे.

मुख्याधिकारी म्हणतात, निवडणुकीमुळे दुर्लक्ष- याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन.के. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता,  मागील महिनाभरात महसूल विभागाने निवडणुकीसाठी नगरपरिषदेची सर्वच यंत्रणा गुंतविल्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडे दुर्लक्ष झाले. याशिवाय वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडण्याबाबत सहकार्य केले नाही. पाटबंधारे विभागाची ही कसलीच मदत मिळाली नसल्याने ही पाणी पातळी घटल्याचे ते म्हणाले. शिल्लक राहिलेल्या पाण्याबाबत तातडीने उपाययोजना करून हे पाणी पुरविण्याबाबत तातडीने उपाय योजना  करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोहोळ शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून सीना नदीद्वारे ५ मार्च २०१९ दरम्यान कोळेगाव बंधाºयात पाणी पोहोचले होते. चार मीटर क्षमतेने बंधारा भरून देण्याचे आम्ही काम केले आहे .- वाय.व्ही. पाटील कालवा निरीक्षक, पाटबंधारे विभाग, मोहोळ

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ