शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

चालण्याचा व्यायाम एकदम सोपा; तुमच्या हृदयाचा नक्की टळेल धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 16:08 IST

डॉक्टरही सांगतात वॉकिंग मस्ट ! : झपझप चालण्यामुळे तणाव होतो दूर

सोलापूर : पायी चालण्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. वेगात चालण्याने ताण दूर होतो, रुग्णालयात ॲडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते. डॉक्टर मंडळीही नेहमीच वॉकिंग करण्याचा सल्ला देत असतात.

सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत मिळून झोपही चांगली लागते.

मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते, चरबीचे प्रमाण कमी होते, संधीवाताचा त्रास कमी होऊ शकतो, पचनक्रिया सुधारते, पचनाचे विकार कमी होतात. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढते, नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते, पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळते.

 

रोज एक तास चालायला हवे पण ज्यांना एक तास देणे शक्य होत नाही त्यांनी अर्ध्या तासामध्ये किमान तीन किलोमीटर चालायला हवे. ह्रदयाची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी चालणे उत्तम आहे. एकाच स्थितीत जास्त वेळ काम करु नये, टेबल व खुर्चीची उंची योग्य असावी, झोपताना फार मऊ गादीवर झोपू नये.

- डॉ. अभिजित जगताप, अस्थिविकार तज्ज्ञ

बैठे कामाचे दुष्परिणाम

लॉकडाऊनमुळे अनेक लोक हे वर्क फ्रॉम होम करत होते. त्यात काही शिथिलता आली असली तरी अनेक लोक हे आत्ताही घरुनच काम करत आहेत. घरी असल्याने कामाचे तासही वाढले. तासनतास लोक लॅपटॉप, कॉम्प्युटरसमोर बसून राहत आहेत. यामुळे अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. मान आणि पाठदुखीची समस्या वाढत आहेत.

चाळीशी ओलांडली किमान अर्धा तास चाला

आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. रोजच्या व्यापामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे फार गरजेचे असते. चाळीशीनंतर दररोज किमान ३० मिनिटे चालायला हवे. सतत गाडी वापरण्यामुळे पायी चालणे अनेकजण जवळपास विसरूनच जातात. त्यामुळे काही पाऊले चाललो, तरी अनेकदा धाप लागते, असे होत असल्यास, हा शरीराने आपल्याला दिलेला इशारा असतो.

-----------

तरुणपणीच होतोय पाठदुखीचा त्रास

मागील दीड वर्षापासून घरुनच काम करत आहे. काम करत असताना सलग तीन ते चार तास बसून रहावे लागते. मधून थोडासा वेळ मिळत असला तरी तो अपुरा पडतो. त्यामुळे यामुळे पाठदुखीचा त्रास होत आहे.

- योगेश भाईकट्टी, सॉफ्टवेअर इंजिनिअर

घरुन काम करत असलो तरी ऑफिसमध्ये जितके काम करायचो त्यापेक्षा आता जास्त काम करावे लागत आहे. बाहेर फिरायला वेळ मिळत नाही. काम करताना काही त्रास जाणवत नसला तरी नंतर पाठ दुखते.

- चैतन्य गायकवाड, सॉफ्टवेअर इंजिनिअर

----------------

योगही आवश्यक

  • - पाठदुखीचा त्रास कमी करण्यासाठी योगासनाचा चांगला फायदा होतो.
  • - त्रिकोणासन, पवनमुक्तासन, कटिचक्रासन, अर्ध मत्सेंद्रासन, मार्जारी आसन, भुजंगासन आदी आसने फायदेशीर असतात.
  • - तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही आसने करावीत.
टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यYogaयोग