शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पंढरपूरातील विठ्ठल मूर्ती प्रतिष्ठापनेला ५११ वर्षे पूर्ण, आनंदोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 11:11 AM

प्रभू पुजारीपंढरपूर दि ४ : पैठण येथील संत श्री एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांनी कर्नाटकातील विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांच्याकडून अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठलाची मूर्ती शके १४२८ म्हणजे इ़ स. १५०६ साली पुन्हा पंढरपूरला आणली़ त्यानंतर संत भानुदास महाराज यांनीच विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या घटनेला ३१ आॅक्टोबर ...

ठळक मुद्देसंत भानुदास महाराज यांनीच विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलीपंढरपूरात आनंदोत्सव साजरावारकºयांनी श्री विठ्ठल मूर्तीची रथातून मिरवणूक काढली

प्रभू पुजारीपंढरपूर दि ४ : पैठण येथील संत श्री एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांनी कर्नाटकातील विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांच्याकडून अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठलाची मूर्ती शके १४२८ म्हणजे इ़ स. १५०६ साली पुन्हा पंढरपूरला आणली़ त्यानंतर संत भानुदास महाराज यांनीच विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या घटनेला ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी (शके १९३९ म्हणजे इ. स. २०१७ कार्तिकी एकादशीला) ५११ वर्षे पूर्ण झाली आहेत़ ‘नाममंत्र त्रिअक्षर, करी सदा तो उच्चार!विठ्ठलनामे सुख, आनंद भानुदासा परमानंद !’पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन आपण घेतो, त्याचे सर्व श्रेय जाते ते संत एकनाथांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांनाच़संत भानुदास महाराज यांचा जन्म इ. स. १४४८ साली एका ब्राह्मण कुळामध्ये झाला. बालपणीच त्यांनी सूर्यनारायणाची उपासना करून आशीर्वाद प्राप्त केले. शिवाय ते विठ्ठलभक्तही होते़ प्रपंच चालविण्यासाठी त्यांनी कपड्यांचा व्यापार सुरू केला. व्यापाराच्या व्यापात असूनही त्यांनी पंढरीची वारी कधीही चुकविली नाही. मात्र त्यांची त्याकाळी एक वेगळी ओळख निर्माण झाली ती एका ऐतिहासिक घटनेमुळे. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय पंढरीस आले होते़ श्री विठ्ठल मूर्तीस आपल्या राज्यात नेऊन प्रतिष्ठापना करावे, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी तसे केलेही. आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकºयांची दाटी होऊ लागली़ परंतु ज्यांच्या दर्शनासाठी आपण येथे आलो, त्या विठ्ठलाची मूर्ती पंढरीत नसल्याचे पाहून वारकरी व्याकूळ झाले़ विठ्ठलभक्तांची ही व्याकुळता पाहून संत भानुदास महाराजांनी सर्व वारकरी बांधवांना आश्वासन दिले की, मी विठ्ठल मूर्तीस पुन्हा पंढरीत आणीन. काही दिवसांनी संत भानुदास महाराज विठ्ठलाच्या दर्शनासाठी विजयनगरला गेले़ मध्यरात्री विठ्ठलासमोर येऊन उभे राहून दर्शन घेत होते, तेव्हा सद्भक्तासाठी विठ्ठलाने आपल्या गळ्यातील तुळशीच्या हारासह नवरत्नांचा हार संत भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला़ संत भानुदास महाराज तेथून बाहेर पडले. पहाटे काकड आरतीच्या वेळी जेव्हा पुजारी तेथे आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, देवाच्या गळ्यात नवरत्नांचा हार नाही. ही बातमी राजापर्यंत पोहोचली. जो कोणी चोर असेल त्यास परस्पर सुळावर चढविण्याचे फर्मान राजाने सोडले. सैनिक सर्वत्र त्या चोराचा शोध घेऊ लागले़ पहाटेच्या वेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी संत भानुदास महाराज स्नान करीत असताना एका सैनिकास त्यांच्या गळ्यात नवरत्नांचा हार दिसला. हाच चोर असावा असे गृहीत धरून सैनिकाने संत भानुदास महाराजांना बंदी बनविले. त्यांना सुळावर चढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भानुदासांच्या मुखातून अभंग प्रकटला़़़‘जै आकाश वर पडो पाहे! ब्रह्मगोळ भंगा जाये ! वडवानळं त्रिभूवन खाये ! तरी तुझीच वाट पाहे गां विठोबा !’ ज्या सुळावर त्यांना चढविण्यात येणार होते त्या सुळास पालवी फुटली. ही बातमी राजापर्यंत पोहोचली. राजाचा थरकाप उडाला, ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान सद्भक्त असावा हे त्यांच्या लक्षात आले.-----------------मूर्तीची रथातून मिरवणूकराजा कृष्णदेवराय यांनी संत भानुदास यांना श्री विठ्ठल मूर्ती घेऊन पंढरीस जाण्यास सांगितले़ पंढरी जवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकºयांनी श्री विठ्ठल मूर्तीची रथातून मिरवणूक काढली़ तो दिवस होता कार्तिकी शुद्ध एकादशी इ. स. १५०६ सालचा. या घटनेला यंदाच्या कार्तिकी एकादशीला ५११ वर्षे पूर्ण झाली़ संत भानुदास महाराजांनी आपली इहलोकीची यात्रा संपविल्यानंतर त्यांची समाधी श्रीविठ्ठल दर्शनास जाताना गरुड मंडपामध्ये बांधण्यात आली आहे़