शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

निवडणुकीच्या धामधुमीत साखर कारखान्यांच्या गाळपाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 20:13 IST

सोलापूर जिल्ह्यात राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत.

- समीर इनामदारसोलापूर: निवडणुकीच्या धामधुमीत साखर कारखान्यांच्या गाळपाचे संकट समोर राहिले आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका आहेत. त्याचवेळी नोव्हेंबरमध्ये साखर कारखान्यांच्या गाळपांना प्रारंभ होईल. बऱ्याचशा साखर कारखान्यांचे पदाधिकारी हे विविध पक्षाशी संबंधित असल्याने आणि ऊसाचीही कमतरता असल्याने साखर कारखान्यांचे गाळप कसे होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीत एफआरपी आणि थकीत कर्जवसुली हे मुद्दे असतील अशी अपेक्षा आहे.

सोलापूर जिल्ह्यात राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. गतवर्षी ३९ साखर कारखान्यांपैकी ३१ कारखाने सुरू होते. राज्यात १९५ साखर कारखाने सुरू होते. जिल्ह्याचे राजकारण हे साखर कारखान्यांभोवती फिरत असल्याने यंदा एफआरपी आणि थकीत साखर कारखान्यांची कर्ज वसुली याच मुद्दा विरोधकांकडे असणार आहे. यावर्षी बराचसा ऊस हा छावण्यांना गेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा ऊसाचे गाळप मोठ्या प्रमाणावर होणार नाही, अशी अपेक्षा आहे.

सांगली, कोल्हापूर या भागात आलेल्या पुराने उसाची कमतरता भासणार आहे. सोलापूर जिल्ह्यात यावर्षी उन्हाळ्यात चारा छावण्या सुरू होत्या. त्यामुळे ऊसाची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. त्यातच आता ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार असल्याने गाळपाच्या विषयाकडे फारशा गांभीर्याने पाहिले जाईल की नाही याबाबत शेतकरी शंका व्यक्त करीत आहेत.

गतवर्षी झालेल्या गाळपापैकी एफआरपी दिलेल्या साखर कारखान्यांनाच प्राधान्य दिले जाणार असल्याचे साखर आयुक्तांनी सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने संपूर्ण एफआरपी देऊ शकलेले नाहीत. अनेक साखर कारखान्यांची साखर पोती जप्त करण्यापर्यंत साखर आयुक्तालयाने पाऊल उचलले होते. काही साखर कारखान्यांची अवस्था बिकट असल्याने त्यांच्या अध्यक्षांनी पक्षांतर केली आहेत. त्याशिवाय पक्षांतर केल्याचा फायदा काही साखर कारखान्यांना झाला आहे. निवडणुकीत हे सारे मुद्दे आता समोर येतील.. 

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकSugar factoryसाखर कारखाने