शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

निवडणुकीच्या धामधुमीत साखर कारखान्यांच्या गाळपाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 20:13 IST

सोलापूर जिल्ह्यात राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत.

- समीर इनामदारसोलापूर: निवडणुकीच्या धामधुमीत साखर कारखान्यांच्या गाळपाचे संकट समोर राहिले आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका आहेत. त्याचवेळी नोव्हेंबरमध्ये साखर कारखान्यांच्या गाळपांना प्रारंभ होईल. बऱ्याचशा साखर कारखान्यांचे पदाधिकारी हे विविध पक्षाशी संबंधित असल्याने आणि ऊसाचीही कमतरता असल्याने साखर कारखान्यांचे गाळप कसे होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीत एफआरपी आणि थकीत कर्जवसुली हे मुद्दे असतील अशी अपेक्षा आहे.

सोलापूर जिल्ह्यात राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. गतवर्षी ३९ साखर कारखान्यांपैकी ३१ कारखाने सुरू होते. राज्यात १९५ साखर कारखाने सुरू होते. जिल्ह्याचे राजकारण हे साखर कारखान्यांभोवती फिरत असल्याने यंदा एफआरपी आणि थकीत साखर कारखान्यांची कर्ज वसुली याच मुद्दा विरोधकांकडे असणार आहे. यावर्षी बराचसा ऊस हा छावण्यांना गेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा ऊसाचे गाळप मोठ्या प्रमाणावर होणार नाही, अशी अपेक्षा आहे.

सांगली, कोल्हापूर या भागात आलेल्या पुराने उसाची कमतरता भासणार आहे. सोलापूर जिल्ह्यात यावर्षी उन्हाळ्यात चारा छावण्या सुरू होत्या. त्यामुळे ऊसाची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. त्यातच आता ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार असल्याने गाळपाच्या विषयाकडे फारशा गांभीर्याने पाहिले जाईल की नाही याबाबत शेतकरी शंका व्यक्त करीत आहेत.

गतवर्षी झालेल्या गाळपापैकी एफआरपी दिलेल्या साखर कारखान्यांनाच प्राधान्य दिले जाणार असल्याचे साखर आयुक्तांनी सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने संपूर्ण एफआरपी देऊ शकलेले नाहीत. अनेक साखर कारखान्यांची साखर पोती जप्त करण्यापर्यंत साखर आयुक्तालयाने पाऊल उचलले होते. काही साखर कारखान्यांची अवस्था बिकट असल्याने त्यांच्या अध्यक्षांनी पक्षांतर केली आहेत. त्याशिवाय पक्षांतर केल्याचा फायदा काही साखर कारखान्यांना झाला आहे. निवडणुकीत हे सारे मुद्दे आता समोर येतील.. 

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकSugar factoryसाखर कारखाने