शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

विकी गायकवाड खुन प्रकरण; अडीच महिन्यांपासून कुर्डूवाडीत सुरू होती धगधग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 17:04 IST

व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवरचे स्टेटस देत होते इशारे

ठळक मुद्देदोन गटातील संघर्ष अधिक तीव्रअंतर्गत वातावरण धगधगायला लागले

गोपालकृष्ण मांडवकरकुर्डूवाडी : माढा तालुक्यातील २५ हजार लोकसंख्येचे कुर्डूवाडी गाव विक्की गायकवाड या तरुणाच्या हत्येनंतर नव्याने चर्चेत आले आहे. एरव्ही नाकापुढचे सरळ जीवनमान कंठणाºया या गावातील सामंजस्याच्या वातावरणात विक्की गायकवाडच्या खुनामुळे तरंग उठले असले तरी वरवर शांत भासणाºया कुर्डूवाडीतील अंतस्थ आग या खुनानंतरही शमेल काय, याचे उत्तर येणारा काळच देऊ शकणार आहे. 

मृत विक्की गायकवाड हा मूळचा माळशिरसचा. मात्र मागील अनेक दिवसांपासून तो कुर्डूवाडीतील त्याचे मेहुणे अमर माने यांच्याकडे राहत होता. अमर माने यांचे कुर्डूवाडीत राजकीय वजन आहे. नगरपालिकेच्या स्थानिक राजकारणासोबतच पक्षीय राजकारणातही त्यांची ऊठबस आहे. राजकारणातील स्पर्धेत जवळच्यांची साथ हवी असते. २४ वर्षांचा विक्की मागील काही दिवसांपासून आपल्या मेहुण्यांच्या मदतीसाठी आणि एमपीएससीच्या अभ्यासासाठी कुर्डूवाडीतच राहायला आला होता. 

१७ जूनला झालेल्या खुनीहल्ल्यात विक्की गायकवाडची हत्या  (पान १ वरून) झाली. विक्की हा मूळचा कुर्डूवाडीचा नसल्याने स्थानिक पातळीवर या हत्येचे गंभीर पडसाद उमटलेले दिसत नाहीत. असे असले तरी स्थानिक पातळीवरील राजकारणातील सत्तासंघर्षातून आणि वर्चस्ववादातून ही हत्या घडली, हे मात्र तेवढेच खरे आहे. यामुळेच भविष्यात येथील वातावरण गढूळ होण्याचा धोका अधिक वाढला आहे.

९ एप्रिल २०१८ रोजी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यामध्ये शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान अमर माने यांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली होती. नेमक्या या मुद्यावरून बैठकीनंतर पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलिसांसमक्ष अमर माने आणि माणिक श्रीरामे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. या वादात विक्की गायकवाडही सहभागी होता. एकमेकांना पाहून घेण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. नेमक्या याच दिवशी सायंकाळी माणिक श्रीरामे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. माणिक श्रीरामे दोन दिवस बेशुद्धावस्थेत होते.

या घटनेत पोलिसांनी विक्की गायकवाड, अमर माने, त्यांचा भाऊ संतोष माने, अशफाक तौफिक आणि रवी आठवले यांच्यासह पाच जणांवर ३०७ अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक केली होती. त्यातील फरार असलेल्या रवी आठवले याला गुरुवारी २१ जूनला दुपारी पोलिसांनी अटक केली. केवळ विक्की आणि संतोष माने वगळता इतरांना जामीन न मिळाल्याने आजही सर्व जण कारागृहातच आहेत.

माणिक श्रीरामे यांच्यावर झालेल्या ९ एप्रिलच्या हल्ल्यापासूनच या दोन गटातील संघर्ष अधिक तीव्र झाला होता. अंतर्गत वातावरण धगधगायला लागले होते. श्रीरामे समर्थक असलेल्या काही तरुणांच्या एम.एस. नावाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचे स्टेटसही बदलले होते. ‘नाद करायचा नाय’, ‘नाद करा की राव, पण आमचा कुठं?’ असे स्टेटस असलेल्या या ग्रुपवरचे संदेशही तेवढेच भडक असायचे. एवढेच नाही तर, विक्कीच्या खुनातील आरोपी असलेल्या विनोद सोनवणे याच्या फेसबुकवरील पोस्टही मागील दोन महिन्यांत गर्भित इशारा देणाºया होत्या. या पोस्ट मागील दोन ते अडीच महिन्यांपासून सोशल मीडियावर फिरत होत्या. मात्र पोलिसांच्या सायबर सेलला आणि कुर्डूवाडीच्या ठाणेदारांना या बदललेल्या वातावरणाची दखल घेता आली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

‘त्या’ घटनेतील पाचवा आरोपी अटकेत- ९ एप्रिलच्या सायंकाळी माणिक श्रीरामे यांच्यावरील हल्लाप्रकरणी  ३०७ चा गुन्हा दाखल असलेला रवी आठवले हा पाचवा आरोपी घटनेच्या तब्बल अडीच महिन्यांनंतर पोलिसांना सापडला आहे. गुरुवारी २१ जूनला अचानकपणे पोलिसांना हा फरार आरोपी सापडल्याने जनतेला आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयापुढे हजर करून २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. 

अमर मानेंचा जामिनासाठी अर्ज

  • - ९ एप्रिलला झालेल्या माणिक श्रीरामेवरील हल्लाप्रकरणी कारागृहात असलेले अमर माने यांनी न्यायालयाकडे        जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. या अर्जावर २१ जूनला सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने जामिनाचा अर्ज फेटाळला. 
  • - माणिक श्रीरामे यांच्यावर झालेल्या ९ एप्रिलच्या हल्ल्यापासूनच या दोन गटातील संघर्ष अधिक तीव्र झाला होता.  श्रीरामे समर्थक असलेल्या काही तरुणांच्या एम.एस. नावाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचे स्टेटसही बदलले होते.
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrimeगुन्हाPoliceपोलिस