शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

अक्कलकोटसाठी उजनीचे पाणी ठरणार मृगजळच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 16:54 IST

रखडलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) मिळाली असली तरी उजनी धरणातील पाणी कुरनूर धरणात येण्यासाठी आणखी  वाट पाहावी लागणार आहे.

ठळक मुद्देकारंबा पंपहाऊसचे काम पूर्ण झाल्याशिवाय उजनीचे पाणी एकरुख तलावात येणार नाही‘सुप्रमा’ मिळाल्याचा आनंद औटघटकेचा ठरणार

नारायण चव्हाणसोलापूर : रखडलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) मिळाली असली तरी उजनी धरणातील पाणी कुरनूर धरणात येण्यासाठी आणखी  वाट पाहावी लागणार आहे. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी कारंबा पंपहाऊस अडथळा ठरणार आहे. या पंपहाऊसचे काम पूर्ण झाल्याशिवाय कुरनूर धरणात पाणी सोडणे शक्य नाही, असे जलसंपदा विभागाच्या सूत्राने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अक्कलकोटसाठी उजनीचे पाणी मृगजळच ठरणार असल्याचे दिसत आहे.

तब्बल नऊ वर्षे रखडलेल्या एकरुख आणि शिरापूर उपसा सिंचन योजनांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘सुप्रमा’ देऊन हिरवा कंदील दाखविला. ‘सुप्रमा’साठी गेली नऊ वर्षे राजकीय नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र या योजना विविध स्तरावर अडकत राहिल्या. जलसंपदा खात्याने प्रस्ताव दिल्यानंतर नाशिकच्या ‘मेरी’ या संस्थेत पाच वर्षे फाईल धूळखात पडून राहिली. कथित सिंचन घोटाळा हे त्यामागचे कारण असल्याचे सांगितले जात होते. संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘सुप्रमा’ मिळेल, अशी आशा निर्माण झाली आणि घडलेही तसेच. उच्चाधिकार समितीने शिफारस केल्यानंतर एकरुखची फाईल अर्थखात्याकडे पाच महिने पडून राहिली. सोमवारी अर्थमंत्र्यांनी या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली.

एकरुख योजनेचे बहुतांश काम पूर्णत्वास आल्याने ‘सुप्रमा’ मिळताच तीन महिन्यांत योजना कार्यान्वित होईल, अशी स्थिती असल्याचे पूर्वी सांगण्यात आले होते; मात्र उजनी धरणातून एखरुख तलावात पाणी आणणाºया कारंबा पंपहाऊसचे काम अर्धवट स्थितीत आहे. पूर्वी सदोष काम झाल्याने ते थांबविण्यात आले होते. या कामावर साडेतीन कोटींचा खर्चही झाला; पण ते पैसे पाण्यात गेले. आता नव्याने अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया आदी सोपस्कार सुरू झाले आहेत. कारंबा पंपहाऊसचे काम पूर्ण झाल्याशिवाय उजनीचे पाणी एकरुख तलावात येणार नाही. त्यामुळे ‘सुप्रमा’ मिळाल्याचा आनंद औटघटकेचा ठरणार, अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

भीमा प्रकल्पाची सुप्रमा रखडली- एकरुख उपसा सिंचन योजना ही स्वतंत्र असल्याने ‘सुप्रमा’ मिळताच ती तातडीने पूर्ण करण्याची घाई प्रशासनाला लागली आहे; पण भीमा-उजनी प्रकल्पांतर्गत येणाºया कारंबा पंपहाऊसचे काम मूळ प्रकल्पाला तृतीय प्रशासकीय मान्यता अद्याप मिळालेली नाही. भीमा प्रकल्पाची अद्ययावत किंमत सन २०१५-१६ च्या दरसूचीनुसार २२५० कोटी आहे. तीन वर्षांनंतर त्यात भर पडणार आहे. आता भीमा (उजनी) प्रकल्पाची ‘सुप्रमा’ अडल्याने कारंबा पंपहाऊसच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या तरी कार्यारंभ आदेश मिळणार नाही, ही मोठी अडचण ठरणार आहे. गेले तीन महिने राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे प्रकल्प अहवाल पडून आहे. छाननीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येते. या प्रकल्पाला सुप्रमा मिळाली तरच एकरुख योजना कार्यान्वित होणार आहे.

कारंबा पंपहाऊसविषयी...- उजनी धरणातील पाणी कारंबा शाखा कालव्याद्वारे एकरुख तलावात येते; पण तलाव्याच्या प्रारंभी कालव्याची खोली अधिक आणि एकरुख तलाव उंचावर असल्याने कालव्यातील पाणी तलावात येऊ शकत नाही. त्यासाठी नवीन डिझाईनचे दरवाजे आणि कालव्यातून पाण्याचा उपसा करून तलावात सोडण्यासाठी कारंबा पंपहाऊस उभारणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षांपासून कारंबा पंपहाऊसच्या निविदा प्रक्रियेची चर्चा असली तरी प्रत्यक्षात या कामाला गती नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीUjine Damउजनी धरण