शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या पाण्याचा प्रश्न पोहोचला मुख्यमंत्र्यांपर्यंत; महापौर शोभा बनशेट्टी यांनी पाठविले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:28 IST

सोलापूर : औज बंधारा कोरडा पडून पाच दिवस झाले. जलसंपदा विभाग उजनी धरणातून पाणी सोडण्यास विलंब लावीत आहे. या ...

ठळक मुद्देऔज बंधारा हा शहराच्या पाणीपुरवठ्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एकबंधाºयातून टाकळी इनटेकमध्ये पाणी घेतले जातेटाकळी इनटेकमध्ये सध्या २५ मार्चपर्यंत पुरेल इतके पाणी

सोलापूर : औज बंधारा कोरडा पडून पाच दिवस झाले. जलसंपदा विभाग उजनी धरणातूनपाणी सोडण्यास विलंब लावीत आहे. या विषयात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी महापौर शोभा बनशेट्टी यांनी केली आहे. 

औज बंधारा हा शहराच्या पाणीपुरवठ्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. या बंधाºयातून टाकळी इनटेकमध्ये पाणी घेतले जाते. टाकळी इनटेकमध्ये सध्या २५ मार्चपर्यंत पुरेल इतके पाणी आहे. उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी औज बंधाºयापर्यंत पोहोचण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. उजनीतून १५ मार्चपर्यंत पाणी सोडावे, असे पत्र महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाला दिले आहे. जानेवारी महिन्यात सोडलेले पाणी १० एप्रिलपर्यंत पुरवावे, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला सांगितले होते. पण कर्नाटक हद्दीतून बेसुमार उपसा झाल्याने औज बंधाºयातील पाणी लवकर संपले. 

सध्या उजनीतून कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. तोपर्यंत भीमा नदीत पाणी सोडता येणार नसल्याची अडचण जलसंपदा विभागाने सांगितली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी नुकतेच लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले होते, पण कार्यवाही झालेली नाही. 

विरोधकांनी मनपामध्ये केला होता गोंधळ 

-शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि उजनी धरणातून लवकर पाणी सोडावे, या मागणीसाठी काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी गुुरुवारी सकाळी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या कार्यालयात घोषणाबाजी केली होती. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास सोलापूर बंद करू, असा इशाराही देण्यात आला होता. पण या विषयाचे राजकारण करू नका, आम्ही पाठपुरावा करीत आहोत, असे महापौर बनशेट्टी यांनी सांगितले. यादरम्यान, महापौर बनशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास लोक नाराज होतील. त्यामुळे जलसंपदा विभागाला पाणी सोडण्याबाबत तत्काळ आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. 

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार महापालिकेने औज बंधाºयातील पाणी १० एप्रिलपर्यंत पुरविणे अपेक्षित होते, पण त्यांनी पाण्याचे संरक्षण केले नाही. सध्या कालव्यांमधून सिंचनासाठी पाणी सोडलेले आहे. शेतकºयांची गरज महत्त्वाची आहे. हे पाणी बंद करून भीमा नदीत पाणी सोडावे लागेल, पण आम्ही लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. - धीरज साळेअधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस