शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

उजनीच्या पाण्याचा प्रश्न पोहोचला मुख्यमंत्र्यांपर्यंत; महापौर शोभा बनशेट्टी यांनी पाठविले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:28 IST

सोलापूर : औज बंधारा कोरडा पडून पाच दिवस झाले. जलसंपदा विभाग उजनी धरणातून पाणी सोडण्यास विलंब लावीत आहे. या ...

ठळक मुद्देऔज बंधारा हा शहराच्या पाणीपुरवठ्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एकबंधाºयातून टाकळी इनटेकमध्ये पाणी घेतले जातेटाकळी इनटेकमध्ये सध्या २५ मार्चपर्यंत पुरेल इतके पाणी

सोलापूर : औज बंधारा कोरडा पडून पाच दिवस झाले. जलसंपदा विभाग उजनी धरणातूनपाणी सोडण्यास विलंब लावीत आहे. या विषयात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी महापौर शोभा बनशेट्टी यांनी केली आहे. 

औज बंधारा हा शहराच्या पाणीपुरवठ्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. या बंधाºयातून टाकळी इनटेकमध्ये पाणी घेतले जाते. टाकळी इनटेकमध्ये सध्या २५ मार्चपर्यंत पुरेल इतके पाणी आहे. उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी औज बंधाºयापर्यंत पोहोचण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. उजनीतून १५ मार्चपर्यंत पाणी सोडावे, असे पत्र महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाला दिले आहे. जानेवारी महिन्यात सोडलेले पाणी १० एप्रिलपर्यंत पुरवावे, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला सांगितले होते. पण कर्नाटक हद्दीतून बेसुमार उपसा झाल्याने औज बंधाºयातील पाणी लवकर संपले. 

सध्या उजनीतून कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. तोपर्यंत भीमा नदीत पाणी सोडता येणार नसल्याची अडचण जलसंपदा विभागाने सांगितली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी नुकतेच लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले होते, पण कार्यवाही झालेली नाही. 

विरोधकांनी मनपामध्ये केला होता गोंधळ 

-शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि उजनी धरणातून लवकर पाणी सोडावे, या मागणीसाठी काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी गुुरुवारी सकाळी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या कार्यालयात घोषणाबाजी केली होती. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास सोलापूर बंद करू, असा इशाराही देण्यात आला होता. पण या विषयाचे राजकारण करू नका, आम्ही पाठपुरावा करीत आहोत, असे महापौर बनशेट्टी यांनी सांगितले. यादरम्यान, महापौर बनशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास लोक नाराज होतील. त्यामुळे जलसंपदा विभागाला पाणी सोडण्याबाबत तत्काळ आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. 

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार महापालिकेने औज बंधाºयातील पाणी १० एप्रिलपर्यंत पुरविणे अपेक्षित होते, पण त्यांनी पाण्याचे संरक्षण केले नाही. सध्या कालव्यांमधून सिंचनासाठी पाणी सोडलेले आहे. शेतकºयांची गरज महत्त्वाची आहे. हे पाणी बंद करून भीमा नदीत पाणी सोडावे लागेल, पण आम्ही लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. - धीरज साळेअधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस