शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने भिजलेला वीस ट्रक कांदा सडला, विक्रीविना पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 14:25 IST

सोलापूर बाजार समिती; नासलेल्या कांद्याची सोलापूर बाजार समितीत दुर्गंधी

ठळक मुद्देसध्या चांगल्या कांद्याला सोलापूर बाजार समितीत चांगला दरजुन्या व यावर्षीच्या गुणवत्तेच्या कांद्याला राज्यात सर्वाधिक दरकांदा पिकात पाणी व काढणीनंतरही पाऊस पडत असल्याने कांदा खराब

सोलापूर : पावसाने भिजलेला कांदा घाईघाईने विक्रीसाठी आणला जात आहे; मात्र असा कांदा नासू लागल्याने विक्री होत नाही. अशा १५ ते २० ट्रक कांद्याची विक्रीच बुधवारी झाली नाही. भिजलेल्या कांद्याला अल्पसा दर मिळत असल्याने शेतकºयांना हात हलवत परत जावे लागत आहे.

सध्या चांगल्या कांद्याला सोलापूर बाजार समितीत चांगला दर मिळत आहे. जुन्या व यावर्षीच्या गुणवत्तेच्या कांद्याला राज्यात सर्वाधिक दर सोलापूर बाजार समितीत मिळत आहे. असे असल्यानेच शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी आणण्याची एकच घाई सुरू केली आहे; मात्र कांदा पिकात पाणी व काढणीनंतरही पाऊस पडत असल्याने कांदा खराब होत आहे. यातील बरा वाटणारा कांदा शेतकरी विक्रीसाठी आणत आहेत; मात्र काढणी केलेला कांदा वाळण्यासाठी टाकला की पाऊस येतो व झाकावा लागतो. हा कांदा पोत्यात भरून वाहनाने सोलापूरला आणल्यानंतर उतरताना आदळ-आपट होते.  याशिवाय पोत्यात भरल्यानंतर गुदमरुन कांदा खराब होतो.  असा खराब झालेला कांदा बाजार समितीत खरेदी करण्यासाठी व्यापारी तयार नाहीत. 

मंगळवारी व बुधवारी अशा १५ ते २० ट्रक कांद्याची विक्री झाली नाही. काही कांद्याची विक्री झाली; मात्र खरेदीदारांनी कांदा उचललाच नसल्याचे सांगण्यात आले.  कांदा शेडमध्ये विविध ठिकाणी पडलेला दिसून आला. काही शेतकरी विक्री न झाल्याने कांदा परत घेऊन गेले. 

विक्री झाली नसल्याने कांदा गावाकडे..सातोले (ता. करमाळा) येथील एका तीन एकरातील काढलेला २२५ पिशवी कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता; मात्र हा कांदा विक्रीच झाला नाही. हा कांदा शेतकºयाने परत नेला. कांदा लागणीपासून बाजार समितीतून परत घेऊन जाईपर्यंत दीड लाख रुपये खर्च झाल्याचे त्या शेतकºयाने सांगितले. 

दोन एकर कांदा लागवड केली होती. त्यापैकी एक एकर कांद्याची काढणी केली. निवडून चांगला आहे असा २० पिशव्या कांदा विक्रीसाठी आणला. कांदा पिकासाठी संपूर्ण कुटुंब राबले व इतर १० हजार रुपये खर्च झाला. अल्पसा दर मिळाल्याने खर्चही निघाला नाही.- सुधाकर शिंदे, शेतकरी ढवळस 

दीड एकर कांदा काढणीनंतर चांगला म्हणून ५० पिशव्या निघाल्या. त्या तीन दिवस उन्हात टाकून विक्रीसाठी आणल्या. भाडे, हमाली, कांदा काढणी व कांदा जोपासण्यासाठी केलेला खर्चही निघाला नाही. कुटुंब चालवायचे कसे?,हा प्रश्न आहे.- शिवाजी ठोंबरे, शेतकरी ढवळस

पावसात भिजलेला कांदा विक्री होत नाही. तो नासून जातोे. असा कांदा शेतकºयांनी विक्रीसाठी आणू नये. पोत्यात भरताना चांगला दिसणारा कांदा बाजार समितीत येईपर्यंत खराब होतो. शेतकºयांनी काढणीपासूनचा खर्च करून कांदा विक्रीसाठी आणू नये.- केदार उंबरजे, अडते

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीonionकांदाRainपाऊस