शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टाटा, कोयनाचे पाणी सोलापूरकडे वळवा; सर्वपक्षीय गटनेत्यांचा महापालिकेच्या सभेसमोर प्रस्ताव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 14:29 IST

सोलापूर : राज्य शासनाने टाटांच्या ताब्यात असलेली धरणे आणि सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वळविण्यास मंजुरी द्यावी, ...

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वळविण्यास मंजुरी द्यावीकिसान आर्मीचे प्रमुख प्रफुल्ल कदम गेल्या काही वर्षांपासून टाटांच्या ताब्यातील धरणांचे पाणी सोलापूर जिल्ह्यात वळवावे यासाठी पाठपुरावामहापालिका सभेच्या पुरवणी प्रस्तावात सर्वपक्षीय गटनेत्यांनी शासनाला विनंती करणारा प्रस्ताव मांडला

सोलापूर : राज्य शासनाने टाटांच्या ताब्यात असलेली धरणे आणि सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वळविण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव सर्वपक्षीय गटनेत्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा २८ जानेवारी रोजी होणार आहे. किसान आर्मीचे प्रमुख प्रफुल्ल कदम गेल्या काही वर्षांपासून टाटांच्या ताब्यातील धरणांचे पाणी सोलापूर जिल्ह्यात वळवावे यासाठी पाठपुरावा करीत आहेत. या चळवळीला पाठबळ देण्यासाठी महापालिका सभेच्या पुरवणी प्रस्तावात सर्वपक्षीय गटनेत्यांनी शासनाला विनंती करणारा प्रस्ताव मांडला आहे.

यात म्हटले आहे, टाटा कंपनीने लोणावळा, वळवण, शिरवटा, सोमवडी, ठोकरवाडी, मुळशी या सहा धरणांमध्ये कृष्णा खोºयातील तुटीच्या खोºयातील ४८.९७ टीएमसी पाणी अडविले आहे. या पाण्यावर ते भिरा, भिवपुरी, खोपोली या ठिकाणी वीजनिर्मिती करुन मुंबई शहराला वीज विक्री करीत आहेत. टाटा कंपनीचा पाणी व्यवहार राज्याच्या जलनितीच्या धोरणाप्रमाणे नाही. जलकायद्याच्या विद्युत कायद्याच्या, पर्यावरणाच्या आणि विशेष म्हणजे राज्य घटनेच्या कलम ३८ व ३९ च्या तरतुदीप्रमाणे नाही. वीजनिर्मितीला इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोलापूर शहर हे सतत दुष्काळी, तुटीच्या खोºयात आहे. त्याचाही विचार व्हावा.

उजनीचे पाणी अस्वच्छ म्हणून...- सोलापूरला उजनी धरणातून पिण्याचे पाणी मिळत आहे. उजनीतील पाणी अत्यंत धोकादायक आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. टाटांच्या ताब्यातील धरणांचे पाणी स्वच्छ व चांगले आहे. उजनी धरणातील पाण्यासाठी दुहेरी पाईपलाईनची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. टाटा व कोयना धरणातील पाणी सोलापूर शहरासाठी मंजूर झाल्यास पाणी उताराने आणणे शक्य होणार आहे. सध्या पंपिंगद्वारे पाणी उचलण्याचा विजेचा मोठा खर्च वाचणार आहे. नैसर्गिक हक्काचे पाणी सोलापूर शहराला मिळावे अशी मागणी आम्ही करीत आहोत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाTataटाटाUjine Damउजनी धरण