शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

टाटा, कोयनाचे पाणी सोलापूरकडे वळवा; सर्वपक्षीय गटनेत्यांचा महापालिकेच्या सभेसमोर प्रस्ताव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 14:29 IST

सोलापूर : राज्य शासनाने टाटांच्या ताब्यात असलेली धरणे आणि सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वळविण्यास मंजुरी द्यावी, ...

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वळविण्यास मंजुरी द्यावीकिसान आर्मीचे प्रमुख प्रफुल्ल कदम गेल्या काही वर्षांपासून टाटांच्या ताब्यातील धरणांचे पाणी सोलापूर जिल्ह्यात वळवावे यासाठी पाठपुरावामहापालिका सभेच्या पुरवणी प्रस्तावात सर्वपक्षीय गटनेत्यांनी शासनाला विनंती करणारा प्रस्ताव मांडला

सोलापूर : राज्य शासनाने टाटांच्या ताब्यात असलेली धरणे आणि सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वळविण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव सर्वपक्षीय गटनेत्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा २८ जानेवारी रोजी होणार आहे. किसान आर्मीचे प्रमुख प्रफुल्ल कदम गेल्या काही वर्षांपासून टाटांच्या ताब्यातील धरणांचे पाणी सोलापूर जिल्ह्यात वळवावे यासाठी पाठपुरावा करीत आहेत. या चळवळीला पाठबळ देण्यासाठी महापालिका सभेच्या पुरवणी प्रस्तावात सर्वपक्षीय गटनेत्यांनी शासनाला विनंती करणारा प्रस्ताव मांडला आहे.

यात म्हटले आहे, टाटा कंपनीने लोणावळा, वळवण, शिरवटा, सोमवडी, ठोकरवाडी, मुळशी या सहा धरणांमध्ये कृष्णा खोºयातील तुटीच्या खोºयातील ४८.९७ टीएमसी पाणी अडविले आहे. या पाण्यावर ते भिरा, भिवपुरी, खोपोली या ठिकाणी वीजनिर्मिती करुन मुंबई शहराला वीज विक्री करीत आहेत. टाटा कंपनीचा पाणी व्यवहार राज्याच्या जलनितीच्या धोरणाप्रमाणे नाही. जलकायद्याच्या विद्युत कायद्याच्या, पर्यावरणाच्या आणि विशेष म्हणजे राज्य घटनेच्या कलम ३८ व ३९ च्या तरतुदीप्रमाणे नाही. वीजनिर्मितीला इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोलापूर शहर हे सतत दुष्काळी, तुटीच्या खोºयात आहे. त्याचाही विचार व्हावा.

उजनीचे पाणी अस्वच्छ म्हणून...- सोलापूरला उजनी धरणातून पिण्याचे पाणी मिळत आहे. उजनीतील पाणी अत्यंत धोकादायक आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. टाटांच्या ताब्यातील धरणांचे पाणी स्वच्छ व चांगले आहे. उजनी धरणातील पाण्यासाठी दुहेरी पाईपलाईनची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. टाटा व कोयना धरणातील पाणी सोलापूर शहरासाठी मंजूर झाल्यास पाणी उताराने आणणे शक्य होणार आहे. सध्या पंपिंगद्वारे पाणी उचलण्याचा विजेचा मोठा खर्च वाचणार आहे. नैसर्गिक हक्काचे पाणी सोलापूर शहराला मिळावे अशी मागणी आम्ही करीत आहोत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाTataटाटाUjine Damउजनी धरण