शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

श्रद्धांजली; मुलांसाठीही लिहिणाºया नाटककाराची एक्झिट वेदनादायी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:47 AM

रत्नाकर मतकरींचे निधन;  नाट्य, साहित्य क्षेत्रातून व्यक्त झाल्या शोकसंवेदना

सोलापूर : रत्नाकर मतकरी यांची प्राणज्योत रविवारी रात्री  मालवली. रत्नाकर मतकरी यांची १९५५ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी ‘वेडी माणसं’ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते. त्यांनी मराठीमध्ये बालसाहित्यापासून नाटकांपर्यंत विपुल साहित्य लेखन केले होते. मुलांसाठीही प्राधान्याने लिहिणाºया या श्रेष्ठ नाटककार, कथाकाराच्या निधनामुळे सोलापूरच्या नाट्य, साहित्यक्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.

प्रकाश यलगुलवार (अध्यक्ष, नाट्य परिषद): बालनाट्य चळवळीदरम्यान आमची रत्नाकर मतकरी यांच्याशी भेट झाली होती. रत्नाकरी मतकरी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. लेखक, नाटककार, रंगकर्मीसह ते बालनाट्य चळवळीतही रमले. त्यांच्या जाण्याचे या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

विजय साळुंके (अध्यक्ष, उपनगरीय शाखा) :  मी स्वत: त्यांच्या काही नाटकांचा प्रकाशयोजनाकार राहिलो आहे. मुंबई येथील एका स्पर्धेदरम्यान त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या नाटकांचे लेखन हे वास्तवाला धरून होते. बालनाट्याच्या चळवळीत त्यांचे मोठे कार्य आहे. या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली.

आनंद खरबस (सदस्य, अ. भा. नाट्य परिषद) : रत्नाकर मतकरी यांचे लेखन हे ज्वलंत प्रश्नावर असायचे. त्यांनी २५ वर्षांपूर्वी लिहिलेले नाटक आजही अनेकांना रंगभूमीवर आणावी वाटतात. ही नाटके रंगभूमीवर आली तर चांगली चालतील. नाटकात साहित्यिक भाषा न वापरता व्यावहारिक भाषा वापरायची. आमच्यासाठी ते आदर्श आहेत.

प्रा. दीपक देशपांडे (हास्यसम्राट) : मुंबई येथे १९७८ ला राज्य नाट्य स्पर्धा झाल्या होत्या. दोन तास एक नाटक असावे, असा तिथे नियम होता. रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेले नाटक दीड तासात संपले. तरी देखील नाट्य परीरक्षण करणाºयांनी या नाटकाला पहिले बक्षीस दिले. इतक्या ताकदीचे त्यांचे लिखाण होते.

गुरू वठारे (नेपथ्यकार) :  नागपूर येथे ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनामध्ये आमची भेट झाली. यादरम्यान प्रायोगिक रंगभूमी  विषयावर आमची चर्चा झाली.  बुकिंग कसे आहे, प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, याविषयी बोललो. त्यांनी लिहिलेले ‘अलबत्या        गलबत्या’ हे नाटक सोलापुरात तुफान चालले.

रत्नाकर मतकरी आणि सोलापूर- १९७५ नंतर नाट्य आराधनातर्फे खडकीकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर भयकथा सांगण्यासाठी आणखी एकदा ते सोलापुरात आले होते, अशी आठवण शशिकांत लावणीस यांनी सांगितली. त्यांची वैयक्तिक ओळख होती. त्यांनी लिहिलेल्या काही एकांकिका आम्ही सोलापुरात केल्या. ‘इन्व्हेस्टमेंट’ ही त्यांनी लिहिलेली कथा. या कथेवर राज्य नाट्य स्पर्धेत नाटक करायला परवानगी द्या, यासाठी आम्ही बोललो होतो. त्यावेळी त्या कथेवर चित्रपट निघत असल्याने आम्हाला परवानगी मिळाली नाही. त्यांच्या एकांकिका आम्ही केल्याने विविध स्पर्धेत आम्हाला बक्षिसे मिळाली, अशी आठवण शशिकांत लावणीस यांनी सांगितली.

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यू