शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

वाहतूक पोलीसांच्या वागणूकीमुळे सोलापुरात गाडीने येताना होतो त्रास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:04 IST

परराज्यातील भाविकांची सोलापूरकडे पाठ; शहरातील बाजारपेठेवर होतोय परिणाम

ठळक मुद्दे- परराज्यातील भाविकांची वाहतुक पोलीसांकडून अडवणूक- वाहनधारक सोलापूरात येण्यास नकार देतात- देवदर्शनासाठी येणाºया भाविकांच्या संख्येत होतेय घट

सोलापूर : मराठवाडा आणि शेजारील कर्नाटकातील जिल्ह्यांसाठी सोलापूर हे मोठे व्यापारी केंद्र आहे. या शहरात व्यापारी आणि ग्राहक खास गाडीने येऊन चादर, भुसार माल, कपडे, सोने - चांदीची दागिने खरेदी करतात; पण येताना त्यांची अडवणूक होते...याचा आम्हाला त्रास होत असल्याचे बाहेरील व्यापाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, देवदर्शनासाठी येणारे भाविकही आपल्या गावी परतताना सोलापूरला टाळून जातात. यामुळे येथील बाजारपेठेवर विपरीत परिणाम होतो.

काही व्यापारी आणि ग्राहकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, आता आम्ही सोलापुरात येऊन खरेदी करावी का? याचा विचार करतोय. गाडीतून येताना सर्व कागदपत्रे जवळ असली तरी आमची अडवणूक केली जाते; पण जर चुकून एखादे कागदपत्र नसले तर होणाºया त्रासाला मर्यादाच नसते. सकाळी सोलापुरात येऊन सायंकाळी गाडीत माल घेऊन जात असताना सर्वाधिक भीती वाटते. कारण गाडीमध्ये किंमती वस्तू असतात. या स्थितीत गाडी अडवली की, आमच्या शहरात पोहोचायला उशीर होतो. मार्गात असताना कुठे चोरांनी अडविले तर होणाºया नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

गंगाधर बिराजदार या व्यापाराने सांगितले की,  मी उमरग्याचा रहिवासी आहे, माझा कपड्याचा व्यवसाय आहे. मी खरेदीसाठी महिन्यातून एकदा माझ्या खासगी वाहनातून सोलापुरात येत असतो. येताना मला हैद्राबाद रोडवर अनेकवेळा अडवण्यात आले होते. कागदपत्रांची मागणी केली, लायसन्स विचारले, पीयूसी आहे का हे विचारले जाते. मी सोलापूरला येताना आता सर्व कागदपत्रे घेऊनच येत असतो; मात्र काही कारण सांगून वाहतूक शाखेचे पोलीस आम्हाला पावती करण्यास सांगतात. आम्ही धंदेवाईक माणसे आहोत, या झंजटमध्ये न पडता सरळ दंडाची पावती घेतो आणि निघून जातो. काही वेळेस दंडाची पावतीही दिली जात नाही. सोलापुरातून खरेदी करतो आणि पुन्हा आमच्या गावी निघून जातो. वाईट वाटते मात्र आम्ही सांगणार कोणाला? अशी खंत एका व्यापाºयाने व्यक्त केली.

सर्वकाही नियमात असतानाही आमच्याकडून दंड घेतला जातो. आमचा नाईलाज असतो, शेठजी आता तुमच्यापर्यंत आलो आहोत, आम्हाला विनाकारण दंड लावण्यात आला आहे. आता खरेदीमध्ये आम्हाला सूट द्या, नाहीतर पुढच्या वेळी आम्ही सोलापूरला येणार नाही. दुसरी बाजारपेठ शोधतो असे व्यापारी आम्हाला बोलतात अशी माहिती एका प्रसिद्ध कापड व्यापारी शंकरप्पा  कलशेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

व्यापारावर विपरीत परिणाम- शेजारील कर्नाटक आणि महाराष्टÑभरातून देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताना मार्गात गाडी तपासणीच्या नावाखाली अडवणूक केली; पण हे भाविक जेव्हा परततात तेव्हा ते सोलापूरला बायपास करून आपल्या शहराकडे जातात. यामुळे येथील चादरीच्या व्यापारावर विपरीत परिणाम झाला आहे. शिवाय लॉजेस् आणि हॉटेल्सचा व्यवसायही कमी झाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसtraffic policeवाहतूक पोलीसTravel Tipsट्रॅव्हल टिप्स