शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आजपासून शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडणार, मुंबईत बैठक : बबनराव शिंदे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:14 IST

शेतीसाठी आज गुरुवारपासून उजनी धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे रब्बी पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. 

ठळक मुद्दे उजनी कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू करण्याचे आदेशरब्बी हंगामासाठी १५ नोव्हेंबर २०१७ पासून कालव्यात सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आलेसोलापूर, पंढरपूर आदी शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १३ किंवा १४ जानेवारी २०१८ पासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी

आॅनलाइन लोकमत सोलापूरटेंभुर्णी दि ११ : शेतीसाठी आज गुरुवारपासून उजनी धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे रब्बी पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. आ. शिंदे म्हणाले, २०१७ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झालेला असल्यामुळे आॅक्टोंबर महिन्यात उजनी धरणात १११ टक्के पाणीसाठा झाला होता. सर्वत्र पाण्याची मुबलकता असल्यामुळे चालू वर्षाच्या रब्बी हंगामासाठी १५ नोव्हेंबर २०१७ पासून कालव्यात सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आलेले होते. सध्या उजनी धरणात १०४ टक्के पाणीसाठा असून, उजनीच्या मुख्य कालवा २० किमी, उजवा कालवा ११९ किमी व डावा कालवा १२६ कि.मी.पर्यंतच्या लाभक्षेत्रातील पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता निर्माण झालेली होती. या आवर्तनाची १५ डिसेंबर २०१७ पासूनच शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते.मुंबईत कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवार, दिनांक ११ जानेवारी २०१८ रोजी सकाळी उजनी कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू करण्याचे आदेश दिले.   बबनराव शिंदे यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती.  सीना-माढा उपसा सिंचन सुरू करण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. या योजनेचे थकीत वीज बिल भरल्याशिवाय योजना सुरू करता येणार नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले. सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे २ कोटी ६ लाख रुपये वीज बिल थकीत असून, शासनाने ४८ लाख ५६ हजार रुपयांचा एक हप्ता भरल्याशिवाय योजना चालू करू नये, असा आदेश दिला आहे. त्यामुळे योजना सुरू राहण्याच्या दृष्टीने योजनेवरील लाभधारक शेतकºयांनी वीज बिल भरण्यासाठी सहकार्य करावे, असे बबनराव शिंदे यांनी सांगितले.बैठकीस पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. बबनदादा शिंदे, आ. भारत भालके, जलसंपदाचे प्रमुख अधिकारी रजपूत, सोलापूरचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, उपजिल्हाधिकारी शिंदे आदी उपस्थित होते.-----------------------सोलापूर, पंढरपूरचाही निर्णय- सोलापूर, पंढरपूर आदी शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १३ किंवा १४ जानेवारी २०१८ पासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याचेही आदेश महाजन यांनी दिले.

टॅग्स :SolapurसोलापूरMumbaiमुंबई