शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

आजपासून शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडणार, मुंबईत बैठक : बबनराव शिंदे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:14 IST

शेतीसाठी आज गुरुवारपासून उजनी धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे रब्बी पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. 

ठळक मुद्दे उजनी कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू करण्याचे आदेशरब्बी हंगामासाठी १५ नोव्हेंबर २०१७ पासून कालव्यात सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आलेसोलापूर, पंढरपूर आदी शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १३ किंवा १४ जानेवारी २०१८ पासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी

आॅनलाइन लोकमत सोलापूरटेंभुर्णी दि ११ : शेतीसाठी आज गुरुवारपासून उजनी धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे रब्बी पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. आ. शिंदे म्हणाले, २०१७ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झालेला असल्यामुळे आॅक्टोंबर महिन्यात उजनी धरणात १११ टक्के पाणीसाठा झाला होता. सर्वत्र पाण्याची मुबलकता असल्यामुळे चालू वर्षाच्या रब्बी हंगामासाठी १५ नोव्हेंबर २०१७ पासून कालव्यात सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आलेले होते. सध्या उजनी धरणात १०४ टक्के पाणीसाठा असून, उजनीच्या मुख्य कालवा २० किमी, उजवा कालवा ११९ किमी व डावा कालवा १२६ कि.मी.पर्यंतच्या लाभक्षेत्रातील पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता निर्माण झालेली होती. या आवर्तनाची १५ डिसेंबर २०१७ पासूनच शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते.मुंबईत कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवार, दिनांक ११ जानेवारी २०१८ रोजी सकाळी उजनी कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू करण्याचे आदेश दिले.   बबनराव शिंदे यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती.  सीना-माढा उपसा सिंचन सुरू करण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. या योजनेचे थकीत वीज बिल भरल्याशिवाय योजना सुरू करता येणार नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले. सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे २ कोटी ६ लाख रुपये वीज बिल थकीत असून, शासनाने ४८ लाख ५६ हजार रुपयांचा एक हप्ता भरल्याशिवाय योजना चालू करू नये, असा आदेश दिला आहे. त्यामुळे योजना सुरू राहण्याच्या दृष्टीने योजनेवरील लाभधारक शेतकºयांनी वीज बिल भरण्यासाठी सहकार्य करावे, असे बबनराव शिंदे यांनी सांगितले.बैठकीस पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. बबनदादा शिंदे, आ. भारत भालके, जलसंपदाचे प्रमुख अधिकारी रजपूत, सोलापूरचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, उपजिल्हाधिकारी शिंदे आदी उपस्थित होते.-----------------------सोलापूर, पंढरपूरचाही निर्णय- सोलापूर, पंढरपूर आदी शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १३ किंवा १४ जानेवारी २०१८ पासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याचेही आदेश महाजन यांनी दिले.

टॅग्स :SolapurसोलापूरMumbaiमुंबई