शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

आजपासून शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडणार, मुंबईत बैठक : बबनराव शिंदे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:14 IST

शेतीसाठी आज गुरुवारपासून उजनी धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे रब्बी पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. 

ठळक मुद्दे उजनी कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू करण्याचे आदेशरब्बी हंगामासाठी १५ नोव्हेंबर २०१७ पासून कालव्यात सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आलेसोलापूर, पंढरपूर आदी शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १३ किंवा १४ जानेवारी २०१८ पासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी

आॅनलाइन लोकमत सोलापूरटेंभुर्णी दि ११ : शेतीसाठी आज गुरुवारपासून उजनी धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे रब्बी पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. आ. शिंदे म्हणाले, २०१७ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झालेला असल्यामुळे आॅक्टोंबर महिन्यात उजनी धरणात १११ टक्के पाणीसाठा झाला होता. सर्वत्र पाण्याची मुबलकता असल्यामुळे चालू वर्षाच्या रब्बी हंगामासाठी १५ नोव्हेंबर २०१७ पासून कालव्यात सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आलेले होते. सध्या उजनी धरणात १०४ टक्के पाणीसाठा असून, उजनीच्या मुख्य कालवा २० किमी, उजवा कालवा ११९ किमी व डावा कालवा १२६ कि.मी.पर्यंतच्या लाभक्षेत्रातील पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता निर्माण झालेली होती. या आवर्तनाची १५ डिसेंबर २०१७ पासूनच शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते.मुंबईत कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवार, दिनांक ११ जानेवारी २०१८ रोजी सकाळी उजनी कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू करण्याचे आदेश दिले.   बबनराव शिंदे यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती.  सीना-माढा उपसा सिंचन सुरू करण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. या योजनेचे थकीत वीज बिल भरल्याशिवाय योजना सुरू करता येणार नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले. सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे २ कोटी ६ लाख रुपये वीज बिल थकीत असून, शासनाने ४८ लाख ५६ हजार रुपयांचा एक हप्ता भरल्याशिवाय योजना चालू करू नये, असा आदेश दिला आहे. त्यामुळे योजना सुरू राहण्याच्या दृष्टीने योजनेवरील लाभधारक शेतकºयांनी वीज बिल भरण्यासाठी सहकार्य करावे, असे बबनराव शिंदे यांनी सांगितले.बैठकीस पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. बबनदादा शिंदे, आ. भारत भालके, जलसंपदाचे प्रमुख अधिकारी रजपूत, सोलापूरचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, उपजिल्हाधिकारी शिंदे आदी उपस्थित होते.-----------------------सोलापूर, पंढरपूरचाही निर्णय- सोलापूर, पंढरपूर आदी शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १३ किंवा १४ जानेवारी २०१८ पासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याचेही आदेश महाजन यांनी दिले.

टॅग्स :SolapurसोलापूरMumbaiमुंबई