शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

ठाण्यांची हद्द समजावून घेण्यातच जातोय वेळ; मगच तक्रार नोंदवून घेण्याचा बसतोय मेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 12:13 IST

पोलीसच संभ्रमावस्थेत : तक्रार देणाऱ्याला नाहक त्रास

सोलापूर : अलीकडचा रस्ता या पोलीस ठाण्याचा, तर तिकडचा रस्ता त्या ठाण्याचा... कुठला भाग कुठल्या हद्दीत याचा खेळ सातही पोलीस ठाण्यात रंगलेला असतो. कुणी तक्रार अथवा फिर्याद द्यायला आला तर त्याला घटना कुठे घडल्याचे विचारतात. घटनास्थळ समजले तर पोलीस छातीठोकपणे सांगत नाहीत की ‘आमचीच हद्द आहे’. हद्द समजावून घेण्यात वेळ लावणारे पोलीस नंतर तक्रारदारांची तक्रार नोंदवून घेण्याचा मेळ घालतात. याचा नाहक त्रास तक्रारदाराला होत असतो.

पोलीस आयुक्तालयांतर्गत एकूण सात पोलीस ठाणे आहेत. फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगरवस्ती पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. बहुतांश ठिकाणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फक्त एका रस्त्याचे अंतर आहे. बऱ्याच वेळा गुन्हे घडतात. मात्र, तक्रारदार जेव्हा पोलीस ठाण्यात जातात, तेव्हा त्यांना गुन्हा कुठे घडला याची विचारणा करतात. पत्ता जर आपल्या संबंधित पोलीस ठाण्याचा असेल तर तेथे तक्रार घेतात. मात्र जर हद्द दुसरी येत असेल तर त्यांना हद्दीतील संबंधित पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देतात. तेथे गेल्यानंतरही बऱ्याच वेळा ही हद्द आपल्या पोलीस ठाण्यामध्ये येते का? हे पाहिले जाते. नंतर मग गुन्हा काय घडला, हे पाहिले जाते. गुन्हा दाखल करून घेतला जातो. असे अनुभव तक्रारदाराला अनेकवेळा येताना दिसून येतात. अनेक वेळा खून घडतो त्याची माहिती पोलिसांना कळवली जाते. पोलीस घटनास्थळी येतात तेव्हा समजते की ही हद्द आपली नाही. पोलीस संबंधित पोलीस ठाण्याला याची माहिती देतात. असे प्रकार अनेकवेळा जोडभावी पेठ पोलीस ठाणे व तालुका पोलीस ठाण्याच्या बाबतीत घडले आहेत.

ही घ्या उदाहरणे...

तक्रार घेतली नाही

० विजापूर वेस ते बेगम पेठ पोलीस चौकीदरम्यान रस्त्यावरून जात असताना अज्ञात मोटारसायकलस्वाराने धडक दिली होती. पायाला थोडा मार लागला होता. याची तक्रार देण्यासाठी मी प्रथमत: जेलरोड पोलीस ठाण्यात गेलो होतो. तेथे त्यांनी धडक कोठे झाली याची विचारणा केली तेव्हा त्यांनी मी रस्त्याच्या मध्ये झाली असे सांगितले. तेव्हा त्यांनी मला फौजदार चावडीला जाण्यास सांगितले. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जाण्यास सांगण्यात आले. तेथे गेलो तेव्हा त्यांनीही असेच सांगितले शेवटी तक्रार न देता मी निघून आलो.

तक्रारदार

 

अकस्मात निधनाची नोंद कुठे करायची?

सम्राट चौक ते कस्तुरबा मंडईदरम्यान असलेल्या रोडच्या कडेला एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला होता. पहिल्यांदा अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची माहिती स्थानिक कार्यकर्त्याने प्रथम फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली, तेव्हा त्यांना जोडभावीला कळविण्याचा सल्ला दिला. जोडभावी पेठ पोलिसांना सांगण्यात आले. शेवटी सामाजिक कार्यकर्त्याने ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली अन् अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला.

सात पोलीस स्टेशन असल्याने अडचणी येत नाहीत

० शहरात फक्त सात पोलीस स्टेशन आहेत, त्यामुळे जरी चुकून दुसऱ्या पोलीस ठाण्यात तक्रारदार गेला तर त्याला तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात पाठवले जाते. त्यामुळे काही किरकोळ तक्रारी सोडल्यातर तक्रार घेतली जात नाही असे होत नाही.

 

 

प्रत्येक पोलीस ठाण्याला हद्द ठरवून देण्यात आली आहे. ज्या हद्दीत गुन्हे होतात त्याच संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी लागते. तक्रारदाराला माहीत नसल्यास त्याला सांगितले जाते. गंभीर प्रकार असेल तर आरोपीला पोलीस ताब्यात घेतात व संबंधित पोलिसांच्या ताब्यात देतात. मात्र गुन्हा ज्या त्या पोलीस ठाण्यातच दाखल केला जातो.

  • एकूण पोलीस ठाणे ०७
  • पोलीस अधिकारी १४६
  • पोलीस कर्मचारी २२००

 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिस