शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ठाण्यांची हद्द समजावून घेण्यातच जातोय वेळ; मगच तक्रार नोंदवून घेण्याचा बसतोय मेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 12:13 IST

पोलीसच संभ्रमावस्थेत : तक्रार देणाऱ्याला नाहक त्रास

सोलापूर : अलीकडचा रस्ता या पोलीस ठाण्याचा, तर तिकडचा रस्ता त्या ठाण्याचा... कुठला भाग कुठल्या हद्दीत याचा खेळ सातही पोलीस ठाण्यात रंगलेला असतो. कुणी तक्रार अथवा फिर्याद द्यायला आला तर त्याला घटना कुठे घडल्याचे विचारतात. घटनास्थळ समजले तर पोलीस छातीठोकपणे सांगत नाहीत की ‘आमचीच हद्द आहे’. हद्द समजावून घेण्यात वेळ लावणारे पोलीस नंतर तक्रारदारांची तक्रार नोंदवून घेण्याचा मेळ घालतात. याचा नाहक त्रास तक्रारदाराला होत असतो.

पोलीस आयुक्तालयांतर्गत एकूण सात पोलीस ठाणे आहेत. फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगरवस्ती पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. बहुतांश ठिकाणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फक्त एका रस्त्याचे अंतर आहे. बऱ्याच वेळा गुन्हे घडतात. मात्र, तक्रारदार जेव्हा पोलीस ठाण्यात जातात, तेव्हा त्यांना गुन्हा कुठे घडला याची विचारणा करतात. पत्ता जर आपल्या संबंधित पोलीस ठाण्याचा असेल तर तेथे तक्रार घेतात. मात्र जर हद्द दुसरी येत असेल तर त्यांना हद्दीतील संबंधित पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देतात. तेथे गेल्यानंतरही बऱ्याच वेळा ही हद्द आपल्या पोलीस ठाण्यामध्ये येते का? हे पाहिले जाते. नंतर मग गुन्हा काय घडला, हे पाहिले जाते. गुन्हा दाखल करून घेतला जातो. असे अनुभव तक्रारदाराला अनेकवेळा येताना दिसून येतात. अनेक वेळा खून घडतो त्याची माहिती पोलिसांना कळवली जाते. पोलीस घटनास्थळी येतात तेव्हा समजते की ही हद्द आपली नाही. पोलीस संबंधित पोलीस ठाण्याला याची माहिती देतात. असे प्रकार अनेकवेळा जोडभावी पेठ पोलीस ठाणे व तालुका पोलीस ठाण्याच्या बाबतीत घडले आहेत.

ही घ्या उदाहरणे...

तक्रार घेतली नाही

० विजापूर वेस ते बेगम पेठ पोलीस चौकीदरम्यान रस्त्यावरून जात असताना अज्ञात मोटारसायकलस्वाराने धडक दिली होती. पायाला थोडा मार लागला होता. याची तक्रार देण्यासाठी मी प्रथमत: जेलरोड पोलीस ठाण्यात गेलो होतो. तेथे त्यांनी धडक कोठे झाली याची विचारणा केली तेव्हा त्यांनी मी रस्त्याच्या मध्ये झाली असे सांगितले. तेव्हा त्यांनी मला फौजदार चावडीला जाण्यास सांगितले. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जाण्यास सांगण्यात आले. तेथे गेलो तेव्हा त्यांनीही असेच सांगितले शेवटी तक्रार न देता मी निघून आलो.

तक्रारदार

 

अकस्मात निधनाची नोंद कुठे करायची?

सम्राट चौक ते कस्तुरबा मंडईदरम्यान असलेल्या रोडच्या कडेला एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला होता. पहिल्यांदा अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची माहिती स्थानिक कार्यकर्त्याने प्रथम फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली, तेव्हा त्यांना जोडभावीला कळविण्याचा सल्ला दिला. जोडभावी पेठ पोलिसांना सांगण्यात आले. शेवटी सामाजिक कार्यकर्त्याने ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली अन् अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला.

सात पोलीस स्टेशन असल्याने अडचणी येत नाहीत

० शहरात फक्त सात पोलीस स्टेशन आहेत, त्यामुळे जरी चुकून दुसऱ्या पोलीस ठाण्यात तक्रारदार गेला तर त्याला तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात पाठवले जाते. त्यामुळे काही किरकोळ तक्रारी सोडल्यातर तक्रार घेतली जात नाही असे होत नाही.

 

 

प्रत्येक पोलीस ठाण्याला हद्द ठरवून देण्यात आली आहे. ज्या हद्दीत गुन्हे होतात त्याच संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी लागते. तक्रारदाराला माहीत नसल्यास त्याला सांगितले जाते. गंभीर प्रकार असेल तर आरोपीला पोलीस ताब्यात घेतात व संबंधित पोलिसांच्या ताब्यात देतात. मात्र गुन्हा ज्या त्या पोलीस ठाण्यातच दाखल केला जातो.

  • एकूण पोलीस ठाणे ०७
  • पोलीस अधिकारी १४६
  • पोलीस कर्मचारी २२००

 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिस