शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उजनी धरणाजवळ उडणार थुई थुई कारंजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 13:23 IST

जायकवाडीच्या धर्तीवर आधुनिक उद्यानाची लवकरच निर्मिती

ठळक मुद्देउजनी धरण सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरले जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली१२ मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्पही उभारण्यात आला

नारायण चव्हाणसोलापूर : पैठण येथील जायकवाडी धरणाशेजारील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या धर्तीवर उजनी धरणाजवळील भीमानगर येथे उद्यान आणि पर्यटनस्थळ उभारण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी नियोजित जागेची पाहणी केली आहे. लवकरच उजनीजवळ थुई थुई कारंजे या उद्यानाच्या माध्यमातून उडणार आहेत.

उजनी धरणसोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरले आहे. या धरणामुळे सोलापूर, पुणे, नगर, जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली आले आहे. उजनी धरणाखाली भीमानगर येथे १२ मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्पही उभारण्यात आला आहे. जलसिंचन आणि वीजनिर्मिती बरोबर उजनी प्रकल्पाला पर्यटन क्षेत्रात उतरविण्याचा निर्णय राज्याच्या जलसंपदा विभागाने घेतला आहे.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरणाच्या पायथ्याशी आकर्षक उद्यान आणि पर्यटनस्थळ उभारण्याचा मोह जलसंपदा खात्याला झाला असून त्यासाठी खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. सन १९६८ मध्ये उजनी धरणाच्या प्रत्यक्ष बांधकामास प्रारंभ झाला आणि सन १९८0 मध्ये धरण पूर्णत्वास आले. भीमानगर परिसरात उजनी धरणासाठी मुबलक प्रमाणात जमीन संपादित करण्यात आली आहे.

धरणाचे काम पूर्ण झाल्याने धरणाखाली बाजूला जमीन शिल्लक आहे. आधी उजनी धरणाशेजारी पर्यटनस्थळ उभारणीसाठी पब्लिक-प्रायव्हेट पार्टिसिपेशन (पीपीपी) तत्त्वावर खासगी विकासकाची मदत घेण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे होता. त्यासाठी खात्याने तांत्रिक सल्लागाराची नियुक्तीदेखील केली होती, परंतु महामंडळाची आर्थिक स्थिती आणि जलसिंचन विभागाचा कथित घोटाळा, यामुळे एकही विकासक पुढे आला नाही. अखेर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे हा प्रस्ताव देण्यात आला.

पर्यटकांना आकर्षित करण्याची संधी- सोलापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे असून त्यासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा अनुकूल आहे. धरण परिसरात पाण्याची कमतरता नाही. त्यामुळे वृंदावन गार्डन (बंगळुरू), संत ज्ञानेश्वर उद्यान (पैठण) च्या धर्तीवर आकर्षक उद्यान, सुंदर देखावे, रंगीबेरंगी कारंजे उभारण्यास वाव आहे. सध्या उजनी धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. त्यात नवीन पर्यटन केंद्र उभारल्यास पर्यटकांची संख्या वाढेल. महसुलात वाढ होईल, अशी स्थिती आहे.

अधिकाºयांच्या पथकाकडून पाहणी- नियोजित पर्यटनस्थळाच्या जागेची राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी दोन महिन्यांपूर्वी पाहणी केली आहे. त्यांचा अहवाल कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे सादर होणार आहे. त्यांच्या छाननीनंतर हा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवला जाईल, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाºयांकडून देण्यात आली.

भीमा नदीच्या उजव्या बाजूची ४३.२६ हेक्टर जमीन- भीमा नदीच्या उजव्या बाजूची ४३.२६ हेक्टर जमीन फळबाग व उद्यान विकसित करण्यासाठी मूळ प्रकल्पात आरक्षित करण्यात आली आहे. धरण प्रकल्प विकास विभागाने पैठणच्या धर्तीवर या जागी उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव सिंचन व्यवस्थापनाकडे दिला होता. कृष्णा खोरे विकास महामंडळाने हे पर्यटनस्थळ विकसित करावे, असा हा प्रस्ताव होता; मात्र महामंडळाकडे निधीची तरतूद नसल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणdam tourismधरण पर्यटनtourismपर्यटनwater transportजलवाहतूक