शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

उजनी धरणाजवळ उडणार थुई थुई कारंजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 13:23 IST

जायकवाडीच्या धर्तीवर आधुनिक उद्यानाची लवकरच निर्मिती

ठळक मुद्देउजनी धरण सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरले जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली१२ मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्पही उभारण्यात आला

नारायण चव्हाणसोलापूर : पैठण येथील जायकवाडी धरणाशेजारील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या धर्तीवर उजनी धरणाजवळील भीमानगर येथे उद्यान आणि पर्यटनस्थळ उभारण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी नियोजित जागेची पाहणी केली आहे. लवकरच उजनीजवळ थुई थुई कारंजे या उद्यानाच्या माध्यमातून उडणार आहेत.

उजनी धरणसोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरले आहे. या धरणामुळे सोलापूर, पुणे, नगर, जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली आले आहे. उजनी धरणाखाली भीमानगर येथे १२ मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्पही उभारण्यात आला आहे. जलसिंचन आणि वीजनिर्मिती बरोबर उजनी प्रकल्पाला पर्यटन क्षेत्रात उतरविण्याचा निर्णय राज्याच्या जलसंपदा विभागाने घेतला आहे.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरणाच्या पायथ्याशी आकर्षक उद्यान आणि पर्यटनस्थळ उभारण्याचा मोह जलसंपदा खात्याला झाला असून त्यासाठी खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. सन १९६८ मध्ये उजनी धरणाच्या प्रत्यक्ष बांधकामास प्रारंभ झाला आणि सन १९८0 मध्ये धरण पूर्णत्वास आले. भीमानगर परिसरात उजनी धरणासाठी मुबलक प्रमाणात जमीन संपादित करण्यात आली आहे.

धरणाचे काम पूर्ण झाल्याने धरणाखाली बाजूला जमीन शिल्लक आहे. आधी उजनी धरणाशेजारी पर्यटनस्थळ उभारणीसाठी पब्लिक-प्रायव्हेट पार्टिसिपेशन (पीपीपी) तत्त्वावर खासगी विकासकाची मदत घेण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे होता. त्यासाठी खात्याने तांत्रिक सल्लागाराची नियुक्तीदेखील केली होती, परंतु महामंडळाची आर्थिक स्थिती आणि जलसिंचन विभागाचा कथित घोटाळा, यामुळे एकही विकासक पुढे आला नाही. अखेर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे हा प्रस्ताव देण्यात आला.

पर्यटकांना आकर्षित करण्याची संधी- सोलापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे असून त्यासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा अनुकूल आहे. धरण परिसरात पाण्याची कमतरता नाही. त्यामुळे वृंदावन गार्डन (बंगळुरू), संत ज्ञानेश्वर उद्यान (पैठण) च्या धर्तीवर आकर्षक उद्यान, सुंदर देखावे, रंगीबेरंगी कारंजे उभारण्यास वाव आहे. सध्या उजनी धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. त्यात नवीन पर्यटन केंद्र उभारल्यास पर्यटकांची संख्या वाढेल. महसुलात वाढ होईल, अशी स्थिती आहे.

अधिकाºयांच्या पथकाकडून पाहणी- नियोजित पर्यटनस्थळाच्या जागेची राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी दोन महिन्यांपूर्वी पाहणी केली आहे. त्यांचा अहवाल कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे सादर होणार आहे. त्यांच्या छाननीनंतर हा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवला जाईल, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाºयांकडून देण्यात आली.

भीमा नदीच्या उजव्या बाजूची ४३.२६ हेक्टर जमीन- भीमा नदीच्या उजव्या बाजूची ४३.२६ हेक्टर जमीन फळबाग व उद्यान विकसित करण्यासाठी मूळ प्रकल्पात आरक्षित करण्यात आली आहे. धरण प्रकल्प विकास विभागाने पैठणच्या धर्तीवर या जागी उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव सिंचन व्यवस्थापनाकडे दिला होता. कृष्णा खोरे विकास महामंडळाने हे पर्यटनस्थळ विकसित करावे, असा हा प्रस्ताव होता; मात्र महामंडळाकडे निधीची तरतूद नसल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणdam tourismधरण पर्यटनtourismपर्यटनwater transportजलवाहतूक