तीन दिवसात राज्यात साडेतीन कोटीच्या वीजचोऱ्या उघडकीस
By Appasaheb.patil | Updated: April 28, 2023 16:49 IST2023-04-28T16:48:58+5:302023-04-28T16:49:19+5:30
सर्वाधिक १२१, कोकण परिक्षेत्रात ११७, औरंगाबाद परिक्षेत्रात ९२ तसेच पुणे परिक्षेत्रांतर्गत ५३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत.

तीन दिवसात राज्यात साडेतीन कोटीच्या वीजचोऱ्या उघडकीस
सोलापूर : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसीय विशेष तपासणी मोहिम राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये २४ ते २६ एप्रिल दरम्यान विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमे दरम्यान एकुण ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आलेली आहेत. या तीन दिवसांमध्ये नागपूर परिक्षेत्रांतर्गत सर्वाधिक १२१, कोकण परिक्षेत्रात ११७, औरंगाबाद परिक्षेत्रात ९२ तसेच पुणे परिक्षेत्रांतर्गत ५३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत.
या वीजचोरी प्रकरणांमध्ये मोठया प्रमाणात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. या वीजचो-या प्रकरणी अंदाजे ३ कोटी ५० लाख रूपयांचा दंड आकारण्यात आला असून पुढील कार्यवाही चालू आहे. भविष्यात अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याने ग्राहकांनी वीजचोरी न करता वीजेचा अधिकृत वापर करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.