शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार झाडे अलगद उखडली अन्... नव्या हायवेलगत हळुवारपणे रूजविली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 11:10 IST

नारायण चव्हाण  सोलापूर : सोलापूर - विजयपूर राष्टÑीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या जोमात सुरू आहे. या कामासाठी जेव्हा भूसंपादन ...

ठळक मुद्देसोलापूर-विजयपूर महामार्गावर पुनर्रोपण ‘जेसीबी’च्या सहाय्याने काम सुरू, उपयुक्त वृक्षांना मिळाले जीवदानराष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सोलापूर शहराला जोडणाºया रस्त्यांची कामे सुरू

नारायण चव्हाण 

सोलापूर : सोलापूर - विजयपूर राष्टÑीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या जोमात सुरू आहे. या कामासाठी जेव्हा भूसंपादन करण्यात आले, तेव्हा मुख्य महामार्ग आणि लगतच्या जमिनीवर झाडे तोडल्याशिवाय महामार्गाच्या विकासाचे काम करणे शक्यच नव्हते; पण प्रकल्प संचालक संजय कदम यांना निसर्गात समतोल राखणारी ही वृक्षसंपदा वाचवायची होती. त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या टीमने महामार्गावरील तीन हजार झाडे अलगद उखडून काढली अन् हळुवारपणे नवीन जागेवर त्यांचे पुनर्रोपण केले.

 राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सोलापूर शहराला जोडणाºया रस्त्यांची कामे सुरू आहेत. सोलापूर-विजयपूर हा १०९ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग त्यापैकी एक आहे. भूसंपादनानंतर केलेल्या सर्वेक्षणात जुन्या मार्गावर अनेक लहान -मोठी झाडे आहेत. ही झाडे वाचविण्यासाठी सामाजिक वनीकरण , वनविभागाच्या अधिकाºयांशी कदम यांनी चर्चा केली, परंतु त्यात फारसे यश येईल का, हाही प्रश्न होताच.

 आतापर्यंत वड , पिंपळ अशा दीर्घायुषी झाडांचे पुनर्रोपण केले जात होते. त्यासाठी विशिष्ट अशी यंत्रसामुग्री आवश्यक असते. खर्चही अधिक होतो . मग इतक्या मोठ्या प्रमाणावर ही झाडे अलगदपणे काढून ती अन्यत्र रोपण करणे जिकरीचे काम होते. यासाठी प्राधिकरणाकडे निधीची तरतूद नव्हती. हा प्रकल्प आराखड्याबाहेरचा मग खर्च करायचा तरी कसा, हा प्रश्न होताच .त्यातही त्यांनी मार्ग काढला.

सोलापूर-पुणे महामार्गावरून जंगली हॉटेलपासून निघालेला हा बायपास रोड हत्तूरजवळ विजयपूर महामार्गाला मिळतो . या मार्गावरील चौपदरीकरणाचे काम करताना शक्य तितकी झाडे वाचवण्याचा प्रयत्न कसोशीने करण्यात आला. त्यासाठी ‘आयजेएम’ (इंडिया) या चौपदरीकरणाचे काम घेतलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीची मदत त्यांनी घेतली. लागणारी यंत्रसामुग्री, मनुष्यबळ वापरले. पाण्याच्या टँकरच्या खर्चाची तरतूद केली आणि या झाडांना जीवदान दिले.

असे केले पुनर्रोपण- रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी दोन्ही बाजूंची झाडे जेसीबीच्या सहाय्याने चोहोबाजूने खड्डा खोदून अलगदपणे उचलण्यात आली. त्यापूर्वी बाजूला सोयीस्कर ठिकाणी झाडासाठी खोल खड्डे खोदून ठेवले होते. त्या खड्ड्यांमध्ये योग्य ती खते टाकली . जेसीबीच्या सहाय्याने उखडलेले ते झाड अलगदपणे नव्या खड्ड्यात लावण्यात आले. त्यामागोमाग पाण्याचा टँकर , मजुरांची टीम यांच्या सहाय्याने झाडांचे रोपण करण्यात येते. जवळपास ३ हजार झाडे वाचवण्याचा हा प्रयत्न आहे.आतापर्यंत बहुतांश झाडांचे यशस्वीपणे रोपण करण्यात आले आहे.

रस्ते बांधणी करताना नेहमीच झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. सिमेंटच्या जंगलामुळे पर्यावरणाचा ºहास होतो. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलतोड टाळली पाहिजे. रस्ते करताना वृक्षारोपण तर करायलाच हवे. जिवंत झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण केल्याने वृक्षराजी टिकते. लावलेली झाडे ७५ टक्के जिवंत राहिली याचेही समाधान आहे.-  संजय कदम, प्रकल्प संचालक , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूऱ

वड ,पिंपळ, कडुनिंबची झाडे- जेसीबीच्या मदतीने मोठा घेर असणारी झाडे उखडून त्यांचे पुनर्रोपण करणे जिकरीचे असते़ त्यामुळे उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करीत मध्यम आणि कमी घेर असणाºया वड , पिंपळ , कडुनिंब , करंज आणि बाभूळ आदी झाडांचा त्यात समावेश आहे . नांदणीच्या माळरानावर असलेली करंज आणि खैराची झाडेदेखील त्यांच्या फांद्या तोडून रांगेने लावण्यात आली आहेत.जंगलाचा लूक जसाच्या तसा राखण्यात त्यांना यश आले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूकenvironmentवातावरण