शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ग्रामस्थांची तहान भागतेय टँकरच्या पाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:07 IST

सोलापूर :   दुष्काळी परिस्थितीमुळे टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ९३३ लोकसंख्येची तहान टँकरच्या पाण्यावर भागविण्यात ...

ठळक मुद्देटंचाईमुळे ५१ टँकर सुरू : चाºयासाठी ४६ छावण्यांचा प्रस्ताव प्रलंबितपालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक टँकरचा प्रस्ताव असलेल्या अन्य ४ ठिकाणीही तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना

सोलापूर :  दुष्काळी परिस्थितीमुळे टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ९३३ लोकसंख्येची तहान टँकरच्या पाण्यावर भागविण्यात येत आहे. यासाठी ५८ गावांत ५१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही गंभीर झाल्याने जिल्हाभरात ४६ ठिकाणी छावण्या सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे. मात्र हे प्रस्ताव प्रलंबित असून, अजून एकाही छावणीस मंजुरी देण्यात आली नाही. 

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेण्यात येते. सोमवारी पालकमंत्री दौºयानिमित्त व्यस्त असल्याने महसूल उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांनी टंचाई आढावा बैठक घेतली. टँकरचा प्रस्ताव असलेल्या अन्य ४ ठिकाणीही तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना केल्या. 

शासनाच्या १९ टँकरमधून तर ३२ खासगी टँकरने टंचाई गावांत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खासगी टँकरच्या खेपांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या वाहनावर जीपीएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे टँकरच्या वाहतुकीचा मार्ग व तपशील आॅनलाईन दिसून येतो. टँकरने पाणीपुरवठा करताना गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. 

सांगोला तालुक्यात चारा छावणी सुरू करण्यासाठी ३३ ठिकाणचा प्रस्ताव आला आहे. करमाळा तालुक्यात छावणी सुरू करण्यासाठी ८, मंगळवेढा तालुक्यातील ३ तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील २ ठिकाणी छावणी सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार जागा व आवश्यक सुविधांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रांताधिकारी यांना दिले आहेत. प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून याबाबत अहवाल न आल्याने एकाही छावणीला मंजुरी मिळाली नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयdroughtदुष्काळWaterपाणी