शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:38 IST

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर चक्रं फिरली आणि अभिजीत पाटलांच्या कारखान्यावरील संकटही दूर झालं आहे.

Abhijeet Patil ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास बाकी असताना आता नाट्यमय राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षात घेऊन माढा लोकसभेची उमेदवारी देत शरद पवार यांनी भाजपची कोंडी केल्यानंतर आता भाजपकडूनही पलटवार केला जात आहे. शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश आलं आहे. कर्ज थकवल्याच्या मुद्द्यावरून बँकेने अभिजीत पाटलांच्या साखर कारखान्याच्या गोदामाला सील ठोकलं. मात्र पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर चक्रं फिरली आणि अभिजीत पाटलांच्या कारखान्यावरील संकटही दूर झालं आहे.

माढ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ मागील आठवड्यात शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा सुरू असतानाच अभिजीत पाटील यांच्या कानावर कडू बातमी येऊन आदळली. पाटील यांच्या कारखान्याच्या गोदामांना शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सील ठोकण्यात आलं. त्यानंतर पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना निवडणुकीत राजकीय मदत करण्याचं आश्वासन दिलं. हे आश्वासन दिलं गेल्यानंतर आज अखेर पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला बँकेकडून ठोकण्यात आलेलं सील काढलं गेलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला सहकार्य करण्याची अभिजीत पाटील यांनी भूमिका घेणे आणि नंतर लगेच कर्ज वसुली लवादाने बँकेच्या कारवाईला स्थगिती देणे, हा योगायोग कसा जुळून आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसंच कारखान्याच्या माध्यमातून अभिजीत पाटील यांची कोंडी करून त्यांना भाजपच्या प्रचारात सक्रिय केलं गेल्याची चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्याची तीन गोदामे थकबाकीमुळे सील केली होती. त्यामध्ये सुमारे १४ हजार क्विंटल साखर गोदामात अडकून पडली होती. ही कारवाई बेकायदा आणि लहरीपणाची असल्याची टिप्पणी करत कारखान्याची गोदामे सीलमुक्त करून ५ मेपर्यंत त्यांचा ताबा पुन्हा कारखान्याकडे देण्याचे आदेश पुण्याच्या कर्ज वसुली लवादाने दिले. त्यानंतर हे सील काढण्यात आलं आहे.

अभिजीत पाटील काय म्हणाले?

"कारखान्याच्या जुन्या संचालक मंडळाने कर्ज थकवले होते. २०२१ पासून कारवाई सुरु होती. शासनाने आम्हाला मदत केल्यामुळे बँकेने कोर्टात सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे न्यायालयाने गोडाऊनला लावलेले कुलूप उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजकीय वर्तुळातील चर्चेचा हा विषय नाही. २०२१ पासून ही कारवाई सुरु होती. सरकारला विनंती केल्यानंतर त्यांनी मला दिलासा दिला. साखर कारखाना सुरु राहिला पाहिजे हा महत्त्वाचा विषय होता. टीका टिप्पण्या होत राहतील पण सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कारखाना महत्त्वाचा आहे हे ठरवण्यात आलं," असं अभिजीत पाटील यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmadha-pcमाढाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sugar factoryसाखर कारखाने