शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण उद्या; अंधश्रद्धेतून गैरसमज टाळा, दैनंदिन जीवन जगा

By appasaheb.patil | Updated: October 24, 2022 16:47 IST

सोलापूर : यंदा ऐन दिवाळीमध्येच म्हणजे २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होत आहे. या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असणार आहे. ...

सोलापूर : यंदा ऐन दिवाळीमध्येच म्हणजे २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होत आहे. या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असणार आहे. या काळात दैनंदिन जीवन जगताना अनेक गैरसमज आहेत. त्याकडे लक्ष न देता अंधश्रद्धेतून निर्माण झालेले गैरसमज टाळावेत. ही खगोलीय घटना आहे. ती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. मात्र आपल्याकडे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांचा संबंध धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राशीदेखील जोडला जातो. त्यामुळे ग्रहणविषयी समाजात अनेक समज आणि गैरसमज प्रचलित आहेत. भारतीय संस्कृतीतील दिवाळी हा महत्त्वाचा सण आहे. यंदा २४ ऑक्टोबर म्हणजेच आश्विन महिन्याच्या अमावस्येला दिवाळी सण साजरा होत आहे. अशातच या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २५ ऑक्टोबरला होणार आहे. सूर्यग्रहण असो, की चंद्रग्रहण ही महत्त्वाची खगोलीय घटना आहे. मात्र, ग्रहणाविषयी समाजात अनेक समज आणि गैरसमजदेखील आहेत.

----

सूर्यग्रहण शुभ की अशुभ शास्त्रीय प्रमाण नाही

आपल्याकडे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांचा संबंध धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राशी जोडला जातो. त्यामुळे ग्रहणविषयी अनेक समज आणि गैरसमज प्रचलित आहेत. ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये याविषयी अनेक जण सल्ला देतात. मात्र, या समजुती कितपत योग्य आणि खऱ्या याविषयी शास्त्रीय प्रमाण आढळून येत नाही.

---

हे आहेत गैरसमज

सामान्यत: ग्रहणकाळात भात शिजवू नये, असा समाज आपल्याकडे आहे. तसेच जेवण करणेदेखील चुकीचे मानण्यात येते. मात्र, असे करणे म्हणजे निव्वळ गैरसमज असून, ग्रहण काळात आपल्या नियमित जीवनशैलीप्रमाणे जगावे, असे, तज्ज्ञांचे मत आहे.

 

----

विज्ञान काय सांगते?

विज्ञानानुसार, ग्रहणाबाबत प्रचलित असलेले समज ही अंधश्रध्दा आहे. कारण सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. याला विज्ञानाचा आधार आहे. चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. यात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ठरावीक कालावधीनुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होत असते. सूर्यग्रहणाच्या वेळी डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सूर्यग्रहण थेट पाहू नये. तर चंद्रग्रहणाचा मानवावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. तसा कोणताही पुरावा नाही असे, नासाचे म्हणणे आहे.

----

टॅग्स :Solapurसोलापूर