शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम संपतानाच जाहीर करावी लागणार यंदा गाळप झालेल्या उसाची एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 16:32 IST

नवा बदल : साखर आयुक्तांनी काढले आदेश

सोलापूर : मागील वर्षी गाळप केलेल्या उसाची एफआरपी पुढील वर्षाचे गाळप सुरू करण्यापूर्वी जाहीर करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. यंदा हंगाम संपताना १५ दिवसांच्या आत एफआरपी जाहीर करण्याचे बंधन साखर कारखान्यांना घालण्यात आले आहे. साखर आयुक्तांनी हा बदल केला आहे

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असताना त्या हंगामाचा साखर उतारा किती येईल हे हंगाम सुरू होताना निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे कारखान्यामार्फत मागील हंगामाचा साखर उतारा विचारात घेऊन चालू हंगामातील एफआरपीची रक्कम अदा केली जात होती. केंद्र शासनाने राज्यातील साखर कारखान्यांची एफआरपी जाहीर करण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत. त्यानंतर यंदाच्या गळीत हंगामापासून साखर आयुक्तांनी हा नवा बदल जाहीर केला आहे.

-----------

१५ दिवसांची मुदत

हंगाम संपल्यानंतर १५ दिवसांच्या आत त्याच हंगामाच्या अंतिम साखर उताऱ्यानुसार अंतिम एफआरपी निश्चित करावी आणि त्याप्रमाणे फरकाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी, अशी सक्ती साखर कारखान्यावर घालण्यात आली आहे.

----------

एक देश, एक किंमत धोरण

देशातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्ये एफआरपीवर राज्य निर्धारित मूल्य (एसएपी) जाहीर करतात. त्यामुळे राज्यनिहाय ऊसदर वेगवेगळा ठरत असे. ही पद्धत बंद करून ‘एक देश, एक किंमत’ धोरण राबवावे, अशी मागणी साखर उद्योगातून केली जात आहे.

---------

सरकारने कायदे कितीही कडक केले तरी साखर कारखानदार एफआरपी चोरतात. त्यावर सरकारचे नियंत्रण नाही. सरकार आणि कारखानदार एकाच विचाराचे असल्याने बदल करण्यापेक्षा कारखानानिहाय अभ्यास गट स्थापन करून एफआरपी निश्चित झाली पाहिजे.

-राजू शेट्टी, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना

------------

सरकार कायदे करते; परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. दोन वर्षांपूर्वीची एफआरपी अद्यापपर्यंत मिळाली नाही. त्यावर काय कारवाई करणार, हे आधी जाहीर करा.

- अमोल हिप्परगी, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

-----

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीagricultureशेती