शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

हंगाम संपतानाच जाहीर करावी लागणार यंदा गाळप झालेल्या उसाची एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 16:32 IST

नवा बदल : साखर आयुक्तांनी काढले आदेश

सोलापूर : मागील वर्षी गाळप केलेल्या उसाची एफआरपी पुढील वर्षाचे गाळप सुरू करण्यापूर्वी जाहीर करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. यंदा हंगाम संपताना १५ दिवसांच्या आत एफआरपी जाहीर करण्याचे बंधन साखर कारखान्यांना घालण्यात आले आहे. साखर आयुक्तांनी हा बदल केला आहे

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असताना त्या हंगामाचा साखर उतारा किती येईल हे हंगाम सुरू होताना निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे कारखान्यामार्फत मागील हंगामाचा साखर उतारा विचारात घेऊन चालू हंगामातील एफआरपीची रक्कम अदा केली जात होती. केंद्र शासनाने राज्यातील साखर कारखान्यांची एफआरपी जाहीर करण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत. त्यानंतर यंदाच्या गळीत हंगामापासून साखर आयुक्तांनी हा नवा बदल जाहीर केला आहे.

-----------

१५ दिवसांची मुदत

हंगाम संपल्यानंतर १५ दिवसांच्या आत त्याच हंगामाच्या अंतिम साखर उताऱ्यानुसार अंतिम एफआरपी निश्चित करावी आणि त्याप्रमाणे फरकाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी, अशी सक्ती साखर कारखान्यावर घालण्यात आली आहे.

----------

एक देश, एक किंमत धोरण

देशातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्ये एफआरपीवर राज्य निर्धारित मूल्य (एसएपी) जाहीर करतात. त्यामुळे राज्यनिहाय ऊसदर वेगवेगळा ठरत असे. ही पद्धत बंद करून ‘एक देश, एक किंमत’ धोरण राबवावे, अशी मागणी साखर उद्योगातून केली जात आहे.

---------

सरकारने कायदे कितीही कडक केले तरी साखर कारखानदार एफआरपी चोरतात. त्यावर सरकारचे नियंत्रण नाही. सरकार आणि कारखानदार एकाच विचाराचे असल्याने बदल करण्यापेक्षा कारखानानिहाय अभ्यास गट स्थापन करून एफआरपी निश्चित झाली पाहिजे.

-राजू शेट्टी, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना

------------

सरकार कायदे करते; परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. दोन वर्षांपूर्वीची एफआरपी अद्यापपर्यंत मिळाली नाही. त्यावर काय कारवाई करणार, हे आधी जाहीर करा.

- अमोल हिप्परगी, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

-----

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीagricultureशेती