शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

हंगाम संपतानाच जाहीर करावी लागणार यंदा गाळप झालेल्या उसाची एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 16:32 IST

नवा बदल : साखर आयुक्तांनी काढले आदेश

सोलापूर : मागील वर्षी गाळप केलेल्या उसाची एफआरपी पुढील वर्षाचे गाळप सुरू करण्यापूर्वी जाहीर करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. यंदा हंगाम संपताना १५ दिवसांच्या आत एफआरपी जाहीर करण्याचे बंधन साखर कारखान्यांना घालण्यात आले आहे. साखर आयुक्तांनी हा बदल केला आहे

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असताना त्या हंगामाचा साखर उतारा किती येईल हे हंगाम सुरू होताना निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे कारखान्यामार्फत मागील हंगामाचा साखर उतारा विचारात घेऊन चालू हंगामातील एफआरपीची रक्कम अदा केली जात होती. केंद्र शासनाने राज्यातील साखर कारखान्यांची एफआरपी जाहीर करण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत. त्यानंतर यंदाच्या गळीत हंगामापासून साखर आयुक्तांनी हा नवा बदल जाहीर केला आहे.

-----------

१५ दिवसांची मुदत

हंगाम संपल्यानंतर १५ दिवसांच्या आत त्याच हंगामाच्या अंतिम साखर उताऱ्यानुसार अंतिम एफआरपी निश्चित करावी आणि त्याप्रमाणे फरकाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी, अशी सक्ती साखर कारखान्यावर घालण्यात आली आहे.

----------

एक देश, एक किंमत धोरण

देशातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्ये एफआरपीवर राज्य निर्धारित मूल्य (एसएपी) जाहीर करतात. त्यामुळे राज्यनिहाय ऊसदर वेगवेगळा ठरत असे. ही पद्धत बंद करून ‘एक देश, एक किंमत’ धोरण राबवावे, अशी मागणी साखर उद्योगातून केली जात आहे.

---------

सरकारने कायदे कितीही कडक केले तरी साखर कारखानदार एफआरपी चोरतात. त्यावर सरकारचे नियंत्रण नाही. सरकार आणि कारखानदार एकाच विचाराचे असल्याने बदल करण्यापेक्षा कारखानानिहाय अभ्यास गट स्थापन करून एफआरपी निश्चित झाली पाहिजे.

-राजू शेट्टी, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना

------------

सरकार कायदे करते; परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. दोन वर्षांपूर्वीची एफआरपी अद्यापपर्यंत मिळाली नाही. त्यावर काय कारवाई करणार, हे आधी जाहीर करा.

- अमोल हिप्परगी, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

-----

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीagricultureशेती