शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

तेलंगवाडीच्या डाळिंबाने बांगलादेशवासीयांना पाडली भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 1:24 PM

युवा शेतकºयाने दिले व्यवस्थापनाला महत्त्व; कष्टाच्या जोरावर दोनाची ५५ एकर कमावली शेती

ठळक मुद्देशेती व्यवसायात यश मिळवायचे असेल तर प्रथम शेतीवर प्रेम व शेतीची सर्व महत्त्वाची कामे स्वत: केली पाहिजेतपिकांचे योग्य नियोजन व व्यवस्थापन केले तर कमी पाण्यावर ठिबकचा वापर

सत्यवान दाढे 

अनगर : क्षेत्र कोणतेही असो, त्यात यश मिळवायचेच असे ठरविले की, त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असं ठरवून तेलंगवाडी (ता़ मोहोळ) येथील युवा शेतकरी सोमनाथ शिंदे पारंपरिक शेतीला फाटा देत डाळिंबाची लागवड केली अन् थेट बांगलादेशाला निर्यात केली़ त्यांनी शेतीत व्यवस्थापनाला महत्त्व दिले़ त्यामुळे त्यांनी पिकविलेल्या डाळिंबाचा आकार, रंग अन् चव पाहून बांगलादेशवासीयांना भुरळ पडली़ त्यानंतर त्यांनी त्याच देशात डाळिंब निर्यात करायला सुरुवात केली़ केवळ कष्टाच्या जोरावर दोन एकरावरून तब्बल ५५ एकर शेती विकत घेतल्याचे ते अभिमानाने सांगतात.

तेलंगवाडी येथे वडिलोपार्जित केवळ दोन एकर शेती आहे़ पारंपरिक पद्धतीने ही शेती केली जात होती. पण आपण थोडे शिकलो आहोत़ त्यामुळे त्या शिक्षणाचा वापर शेतीत करावा, या उद्देशाने त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली़ टप्प्याने सिद्धेवाडीच्या माळरानावर ३२ एकर शेती घेतली. त्यात डाळिंबाची बाग लावली़ त्यासाठी पाणी कमी असल्याने ठिबक सिंचन केले़ यासाठी वडील संदिपान शिंदे व काका कल्याण शिंदे यांचे मार्गदर्शन व भाऊ शशिकांत शिंदे यांचे सहकार्य लाभले़ यामुळे आज यशस्वी शेती करतोय, असे ते सांगतात.

शेतीत कोणत्याही पिकासाठी शेणखाताची अत्यंत आवश्यकता आहे़ त्यामुळे शेणखाताबरोबरच रासायनिक खतांचा व औषधांचाही वापर केला़ शिवाय मजुरांचा खर्च परवडत नसल्याने यांत्रिकीकरणावर भर दिला़ बागेच्या संरक्षणासाठी शेताच्या भोवती प्रतिबंधक जाळी मारली़ सनबर्निंगपासून फळांचे संरक्षण करण्यासाठी कागदाचा व कापडाचाही वापर केला जातो. या सर्वांमुळेच चार एकर क्षेत्रात ५० टन उत्पादन घेऊन २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले.

असे आहे शेतीचे नियोजन- सध्या ५५ एकर शेतीमध्ये २० एकर क्षेत्रावर डाळिंब, २० एकर क्षेत्रावर ऊस, चार एकरात काकडी, चार एकरात टोमॅटो आणि उर्वरित क्षेत्रात पालेभाज्यांसह अन्य पिके घेतली जातात़ सध्या शेती परवडत नाही, अशी सर्वत्र ओरड असते़ पण शेतीचे योग्य व्यवस्थापन केल्यास लागवडीपेक्षा दुपटीपेक्षा जास्त उत्पन्न शेती मिळवून देते़ तरुण आणि गरजू शेतकºयांना बागेच्या लागवडीपासून सर्व व्यवस्थापनासह अगदी व्यापाºयांना माल देण्यापर्यंतची सर्व मदत करण्यास सतत सज्ज असतो, असे समाधान शिंदे यांनी सांगितले़

शेती व्यवसायात यश मिळवायचे असेल तर प्रथम शेतीवर प्रेम व शेतीची सर्व महत्त्वाची कामे स्वत: केली पाहिजेत़ पिकांचे योग्य नियोजन व व्यवस्थापन केले तर कमी पाण्यावर ठिबकचा वापर करून भरघोस उत्पन्न मिळते, याचा मला विश्वास आहे.   - सोमनाथ शिंदे, डाळिंब उत्पादक

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfoodअन्न