शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तंत्रज्ञान कळालं की मोबाइल सुरक्षित; चोरीस गेला तरी लोकेशन समजणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 11:46 IST

माय ॲक्टिव्हिटी सुरू ठेवा : जेणेकरून ट्रॅकद्वारे शोध लावण्यास पोलिसांना मदत

सोलापूर : आपण महागडा मोबाइल वापरतो. मात्र, बोटावर मोजण्याइतपत फंक्शनच लोकांना माहिती असतात. इतर अनेक असे फंक्शन असतात की त्यामुळे मोबाइल सुरक्षित राहतो. चोरीस गेला तरी लोकेशन सापडते. असे असतानाही बहुतांश मंडळी त्याबाबत अनभिज्ञ असतात. एकूणच मोबाइलमधील नवनवे तंत्रज्ञान समजून घेतले तर पोलिसांना ट्रॅक लावणेही सोपे जाणार आहे.

आजकाल मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. गर्दीत, रेल्वेत, एसटी स्टँड परिसरात फोन हमखास चोरीला जातात; पण फोन चोरी होऊ नये म्हणून खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फोन चोरी झालाच तर सर्व प्रथम दुसऱ्याच्या मोबाइलवरून, लॅपटॉप किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन मॅनेज युवर अकाउंटमधून डाटा प्रायव्हसीमध्ये गेले पाहिजे. तेथे सिक्युरिटीमध्ये जाऊन मोबाइल सर्च केला पाहिजे, मोबाइलचे लोकेशन सापडते.

मोबाइलची चोरी झाल्याचे लक्षात येईपर्यंत चोरटा तेथून पसार झालेला असतो. त्यानंतर काही मिनिटांतच मोबाइल स्विचऑफ होतो. असे प्रकार अनेक ठिकाणी घडतात. सर्वप्रथम आपण आपल्या मोबाइलवर लक्ष ठेवले पाहिजे, शिवाय ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे. मोबाइलमधील माय ॲक्टिव्हिटी सुरू ठेवा ज्यामुळे सर्व डिव्हाइसची ॲक्टिव्हिटी ट्रॅक करता येतो.

 

तत्काळ पोलीस ठाण्यात जा...

  • सर्वांत प्रथम तुम्हाला https://ceir.gov.in/home/index.jsp या वेबसाइटवर जावे लागेल.
  • मोबाइल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास संबंधितांना इतर काही गोष्टी करता येत नसतील तर त्यांनी तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात जावे. तेथे मोबाइल नंबर, आयएमईआय नंबर, मोबाइल बिलाची माहिती द्यावी लागेल. जेथे फोन हरवला अथवा चोरीला गेला त्या जागेचे नाव, पत्ता सांगावा, फोन कधी हरवला त्याची तारीख द्यावी लागेल.
  • तुमचे नाव आणि पत्ता टाका, यानंतर आधार कार्ड अपलोड करून सबमिट करा. फोनची माहिती मिळाल्यावर तुम्हाला कळविले जाईल.

दहा महिन्यांत चोरीला गेले ६६ मोबाइल

शहरामध्ये जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान सात पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण ६६ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दाखल झालेल्या तक्रारींपैकी बहुतांश मोबाइल संबंधितांना मिळाले आहेत.

शहरातील मोबाइल चोरी

  • जानेवारी ११
  • फेब्रुवारी ०८
  • मार्च ०६
  • एप्रिल ०३
  • मे             ०९
  • जून            ०५
  • जुलै ०८
  • ऑगस्ट ०६
  • सप्टेंबर ०५
  • ऑक्टोबर ०५

 

 

बाजारात जाताना नागरिकांनी सावध असणे गरजेचे आहे. आपल्या मोबाइलवर लक्ष ठेवले पाहिजे. मोबाइल चोरीला गेल्यास तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी त्या अनुषंगाने तपास केला जाईल.

-बापू बांगर, पोलीस उपायुक्त (गुन्हे)

 

मोबाइल चोरीला गेल्यानंतर प्रथमत: न घाबरता धीर ठेवला पाहिजे. तत्काळ आपल्या गुगल अकाउंटवरून तपास केल्यास त्याची माहिती मिळू शकते. तरीही मोबाइल न मिळाल्यास पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार द्यावी, शक्यतो मोबाइल सापडतो. त्यामुळे घाबरायचे कारण नाही.

-अविनाश पाटील, सायबरतज्ज्ञ.

 

टॅग्स :SolapurसोलापूरMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारीThiefचोर