शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

ऊसदर आंदोलनासाठी स्वाभिमानी रस्त्यावर; टायर पेटवून ऊस वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:39 IST

ऊसदर आंदोलन चिघळण्यास सुरूवात; दुष्काळ, पूरपरिस्थिती, अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य शेतकरी अडचणीत

पंढरपूर : कोल्हापूर येथे झालेल्या ऊस परिषदेत यावर्षी उसाला एकरकमी एफआरपी व १४ टक्के वाढ मिळावी, यासाठी कारखानदारांनी हमी द्यावी अन‌् कारखाने सुरू करावेत, अशी घोषणा स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी करूनही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी १७०० रूपयांप्रमाणे उसाचा पहिला हप्ता काढला आहे. याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी रात्री युटोपियन साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून, टायर पेटवून निषेध केला. त्यामुळे ऊसदर आंदोलन चिघळण्यास सुरूवात झाली आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जिल्ह्यातील सर्रास साखर कारखान्यांनी तीन हजार रूपयांच्या आसपास उसाची एफआरपी जाहीर केली असताना सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारच शेतकऱ्यांवर अन्याय करून चेष्टा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

अगोदरच दुष्काळ, पूरपरिस्थिती, अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य शेतकरी अडचणीत आहे. यावर्षी किमान जाणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी व १४ टक्के वाढ देऊन साखर कारखानदार, सरकार शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करेल, अशी अपेक्षा असताना सोलापूर जिल्ह्यात युटोपियन साखर कारखान्याने सर्वात अगोदर १७०० रूपयांप्रमाणे पहिला हप्ता जाहीर केला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व संघटनांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी प्रत्येकवर्षी कै. माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उसाचा पहिला हप्ता जाहीर करून उसदराची कोंडी फोडण्याचे काम केले होते; मात्र त्यांच्यानंतर त्यांच्याच विचाराने चालणाऱ्या साखर कारखान्याने १७०० रूपये पहिला हप्ता जाहीर केल्याने इतर कारखाने त्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाहीत, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे युटोपियनने पुढाकार घेऊन वाढीव हप्ता जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे.

वाहने अडविली, टायर पेटवून केला निषेधस्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी रात्री ओझेवाडी, सातारा नाला, सोनके, बाजीराव विहीर येथे विविध साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक वाहने अडविली. काही ठिकाणच्या मार्गावर टायर पेटवून जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आता ऊस गाळप हंगाम हळूहळू सुरू होत असताना स्वाभिमानीने उगारलेल्या ऊसदर आंदोलनामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक व कारखानदार, संघटना यांच्यामध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. दरवाढ मिळेपर्यंत स्वाभिमानी संघटना आंदोलनावर ठाम आहे.

यापूर्वीही वेळोवेळी आम्ही जिल्ह्यातील साखर कारखानदारांना एकरकमी एफआरपी व १४ टक्के दरवाढीची विनंती केली होती. मात्र प्रत्येकवेळी आम्हाला आश्वासनावर थांबविण्यात आले. मात्र ती आश्वासने कारखानदारांनी पाळली नाहीत. किमान २५०० रूपये पहिला हप्ता मिळावा, १४ टक्के दरवाढ मिळावी, अन्यथा स्वाभिमानी आणखी आक्रमक होऊन आंदोलन करेल. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे.- सचिन पाटील, तालुकाध्यक्ष (स्वाभिमानी शेतकरी संघटना)

टॅग्स :SolapurसोलापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagricultureशेतीSugar factoryसाखर कारखाने