शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

ऊसदर आंदोलनासाठी स्वाभिमानी रस्त्यावर; टायर पेटवून ऊस वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:39 IST

ऊसदर आंदोलन चिघळण्यास सुरूवात; दुष्काळ, पूरपरिस्थिती, अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य शेतकरी अडचणीत

पंढरपूर : कोल्हापूर येथे झालेल्या ऊस परिषदेत यावर्षी उसाला एकरकमी एफआरपी व १४ टक्के वाढ मिळावी, यासाठी कारखानदारांनी हमी द्यावी अन‌् कारखाने सुरू करावेत, अशी घोषणा स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी करूनही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी १७०० रूपयांप्रमाणे उसाचा पहिला हप्ता काढला आहे. याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी रात्री युटोपियन साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून, टायर पेटवून निषेध केला. त्यामुळे ऊसदर आंदोलन चिघळण्यास सुरूवात झाली आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जिल्ह्यातील सर्रास साखर कारखान्यांनी तीन हजार रूपयांच्या आसपास उसाची एफआरपी जाहीर केली असताना सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारच शेतकऱ्यांवर अन्याय करून चेष्टा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

अगोदरच दुष्काळ, पूरपरिस्थिती, अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य शेतकरी अडचणीत आहे. यावर्षी किमान जाणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी व १४ टक्के वाढ देऊन साखर कारखानदार, सरकार शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करेल, अशी अपेक्षा असताना सोलापूर जिल्ह्यात युटोपियन साखर कारखान्याने सर्वात अगोदर १७०० रूपयांप्रमाणे पहिला हप्ता जाहीर केला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व संघटनांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी प्रत्येकवर्षी कै. माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उसाचा पहिला हप्ता जाहीर करून उसदराची कोंडी फोडण्याचे काम केले होते; मात्र त्यांच्यानंतर त्यांच्याच विचाराने चालणाऱ्या साखर कारखान्याने १७०० रूपये पहिला हप्ता जाहीर केल्याने इतर कारखाने त्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाहीत, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे युटोपियनने पुढाकार घेऊन वाढीव हप्ता जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे.

वाहने अडविली, टायर पेटवून केला निषेधस्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी रात्री ओझेवाडी, सातारा नाला, सोनके, बाजीराव विहीर येथे विविध साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक वाहने अडविली. काही ठिकाणच्या मार्गावर टायर पेटवून जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आता ऊस गाळप हंगाम हळूहळू सुरू होत असताना स्वाभिमानीने उगारलेल्या ऊसदर आंदोलनामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक व कारखानदार, संघटना यांच्यामध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. दरवाढ मिळेपर्यंत स्वाभिमानी संघटना आंदोलनावर ठाम आहे.

यापूर्वीही वेळोवेळी आम्ही जिल्ह्यातील साखर कारखानदारांना एकरकमी एफआरपी व १४ टक्के दरवाढीची विनंती केली होती. मात्र प्रत्येकवेळी आम्हाला आश्वासनावर थांबविण्यात आले. मात्र ती आश्वासने कारखानदारांनी पाळली नाहीत. किमान २५०० रूपये पहिला हप्ता मिळावा, १४ टक्के दरवाढ मिळावी, अन्यथा स्वाभिमानी आणखी आक्रमक होऊन आंदोलन करेल. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे.- सचिन पाटील, तालुकाध्यक्ष (स्वाभिमानी शेतकरी संघटना)

टॅग्स :SolapurसोलापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagricultureशेतीSugar factoryसाखर कारखाने