शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Sunday Intarview; हात मोकळे केल्यास काही तासांत दहशतवादी संपतील : रखमाजी मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 16:36 IST

रेवणसिद्ध जवळेकर पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर देश, जेणेकरुन देशवासीय हादरुन गेले. एअर सर्जिकल स्ट्राईकने ...

ठळक मुद्दे आम्ही सीमेवर जाऊ, आम्ही धैर्याने लढू असे आजचे युवक आपापसात म्हणू लागलेएअर सर्जिकल स्ट्राईकने ३५० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करुन पाकची बोलती बंद

रेवणसिद्ध जवळेकर

पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर देश, जेणेकरुन देशवासीय हादरुन गेले. एअर सर्जिकल स्ट्राईकने ३५० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करुन पाकची बोलती बंद केली. आम्ही सीमेवर जाऊ, आम्ही धैर्याने लढू असे आजचे युवक आपापसात म्हणू लागले आहेत; मात्र प्रत्यक्षात कोणी सीमेवर जाईल का ? यासह तेथील परिस्थितीची जाणून घेतलेल्या प्रश्नांची ही बोलकी उत्तरे !

प्रश्न : सैन्य दलात जाण्याची प्रेरणा कशी मिळाली ?उत्तर : मी मूळचा अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे गावचा. गावातील संभाजी शिंदे, पंडित व्हनमाने हे सैन्य दलात होते. हे दोघे सुटीला गावाकडे आल्यावर त्यांचे अनुभव कथन ऐकताना प्रेरणा मिळाली. देशासाठी आपण काहीतरी करावं, या भावनेतून मी २९ डिसेंबर १९८८ साली सैन्य दलात दाखल झालो. 

प्रश्न : भारतीय सैन्य दल सक्षम असताना अतिरेक्यांचा नायनाट का होत नाही ?उत्तर : अगदी योग्य प्रश्न विचारलात. सीमेवरील तिन्ही सैन्य दलातील जवानांना काही बंधने घालून दिलेली आहेत. ठिकठिकाणी काम करताना एकच वाईट अनुभव आला. एखाद्या अतिरेक्याला मारताना दहावेळा विचार करावा लागतो. त्याच्याकडे एखादे शस्त्र अथवा दारुगोळा असावा लागतो. तो अतिरेकीच आहे, हा पुरावा द्यावा लागतो. पुरावा नसताना त्याला ठार मारले तर उलट सैनिकांवर कडक कारवाई होते. त्यामुळे सैन्य दलातील सैनिकांच्या हातांना मोकळेपणा दिला तर काही तासांमध्येच दहशतवादाचा नायनाट होऊ शकतो. 

प्रश्न : तेथील स्थानिक लोकांची मदत मिळते का ? उत्तर : मुळीच नाही. तेथील स्थानिक  लोकही अतिरेक्यांच्या दहशतीखाली दबलेले आहेत. जेव्हा-जेव्हा सैन्य दल एखादी मोहीम आखते, तेव्हा-तेव्हा मोहिमेची बारीक-सारीक घटना स्थानिक लोक अतिरेक्यांपर्यंत पोहोचवित असतात. त्यामुळे ठोस कारवाई करताना अनेक अडचणी येतात. 

आपले युवक नुसते बोलतातआजही महाराष्ट्रातील युवक नुसते बोलत असतात. कामाच्या निमित्ताने त्यांची इतर ठिकाणी बदली झाली तर ते बदली ठिकाणी जाणे टाळतात. सोलापुरातही हेच चित्र दिसते. नुसते बोलून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष सैन्य दलात दाखल होऊन कृती झाली पाहिजे, असे निवृत्त आॅनररी कॅप्टन रखमाजी मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

तर भारतीय संस्कृती समजतेभारतीय संस्कृती विशाल आहे. सैन्य दलात काम करीत असताना अनेक प्रांतात ड्यूटी बजावावी लागते. ज्या-त्या प्रांतातील संस्कृतीचे दर्शन घडते. निवृत्तीनंतर तो सैनिक एक परिपक्व माणून बनतो. यासाठी युवकांनी सैन्य दलात जावे, अशी माझी अपेक्षा आहे.

युद्ध झाले तर मी जाणारच-मोरेसध्या भारत-पाक सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे. जर युद्ध झालेच तर मी देशासाठी सीमेवर लढण्यासाठी नक्कीच जाईन, असे रखमाजी मोरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान