शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

राज्यातील बेरोजगारांच्या आत्महत्या चिंताजनक : सत्यजित तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 14:35 IST

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, पण पाच वर्षात काहीच ...

ठळक मुद्देमहाराष्ट्रात शेतकºयांपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांच्या वाढत्या आत्महत्या हा मोठा चिंतेचा - सत्यजित तांबेदोन्ही मंत्री गटातटाच्या भांडणात मशगुल असून, त्यांना शहराच्या विकासाची चिंता नाही - सत्यजित तांबे

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, पण पाच वर्षात काहीच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. महाराष्ट्रात शेतकºयांपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांच्या वाढत्या आत्महत्या हा मोठा चिंतेचा विषय झाला असल्याची टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी  येथे बोलताना केली. 

युवक काँग्रेसतर्फे आयोजित चलो वॉर्ड अभियान अंतर्गत रामलाल चौकातील नरसिंग गिरजी मिल चाळीत आयोजित जाहीर सभेत मार्गदर्शन करताना तांबे बोलत होते. याप्रसंगी महापालिकेचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, एनएसयुआय अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, नगरसेविका वैष्णवी करगुळे उपस्थित होते. 

 यावेळी चेतन नरोटे यांनी शहरात काँग्रेसने केलेल्या कामांचा आढावा घेतला. महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन दोन वर्षे झाली, पण नगरसेवकांना दमडीचा निधी मिळाला नाही. दोन मंत्री असूनही उपयोग होत नाही. दोन्ही मंत्री गटातटाच्या भांडणात मशगुल असून, त्यांना शहराच्या विकासाची चिंता नाही, असा आरोप केला. 

काँग्रेसच्या युवा शक्ती कार्डच्या माध्यमातून दिलासा- यावेळी तांबे म्हणाले की, नोकरी नसल्याने नैराश्याने ग्रासलेले तरुण आत्महत्या करीत आहेत. काँग्रेसची सत्ता आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळेपर्यंत त्यांना बेरोजगार भत्ता देण्याचे धोरण आहे. युवा शक्ती कार्डच्या माध्यमातून नैराश्यग्रस्त युवकांना काँग्रेस दिलासा देऊन स्वत:च्या पायावर उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काँग्रेसच्या राजवटीत देशात मोठे उद्योग, कंपन्या आल्या. त्यामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली, पण पाच वर्षामध्ये मोदी सरकारने फक्त दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेसSatyajit Tambeसत्यजित तांबेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाjobनोकरी