शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने मुस्तीच्या शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 16:09 IST

सोलापूर : अवघ्या ५०० रुपयांची पाणीपट्टी थकल्याने सातबारा उताºयावर सरकारचे नाव लागले. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने मुस्ती ...

ठळक मुद्देउताºयावर सरकार अशी नोंद असल्याने सिद्धप्पा विभूते यांना कोणत्याही बँकेचे कर्ज मिळत नव्हतेशासनाने वेळोवेळी दिलेल्या कर्जमाफीपासून ते वंचित राहिले मानसिक तणावातून त्यांनी स्वत:ला संपविण्याचा मार्ग निवडला, अशी माहिती विभूते कुटुंबीयांनी दिली

सोलापूर : अवघ्या ५०० रुपयांची पाणीपट्टी थकल्याने सातबारा उताºयावर सरकारचे नाव लागले. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने मुस्ती येथील सिद्धप्पा महादप्पा विभूते (वय ७०) या वृद्ध शेतकºयाने बुधवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली.

सिद्धप्पा विभूते यांची मुस्ती हद्दीत २ हे. ४३ आर. शेतजमीन आहे. या जमिनीला ३० वर्षांपूर्वी काटगाव येथील हरणा प्रकल्पातून सिंचनासाठी पाणीपुरवठा होत असे. १९८४ साली त्याची पाणीपट्टी ५०० रुपये थकीत होती. पाटबंधारे खात्याने वारंवार नोटीस देऊनही त्यांना ती रक्कम भरता आली नव्हती. त्यामुळे सिद्धप्पा विभूते यांच्या सातबारा उताºयावर बोजा चढवून ‘सरकार’ अशी नोंद करण्यात आली. काही वर्षांपूर्वी त्यांनी दंडासहीत ५ हजार रुपये शासनाकडे जमा करून रितसर पावती घेतली. उताºयावरील नोंद कमी करण्यासाठी मुस्तीचे तलाठी, मंडलाधिकारी यांच्याकडे तगादा लावला तरी त्यांना न्याय मिळाला नाही. 

उताºयावर सरकार अशी नोंद असल्याने सिद्धप्पा विभूते यांना कोणत्याही बँकेचे कर्ज मिळत नव्हते. शासनाने वेळोवेळी दिलेल्या कर्जमाफीपासून ते वंचित राहिले. पीक विमा भरता आला नाही. दुष्काळी मदतीस ते पात्र ठरू शकले नाहीत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या यादीत नाव नसल्याने त्याचाही लाभ आपल्याला मिळणार नाही, याची खात्री पटल्याने गेले दोन-तीन दिवस ते बेचैन होते. मला कोणतीच मदत मिळत नाही. माझी चूक नाही तरी मला का भोगावे लागते, याची खंत  त्यांना सतत बोचत होती. याच मानसिक तणावातून त्यांनी स्वत:ला संपविण्याचा मार्ग निवडला, अशी माहिती विभूते कुटुंबीयांनी दिली.

सकाळी ते शेताकडे गेले. बांधावरील झाडाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. शवविच्छेदनासाठी सायं. ५ वाजता त्यांना शासकीय रुग्णालयात आणले. सिद्धप्पा विभूते यांची आर्थिक स्थिती हलाखीची होती. त्यांची तीनही मुले मोलमजुरी करतात. त्यामुळे त्यांच्या पोटा-पाण्याची आबाळ होत होती. त्यात इतरांना सरकारी मदत मिळते मात्र मलाच का नाही? या भावनेतून त्यांनी हा मार्ग पत्करला, असे ग्रामस्थांनी सांगितले.

दप्तर दिरंगाईचा बळी- सिद्धप्पा विभूते यांनी दंडासह ५ हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा केले आणि उताºयावरील सरकारचे नाव कमी करून आपल्या नावाची नोंद करण्यासाठी लेखी निवेदनं दिली. गेली अनेक वर्षे त्यांची तहसील कार्यालयात पायपीट चालू होती; मात्र त्यांना महसूल खात्याने दाद दिली नाही. ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ यापेक्षाही वाईट अनुभव त्यांच्या वाट्याला आल्याने ते सरकारच्या दप्तर दिरंगाईचे बळी ठरले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी सभापती भीमाशंकर जमादार यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीSuicideआत्महत्याagricultureशेती