शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

Breaking; एफआरपी थकविणाºया कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:41 PM

राज्यातील ७६ कारखान्यांना गाळप परवाने; एफआरपी चुकती करणाºयांनाच गाळप परवाना देण्याची साखर आयुक्तांची भूमिका कायम

ठळक मुद्देमागील तीन-चार वर्षापासून वरचेवर एफआरपी थकविणाºया कारखान्यांच्या संख्येत वाढ होत आहेजिल्ह्यातील सात साखर कारखान्यांना शुक्रवारपर्यत गाळप परवाना दिला आहे१४ तारखेपर्यंत एफआरपी चुकती करणार्या साखर कारखान्यांनाच गाळप परवाना दिला जाणार

सोलापूर : मागील वर्षीच्या उसाची संपुर्ण रक्कम दिल्यानंतरच गाळप परवाना, या साखर आयुक्तांच्या भूमिकेमुळे एफआरपी न देणाºया कारखान्यांना नोटीस काढण्यात आली आहे. साखर सहसंचालक कार्यालयाकडून १७० प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला सादर झाले असले तरी सोमवारपर्यत राज्यातीत ७६ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. 

राज्यातील १९८ साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गाळपासाठी परवाने मागीतले आहेत. साखर सहसंचालक कार्यालयाकडून तपासणी करुन जवळपास १७० कारखान्यांचे अर्ज साखर आयुक्त कार्यालयाला सादर झाले आहेत. यापैकी ७६ कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे. उर्वरित कारखान्यांचे प्रस्ताव तपासणी करून साखर आयुक्तांकडे सादय केले जात आहेत. एफआरपी थकलेल्या कारखान्यांची माहिती सहसंचालक कार्यालयाकडूनच दिल्याने परवान्यासाठी प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयात पेंडीग आहेत. आता एफआरपी थकविणार्या कारखान्यांना रितसर नोटीस पाठविण्यात आली आहे. शेतकºयांचे पैसे थकविणार्या कारखान्यांची आरआरसी करण्याची कारवाई करण्यासाठी ही नोटीस आहे. 

मागील तीन-चार वर्षापासून वरचेवर एफआरपी थकविणाºया कारखान्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे एफआरपी थकविणार्या व टप्पे पाडून ऊस बिल देणार्या कारखान्यांची संख्या ४३ इतकी झाली असल्याचे सांगण्यात आले. भागभांडवल व शासनाची थकहमी देण्यासाठीही नोटीस देण्यात आल्या आहेत.--------------

  • सोलापूर जिल्ह्यातील एकरकमी एफआरपी न देता शेतकºयांसोबत करार करुन टप्पा पद्धतीने जिल्ह्यातील पाच कारखाने शेतकर्यांना उसाचे बिल देत आहेत. हे साखर कारखाने येत्या दिवाळीला शेवटचा हप्ता देणार आहेत. माञ साखर आयुक्तांच्या तंबीमुळे साखर कारखाने सुरू करण्याअगोदर संपुर्ण रक्कम द्यावे लागणार आहेत. याशिवाय एफआरपी थकविणारे पाच कारखाने आहेत. 
  • - या पाच कारखान्यांन्यापैकी श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्यांने शेतकर्यांच्या खात्यावर उर्वरित रक्कम जमा केली आहे. 
  • - जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांना शुक्रवारपर्यत गाळप परवाना दिला आहे. लोकनेतेबाबुरावआण्णा पाटील, भैरवनाथ लवंगी,जकराया शुगर, इंद्रेश्वर, विठ्ठलराव शिंदे करकंब, गोकुळ माऊली,औदुंबरआण्णा पाटील आष्टी या कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे.

--------

१४ तारखेपर्यंत एफआरपी चुकती करणार्या साखर कारखान्यांनाच गाळप परवाना दिला जाणार आहे. ज्यांनी- ज्यांनी एफआरपी दिली नाही त्यांना १४ आॅक्टोबरपर्यंत शेतकºयांंचे पैसे देण्याची नोटीस काढली आहे. तरीही शेतकºयांचे पैसे दिले नाहीत तर आरआरसीची कारवाई केली जाईल.- शेखर गायकवाड साखर आयुक्त, पुणे 

केवळ साखर विक्रीचे कारखानदार बोलतात. इथेनॉल, वीज व इतर उत्पादनातून मिळणार्या पैशाचाही हिशोब कारखानदारांनी दिला पाहिजे. दीड वर्षे सांभाळलेल्या उसाचे अडीच वर्षानंतरही व्याजासह शेतकर्यांना पैसे मिळाले पाहिजेत.-प्रभाकर देशमुख जनहित शेतकरी संघटना 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने