शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; एफआरपी थकविणाºया कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 12:43 IST

राज्यातील ७६ कारखान्यांना गाळप परवाने; एफआरपी चुकती करणाºयांनाच गाळप परवाना देण्याची साखर आयुक्तांची भूमिका कायम

ठळक मुद्देमागील तीन-चार वर्षापासून वरचेवर एफआरपी थकविणाºया कारखान्यांच्या संख्येत वाढ होत आहेजिल्ह्यातील सात साखर कारखान्यांना शुक्रवारपर्यत गाळप परवाना दिला आहे१४ तारखेपर्यंत एफआरपी चुकती करणार्या साखर कारखान्यांनाच गाळप परवाना दिला जाणार

सोलापूर : मागील वर्षीच्या उसाची संपुर्ण रक्कम दिल्यानंतरच गाळप परवाना, या साखर आयुक्तांच्या भूमिकेमुळे एफआरपी न देणाºया कारखान्यांना नोटीस काढण्यात आली आहे. साखर सहसंचालक कार्यालयाकडून १७० प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला सादर झाले असले तरी सोमवारपर्यत राज्यातीत ७६ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. 

राज्यातील १९८ साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गाळपासाठी परवाने मागीतले आहेत. साखर सहसंचालक कार्यालयाकडून तपासणी करुन जवळपास १७० कारखान्यांचे अर्ज साखर आयुक्त कार्यालयाला सादर झाले आहेत. यापैकी ७६ कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे. उर्वरित कारखान्यांचे प्रस्ताव तपासणी करून साखर आयुक्तांकडे सादय केले जात आहेत. एफआरपी थकलेल्या कारखान्यांची माहिती सहसंचालक कार्यालयाकडूनच दिल्याने परवान्यासाठी प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयात पेंडीग आहेत. आता एफआरपी थकविणार्या कारखान्यांना रितसर नोटीस पाठविण्यात आली आहे. शेतकºयांचे पैसे थकविणार्या कारखान्यांची आरआरसी करण्याची कारवाई करण्यासाठी ही नोटीस आहे. 

मागील तीन-चार वर्षापासून वरचेवर एफआरपी थकविणाºया कारखान्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे एफआरपी थकविणार्या व टप्पे पाडून ऊस बिल देणार्या कारखान्यांची संख्या ४३ इतकी झाली असल्याचे सांगण्यात आले. भागभांडवल व शासनाची थकहमी देण्यासाठीही नोटीस देण्यात आल्या आहेत.--------------

  • सोलापूर जिल्ह्यातील एकरकमी एफआरपी न देता शेतकºयांसोबत करार करुन टप्पा पद्धतीने जिल्ह्यातील पाच कारखाने शेतकर्यांना उसाचे बिल देत आहेत. हे साखर कारखाने येत्या दिवाळीला शेवटचा हप्ता देणार आहेत. माञ साखर आयुक्तांच्या तंबीमुळे साखर कारखाने सुरू करण्याअगोदर संपुर्ण रक्कम द्यावे लागणार आहेत. याशिवाय एफआरपी थकविणारे पाच कारखाने आहेत. 
  • - या पाच कारखान्यांन्यापैकी श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्यांने शेतकर्यांच्या खात्यावर उर्वरित रक्कम जमा केली आहे. 
  • - जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांना शुक्रवारपर्यत गाळप परवाना दिला आहे. लोकनेतेबाबुरावआण्णा पाटील, भैरवनाथ लवंगी,जकराया शुगर, इंद्रेश्वर, विठ्ठलराव शिंदे करकंब, गोकुळ माऊली,औदुंबरआण्णा पाटील आष्टी या कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे.

--------

१४ तारखेपर्यंत एफआरपी चुकती करणार्या साखर कारखान्यांनाच गाळप परवाना दिला जाणार आहे. ज्यांनी- ज्यांनी एफआरपी दिली नाही त्यांना १४ आॅक्टोबरपर्यंत शेतकºयांंचे पैसे देण्याची नोटीस काढली आहे. तरीही शेतकºयांचे पैसे दिले नाहीत तर आरआरसीची कारवाई केली जाईल.- शेखर गायकवाड साखर आयुक्त, पुणे 

केवळ साखर विक्रीचे कारखानदार बोलतात. इथेनॉल, वीज व इतर उत्पादनातून मिळणार्या पैशाचाही हिशोब कारखानदारांनी दिला पाहिजे. दीड वर्षे सांभाळलेल्या उसाचे अडीच वर्षानंतरही व्याजासह शेतकर्यांना पैसे मिळाले पाहिजेत.-प्रभाकर देशमुख जनहित शेतकरी संघटना 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने