शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

सुसंवादानेच होते आयुष्य सफल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 13:59 IST

जर आपण घरातील मंडळीबरोबर, शेजाºयांशी, शिक्षकांशी आणि मित्रांशी दिलखुलासपणे आपल्या विचारांचे, अनुभवांचे, छंदाचे, सुख - दु:खाची आदान - प्रदान करून सुसंवाद साधल्यास आपले आयुष्य खºया अर्थाने आनंदी आणि सफल तर होईलच त्याचबरोबर आयुष्य निरोगी आणि तणावमुक्त राहील.

माझे नेहमीचे आवडते विषय सोडून एखाद्या नवीन विषयावर लिखाण करण्याची माझी इच्छा झाली. काल रात्रीचे दोन वाजता काही सूचले म्हणून ते शब्दरुपात देत आहे. संवाद म्हणजे आपल्या मतांची केलेली आदान-प्रदान किंवा देवाण-घेवाण होय. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असं मी शाळेत असल्यापासून शिकलोय. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार सर्व प्राणी स्वत:चा विकास करत करत आता या स्थितीला आले आहेत. मनुष्याची उत्क्रांती ही माकडांपासून झाली असंही म्हंटलं जातं. जर हे खरं असेल तर माकड हा सुद्धा समाजप्रिय प्राणी असून ते एकत्रित कुटुंबात सुसंवाद करीत आनंदाने राहतात हे आपण आजही पाहतोच.

शालेय जीवनात माझे चाळीतील घर, माझी चाळ, शाळा, मैदाने या ठिकाणी घरातील मंडळीशी, शेजारी राहणारे मंडळीशी, शिक्षकांशी आणि मित्रांशी नेहमी सुसंवाद असायचा. उदा. मी ज्या चाळीत राहत होतो तेथे चाळीत राहणाºया सर्वांशी सुसंवाद असायचा. चाळीतील मित्रांशी तर मैदानी खेळ, गप्पा, छंद, कला, अभ्यास, संध्याकाळच्या कट्ट्यावरील चर्चा यातून होणाºया सुसंवादामुळे सर्वांशी एकदम घट्ट नातं, जवळीकता आणि आपुलकीची भावना असायची. स्वत:च्या अगदी छोट्या ते मोठ्या गोष्टी या सर्वांबरोबर सुसंवाद साधून मनाला एक वेगळा आनंद आणि समाधान मिळायचा. 

वैद्यकीय कॉलेज जीवनात मी होस्टेलवर राहत होतो तिथे तर मला माझ्या आयुष्याला कलाटणी देणाºया अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. हे फक्त शक्य झाले ते माझ्याबरोबरचे, वरिष्ठ आणि कनिष्ठ मित्रांच्या सान्निध्यात त्यांच्या सहवासात राहून केलेल्या सुसंवादामुळे. हे सुसंवाद करीत असताना मला अनुभवास मिळालेला प्रत्येकाच्या विचारातील विविधता, व्यवहार चातुर्य, माझ्यातील व्यक्तिमत्त्व विकासातील वाढ, आत्मविश्वास, पैशांची किंमत, घरच्या लोकांची किंमत, एकमेकांमधील स्पर्धा, एकत्रित केलेल्या अभ्यासाचा फायदा, आयुष्याचे ध्येय गाठण्याची जिद्द आणि मित्रामधील प्रेम व आपुलकी हे कधी शिकलो हे कळलेच नाही. 

मी आजही सर्वांशी सुसंवाद साधण्यासाठी माझा बराच वेळ देतो. उदा. आठवड्यातील दोन रविवार माझ्या घरी माझ्या अनेक क्षेत्रातील मित्रांना न्याहरीसाठी बोलावतो. त्यांच्याबरोबर तीन ते चार तास मस्त आणि दिलखुलासपणे गप्पा मारतो. सुसंवादाचे अनेक फायदे असून त्यात प्रामुख्याने स्वत:चे विचार,आनंद ,सुख, दु:ख,वेदना, समस्या, ज्ञान, कौशल्य आणि कलेची आपल्या जवळील / प्रिय व्यक्तींशी देवाणघेवाण करून आपले आयुष्य सफल, तणावमुक्त आणि आनंदी घालविता येते.

मागील काही वर्षांमध्ये मनुष्याची जीवनशैली झपाट्याने बदलून ती त्याच्या स्वत:भोवती केंद्रित झालेली दिसते. आज प्रत्येक मनुष्य हा कारण नसताना अनेक गोष्टींमुळे व्यस्त झाला आहे. विज्ञानात प्रचंड प्रगती झाली तरी आपण एका गोष्टीमध्ये मागासलेले होत जातोय ते म्हणजे आपापसातील सुसंवाद. मागील काही वर्षांपासून मनुष्यामधील सुसंवाद कमी होत चाललाय. जर अशीच परिस्थिती पुढील एक दोन पिढी राहिल्यास ‘मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे’ हे इतिहास जमा होईल यात शंका नाही. हल्ली बहुमतांचं आयुष्य हे त्यांच्या स्वत:च्या पुरतेच मर्यादित होताना दिसते. एका सर्वेक्षणाच्या आधारे भारतातील प्रत्येक व्यक्ती दररोज सरासरी दीड ते दोन तास मोबाईल आणि एक तास टीव्हीमध्ये घालवितो. याचाच अर्थ तो त्याच्या हातातील ६ बाय ३ इंचच्या मोबाईल आणि २९ इंचच्या टीव्हीच्या विश्वातच गुरफटून तो एकलकोंडा झाला आहे. हल्ली मनुष्याचे एकमेकातील संवाद कमी झाल्याने एकमेकातील प्रेम आणि संबंध कमी होताना दिसतात यामुळे बरेच मानसिक आजार जडतात.  

जर आपण घरातील मंडळीबरोबर, शेजाºयांशी, शिक्षकांशी आणि मित्रांशी दिलखुलासपणे आपल्या विचारांचे, अनुभवांचे, छंदाचे, सुख - दु:खाची आदान - प्रदान करून सुसंवाद साधल्यास आपले आयुष्य खºया अर्थाने आनंदी आणि सफल तर होईलच त्याचबरोबर आयुष्य निरोगी आणि तणावमुक्त राहील.- डॉ. व्यंकटेश मेतन(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्य