शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

सुसंवादानेच होते आयुष्य सफल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 13:59 IST

जर आपण घरातील मंडळीबरोबर, शेजाºयांशी, शिक्षकांशी आणि मित्रांशी दिलखुलासपणे आपल्या विचारांचे, अनुभवांचे, छंदाचे, सुख - दु:खाची आदान - प्रदान करून सुसंवाद साधल्यास आपले आयुष्य खºया अर्थाने आनंदी आणि सफल तर होईलच त्याचबरोबर आयुष्य निरोगी आणि तणावमुक्त राहील.

माझे नेहमीचे आवडते विषय सोडून एखाद्या नवीन विषयावर लिखाण करण्याची माझी इच्छा झाली. काल रात्रीचे दोन वाजता काही सूचले म्हणून ते शब्दरुपात देत आहे. संवाद म्हणजे आपल्या मतांची केलेली आदान-प्रदान किंवा देवाण-घेवाण होय. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असं मी शाळेत असल्यापासून शिकलोय. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार सर्व प्राणी स्वत:चा विकास करत करत आता या स्थितीला आले आहेत. मनुष्याची उत्क्रांती ही माकडांपासून झाली असंही म्हंटलं जातं. जर हे खरं असेल तर माकड हा सुद्धा समाजप्रिय प्राणी असून ते एकत्रित कुटुंबात सुसंवाद करीत आनंदाने राहतात हे आपण आजही पाहतोच.

शालेय जीवनात माझे चाळीतील घर, माझी चाळ, शाळा, मैदाने या ठिकाणी घरातील मंडळीशी, शेजारी राहणारे मंडळीशी, शिक्षकांशी आणि मित्रांशी नेहमी सुसंवाद असायचा. उदा. मी ज्या चाळीत राहत होतो तेथे चाळीत राहणाºया सर्वांशी सुसंवाद असायचा. चाळीतील मित्रांशी तर मैदानी खेळ, गप्पा, छंद, कला, अभ्यास, संध्याकाळच्या कट्ट्यावरील चर्चा यातून होणाºया सुसंवादामुळे सर्वांशी एकदम घट्ट नातं, जवळीकता आणि आपुलकीची भावना असायची. स्वत:च्या अगदी छोट्या ते मोठ्या गोष्टी या सर्वांबरोबर सुसंवाद साधून मनाला एक वेगळा आनंद आणि समाधान मिळायचा. 

वैद्यकीय कॉलेज जीवनात मी होस्टेलवर राहत होतो तिथे तर मला माझ्या आयुष्याला कलाटणी देणाºया अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. हे फक्त शक्य झाले ते माझ्याबरोबरचे, वरिष्ठ आणि कनिष्ठ मित्रांच्या सान्निध्यात त्यांच्या सहवासात राहून केलेल्या सुसंवादामुळे. हे सुसंवाद करीत असताना मला अनुभवास मिळालेला प्रत्येकाच्या विचारातील विविधता, व्यवहार चातुर्य, माझ्यातील व्यक्तिमत्त्व विकासातील वाढ, आत्मविश्वास, पैशांची किंमत, घरच्या लोकांची किंमत, एकमेकांमधील स्पर्धा, एकत्रित केलेल्या अभ्यासाचा फायदा, आयुष्याचे ध्येय गाठण्याची जिद्द आणि मित्रामधील प्रेम व आपुलकी हे कधी शिकलो हे कळलेच नाही. 

मी आजही सर्वांशी सुसंवाद साधण्यासाठी माझा बराच वेळ देतो. उदा. आठवड्यातील दोन रविवार माझ्या घरी माझ्या अनेक क्षेत्रातील मित्रांना न्याहरीसाठी बोलावतो. त्यांच्याबरोबर तीन ते चार तास मस्त आणि दिलखुलासपणे गप्पा मारतो. सुसंवादाचे अनेक फायदे असून त्यात प्रामुख्याने स्वत:चे विचार,आनंद ,सुख, दु:ख,वेदना, समस्या, ज्ञान, कौशल्य आणि कलेची आपल्या जवळील / प्रिय व्यक्तींशी देवाणघेवाण करून आपले आयुष्य सफल, तणावमुक्त आणि आनंदी घालविता येते.

मागील काही वर्षांमध्ये मनुष्याची जीवनशैली झपाट्याने बदलून ती त्याच्या स्वत:भोवती केंद्रित झालेली दिसते. आज प्रत्येक मनुष्य हा कारण नसताना अनेक गोष्टींमुळे व्यस्त झाला आहे. विज्ञानात प्रचंड प्रगती झाली तरी आपण एका गोष्टीमध्ये मागासलेले होत जातोय ते म्हणजे आपापसातील सुसंवाद. मागील काही वर्षांपासून मनुष्यामधील सुसंवाद कमी होत चाललाय. जर अशीच परिस्थिती पुढील एक दोन पिढी राहिल्यास ‘मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे’ हे इतिहास जमा होईल यात शंका नाही. हल्ली बहुमतांचं आयुष्य हे त्यांच्या स्वत:च्या पुरतेच मर्यादित होताना दिसते. एका सर्वेक्षणाच्या आधारे भारतातील प्रत्येक व्यक्ती दररोज सरासरी दीड ते दोन तास मोबाईल आणि एक तास टीव्हीमध्ये घालवितो. याचाच अर्थ तो त्याच्या हातातील ६ बाय ३ इंचच्या मोबाईल आणि २९ इंचच्या टीव्हीच्या विश्वातच गुरफटून तो एकलकोंडा झाला आहे. हल्ली मनुष्याचे एकमेकातील संवाद कमी झाल्याने एकमेकातील प्रेम आणि संबंध कमी होताना दिसतात यामुळे बरेच मानसिक आजार जडतात.  

जर आपण घरातील मंडळीबरोबर, शेजाºयांशी, शिक्षकांशी आणि मित्रांशी दिलखुलासपणे आपल्या विचारांचे, अनुभवांचे, छंदाचे, सुख - दु:खाची आदान - प्रदान करून सुसंवाद साधल्यास आपले आयुष्य खºया अर्थाने आनंदी आणि सफल तर होईलच त्याचबरोबर आयुष्य निरोगी आणि तणावमुक्त राहील.- डॉ. व्यंकटेश मेतन(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्य