शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ऊस दराबाबतीत एकतर्फी निर्णय घेणार नाही, सुभाष देशमुख यांचे आश्वासन, कारखानदारांची दोन दिवसांत बैठक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:47 AM

जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या सूचनेने सहकारमंत्री पंढरीतवजन काट्यामध्ये शेतकºयांची फसवणूक होऊ नयेजिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि २०  : जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़तालुक्यातील भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, तालुकाध्यक्ष नवनाथ माने, चंद्रकांत बागल हे गेल्या ९ दिवसांपासून उपोषण करीत आहेत़ त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख आले होते़ त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना हे आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिले़ यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे उपस्थित होते.देशमुख म्हणाले, मी शेतकरी संघटनेच्या सूचनेनुसार वजन काट्यामध्ये शेतकºयांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक नेमले आहे़ मी कारखानदारांना एफआरपीनुसार दर द्यावा यासाठी सूचना करु शकतो; मात्र त्यांना जादा दर द्या, म्हणून दबाव टाकू शकत नाही. त्यामुळे  मधला मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कारखानदारांची दोन दिवसात बैठक लावून योग्य तो निर्णय जाहीर करु, असे आश्वासन सुभाष देशमुख यांनी दिले. -----------------मुख्यमंत्र्यांच्या सूचनेने सहकारमंत्री पंढरीतउसाला पहिली उचल २७०० रुपये मिळावी, यासाठी बाजीराव विहीर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन कार्यकर्ते उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याची माहिती कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती़ यामुळे मुख्यमंत्र्यांनी मला उपोषणकर्त्यांची भेट घेण्यास सांगितले़ त्यांच्या सूचनेनुसार मी आज आपली भेट घेतल्याचे सुभाष देशमुख यांनी दिली.--------------उपचार घेण्यास तयारदोन दिवसात कारखानदार, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन ऊसदराविषयी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी केवळ उपचार घेण्यास सहमती दर्शविली आहे; मात्र ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले़ ----------------राज्य व जिल्हा पातळीवर बैठक झाली आहे. त्यामध्ये अनेक जिल्ह्यातील उसाच्या दराचा प्रश्न मार्गी लागला आहे, परंतु सोलापूर जिल्ह्याचा प्रश्न सुटला नाही. मी जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.- सुभाष देशमुखसहकारमंत्री

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSubhash Deshmukhसुभाष देशमुख