शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सोलापुरचे सुभाष देशमुख हे सहकारमंत्री नव्हे ‘स्थगिती’ मंत्री; राजू शेट्टी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 12:16 IST

सुभाष देशमुख हे दिशाभूल करणारे मंत्री; त्यांच्या तीन प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत

ठळक मुद्दे दूध प्रकल्पासाठीच्या अनुदान गैरवापराची चौकशी करण्याची मागणी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे खोटी आकडेवारी देऊन दिशाभूल करणारे - खा.शेट्टीएफआरपी अधिक ४०० रुपये देण्यात येईल असे गोड-गोड बोलले; मात्र हा शब्द पाळला नसल्याचा आरोप खा.शेट्टी यांनी केला

सोलापूर: सहकारमंत्री सुभाष देशमुख हे खोटी आकडेवारी देऊन दिशाभूल करणारे आहेत. दूध प्रकल्पासाठीच्या अनुदान गैरवापराची चौकशी करण्याची मागणी करीत सहकारमंत्र्यांबाबतच्या माझ्या तीन प्रश्नांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे द्यावीत मगच ऊस  दराबाबत बोलावे. तसेच ते सहकारमंत्री नसून स्थगिती मंत्री आहेत, असाही आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांनी दिले आहे.

सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघातील डोणगाव येथे आयोजित कार्यक्रमात शेट्टी बोलत होते. मागील वर्षी आम्ही लोकमंगल साखर कारखान्यासमोर आंदोलन केल्यानंतर एफआरपी अधिक ४०० रुपये देण्यात येईल असे गोड-गोड बोलले; मात्र हा शब्द पाळला नसल्याचा आरोप खा.शेट्टी यांनी केला. सहकारमंत्री कारखानदार आहेत की शेतकºयांचे सरकारमधील प्रतिनिधी आहेत हेच समजत नाही, कारण ते सातत्याने कारखानदारांचीच बाजू घेतात असा आरोप शेट्टी यांनी केला.  

साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी आरआरसीची कारवाई करीत असताना आणि आपल्या अधिकारात नसताना कारवाईला सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली?, शेतकºयांच्या नावावर स्वत:च्या कारखान्यासाठी कर्ज काढले मात्र भरले नाही?, दूध प्रकल्पासाठीच्या अनुदानाचा गैरवापर केला?, अशा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मंत्रिमंडळात ठेवणार का?, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे मगच ऊस दराबाबत बोलावे असे खा. शेट्टी म्हणाले.  

कारखाना सुरू करण्याची गरज जेवढी शेतकºयांना आहे तेवढीच कारखानदारांनाही आहे.  कारखानदार व शेतकºयांचे नाते चांगले असले पाहिजे; मात्र दराचा प्रश्न आला की आपण भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे असे सांगत, मागील वर्षीचा हिशोब पहिला चुकता करा,

तरच धुराडे पेटवू देऊ कार्यक्रमाला अध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, महामूद पटेल, विजय रणदिवे, सिद्रामप्पा अबदुलपूरकर, उमाशंकर पाटील, पोपट साठे, उत्तम सुरवसे, नानासाहेब कोलते, फिरोज मनियार, सोमनाथ शेळके, शंकर आमले, बालाजी चराटे, बंडू चौगुले, हरिदास चौगुले, नानासाहेब आमले आदीसह शेतकरी उपस्थित होते.

कृषीमंत्र्यांना ‘हुमणी’ समजेना‘हुमणी’मुळे ऊस अडचणीत आला असल्याने एक शेतकरी कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी गेला. ‘हुमणी’मुळे उसाचे नुकसान होत असल्याचे सांगितल्यानंतर हुमणी काय आहे?, असा प्रतिप्रश्न शेतकºयालाच केल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले. असे कृषीमंत्री असतील तर कशाची अपेक्षा करावी असेही ते म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSubhash Deshmukhसुभाष देशमुखSugar factoryसाखर कारखाने