शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सोलापुरचे सुभाष देशमुख हे सहकारमंत्री नव्हे ‘स्थगिती’ मंत्री; राजू शेट्टी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 12:16 IST

सुभाष देशमुख हे दिशाभूल करणारे मंत्री; त्यांच्या तीन प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत

ठळक मुद्दे दूध प्रकल्पासाठीच्या अनुदान गैरवापराची चौकशी करण्याची मागणी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे खोटी आकडेवारी देऊन दिशाभूल करणारे - खा.शेट्टीएफआरपी अधिक ४०० रुपये देण्यात येईल असे गोड-गोड बोलले; मात्र हा शब्द पाळला नसल्याचा आरोप खा.शेट्टी यांनी केला

सोलापूर: सहकारमंत्री सुभाष देशमुख हे खोटी आकडेवारी देऊन दिशाभूल करणारे आहेत. दूध प्रकल्पासाठीच्या अनुदान गैरवापराची चौकशी करण्याची मागणी करीत सहकारमंत्र्यांबाबतच्या माझ्या तीन प्रश्नांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे द्यावीत मगच ऊस  दराबाबत बोलावे. तसेच ते सहकारमंत्री नसून स्थगिती मंत्री आहेत, असाही आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांनी दिले आहे.

सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघातील डोणगाव येथे आयोजित कार्यक्रमात शेट्टी बोलत होते. मागील वर्षी आम्ही लोकमंगल साखर कारखान्यासमोर आंदोलन केल्यानंतर एफआरपी अधिक ४०० रुपये देण्यात येईल असे गोड-गोड बोलले; मात्र हा शब्द पाळला नसल्याचा आरोप खा.शेट्टी यांनी केला. सहकारमंत्री कारखानदार आहेत की शेतकºयांचे सरकारमधील प्रतिनिधी आहेत हेच समजत नाही, कारण ते सातत्याने कारखानदारांचीच बाजू घेतात असा आरोप शेट्टी यांनी केला.  

साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी आरआरसीची कारवाई करीत असताना आणि आपल्या अधिकारात नसताना कारवाईला सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली?, शेतकºयांच्या नावावर स्वत:च्या कारखान्यासाठी कर्ज काढले मात्र भरले नाही?, दूध प्रकल्पासाठीच्या अनुदानाचा गैरवापर केला?, अशा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मंत्रिमंडळात ठेवणार का?, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे मगच ऊस दराबाबत बोलावे असे खा. शेट्टी म्हणाले.  

कारखाना सुरू करण्याची गरज जेवढी शेतकºयांना आहे तेवढीच कारखानदारांनाही आहे.  कारखानदार व शेतकºयांचे नाते चांगले असले पाहिजे; मात्र दराचा प्रश्न आला की आपण भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे असे सांगत, मागील वर्षीचा हिशोब पहिला चुकता करा,

तरच धुराडे पेटवू देऊ कार्यक्रमाला अध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, महामूद पटेल, विजय रणदिवे, सिद्रामप्पा अबदुलपूरकर, उमाशंकर पाटील, पोपट साठे, उत्तम सुरवसे, नानासाहेब कोलते, फिरोज मनियार, सोमनाथ शेळके, शंकर आमले, बालाजी चराटे, बंडू चौगुले, हरिदास चौगुले, नानासाहेब आमले आदीसह शेतकरी उपस्थित होते.

कृषीमंत्र्यांना ‘हुमणी’ समजेना‘हुमणी’मुळे ऊस अडचणीत आला असल्याने एक शेतकरी कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी गेला. ‘हुमणी’मुळे उसाचे नुकसान होत असल्याचे सांगितल्यानंतर हुमणी काय आहे?, असा प्रतिप्रश्न शेतकºयालाच केल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले. असे कृषीमंत्री असतील तर कशाची अपेक्षा करावी असेही ते म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSubhash Deshmukhसुभाष देशमुखSugar factoryसाखर कारखाने