शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

गांजा, खसखस पिकविल्यास थेट तुरूंगात; सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांचा इशारा

By रवींद्र देशमुख | Updated: March 20, 2023 16:33 IST

कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिल्या. 

रविंद्र देशमुख/सोलापूर

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून साखर कारखान्यांच्या को-जनरेशन प्लांटमध्ये कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थ निर्मिती होत नाहीत, याबाबत सतर्क राहावे. कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पीक पाहणीच्या वेळी गांजा, खसखस अशा पिकांच्या लागवडीबद्दल खात्री करावी. असे प्रकार आढळल्यास त्वरित पोलीस विभागाच्या निदर्शनास आणून द्यावेत. त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिल्या. 

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन कार्मिक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिन कांबळे, कृषि विभागाचे तंत्र अधिकारी सी. बी. मंगरूळे, टपाल विभागाचे एम. आर. पल्लेवाड आदिंसह समितीचे सदस्य उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले, जिल्हा तसेच तालुका पातळीवर आढळणाऱ्या अंमली पदार्थाचे सेवन व वापर, तसेच अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी तसेच त्या संदर्भात येणाऱ्या समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे समिती सदस्यांनी तालुके दत्तक देऊन संबंधित तालुक्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम हाती घ्यावेत असेही सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसFarmerशेतकरी