शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
4
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
5
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
6
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
7
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
8
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
9
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
10
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
11
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
12
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
13
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
15
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
16
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
17
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
20
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव

घरात राहा.. सुरक्षित राहा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 15:28 IST

‘स्टे होम... स्टे सेफ’ म्हणजे आपापल्या घरात सुरक्षित राहा या संदेशाने देशभरात ‘लॉकडाऊन’ सुरू झाले. कोरोना बाधित लोकांचा संसर्ग ...

‘स्टे होम... स्टे सेफ’ म्हणजे आपापल्या घरात सुरक्षित राहा या संदेशाने देशभरात ‘लॉकडाऊन’ सुरू झाले. कोरोना बाधित लोकांचा संसर्ग होऊ नये म्हणून हा पर्याय स्वीकारावा लागला. सोलापूर हे श्रमिकांचे शहर. कोरोनामुळे गोरगरिबांना रोजीरोटीचे वांदे झाले.बहुसंख्य श्रमिकांना स्वत:ची सुरक्षित घरं नसतात. झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. भाड्याच्या घरात दाटीवाटीने दहा-बारा लोक राहतात. पाण्याची सोय नाही. शौचालये नाहीत. सार्वजनिक शौचालये किंवा उघड्यावर रात्रीच्या अंधारात शौचाला जाणाºया महिलांची आणि मुलांची दयनीय स्थिती असते.

अस्वच्छता त्यांच्या पाचवीला पूजलेली. अशा आरोग्य विघातक आयुष्य जगणारे श्रमिक ‘सुरक्षित’ कसे असू शकतील? त्यात भर पडली लॉकडाऊनची. त्यामुळे जवळजवळ सर्व श्रमिक घरी बसले. त्यांनी खायचे काय आणि घरी बसून करायचं काय? श्रमिकांसाठी  लॉकडाऊनचे दिवस म्हणजे जीवघेणे संकट म्हणावे लागेल.. मात्र ज्यांना  वेळेवर मासिक वेतन घेणाºया नोकर, कर्मचारी, बुद्धिजीवी मध्यमवर्गीय बहुजन तसेच व्यावसायिक, व्यापारी धनिकांसाठी लॉकडाऊन इष्टापत्तीच ठरली. बहुतेकांनी लॉकडाऊनचा चांगला उपयोग केला. रुटीन बाहेरचा सृजनाविष्कार करण्यात वेळ घालविला. छंद जोपासले.

समाजमाध्यमांचा उपयोग केला. नामवंत लोकांच्या ‘लॉकडाऊन डायºया’ ऐकल्यानंतर ‘आहे रे आणि नाही रे’ वर्गाच्या जगण्यातील दरी मात्र प्रकर्षाने जाणवली.  सुरुवातीला सोलापूर शहर तुलनेने सुरक्षित होते. अचानकपणे एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू श्रमजीवी लोकांच्या परिसरात झाल्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलताना दिसतोय. म्हणून श्रमिकांचे आरोग्यभान वाढविल्याशिवाय पर्याय नाही. कोविड १९ आजारावर कोणतेही औषध आणि लस अजूनही उपलब्ध नाही. जगातील अनेक राष्ट्रांनी लोकसहभागातून यावर उपाययोजना केलेली दिसते. आपल्याला देखील लोकसहभाग वाढवावा लागेल. श्रमिकांचे सामूहिक शहाणपण वाढविण्याची गरज आहे. कोरोनाला तर हद्दपार करायचे आहेच  त्याचबरोबरीने आपले माणूसपण संपवून चालणार नाही. गेल्या काही दिवसांपासून संशय,चिंता, नैराश्य, खिन्नता, आत्महत्येची मानसिकता बळावत चाललेली दिसते. नकारात्मक  मानसिकता असलेली  माणसं आपल्या अवतीभवती दिसतात. तेव्हा समाजभान असणाºयांनी ‘किम कर्तव्यम्’ची भूमिका घेता कामा नये. बघता बघता आपल्याकडे सुरक्षित आणि असुरक्षित असे दोन जनसमूह निर्माण होताना दिसतात. हा दुभंग टाळण्यासाठी  सुरक्षितांनी असुरक्षित लोकांची काळजी घेतली तरच श्रमिक वर्ग संकटातून बाहेर येऊ शकेल. जनजीवन पूर्वपदावर येईल..

श्रमिक जोपर्यंत सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत शहरातील इतरांचे आरोग्य सुरक्षित होऊ शकणार नाही. वर्षानुवर्षे ज्यांनी शहराच्या विकासासाठी झटले. त्यांच्याशी सुसंवाद साधून सकारात्मक बदल घडवण्याचे प्रयत्न करावेत. ज्या श्रमिकांच्या योगदानामुळे आपली शहरं सुरक्षित राहिली त्यांना आपल्यात सामावून घेत कोरोनाविरुद्धची लढाई  अंतिम टप्प्यापर्यंत लढावी लागणार आहे. बुद्धिजीवी वर्गाकडून श्रमिकांच्या लोकशिक्षणातूनच कोरोना प्रतिबंधक आणि नियंत्रणाचे नवे पर्याय स्थापित होतील. एकंदरीत समाजात स्वत:बरोबर इतरांची सुरक्षितता जपण्याची  संवेदनशीलता वाढेल.येत्या काळात सार्वजनिक आरोग्य हाच प्राधान्याचा विषय असणार आहे. हे नक्की.- प्रा. विलास बेत.(लेखक परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस