शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेमार्फत शेतकºयांना थेट कर्ज वाटपाचा प्रस्ताव बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:53 IST

अडचणीतील जिल्हा बँकांसाठी पर्याय; प्रायोगिक तत्त्वावर सोसायट्यांमार्फत कर्जपुरवठा करण्याचे धोरण

ठळक मुद्दे राज्यात अनेक शेतकरी हे केवळ विकास सोसायटीचे सभासद आहेतजिल्हा बँकांकडे पैसे नसल्याने त्यांना कर्ज मिळू शकत नाहीएखादा शेतकरी विकास सोसायटीचा पूर्वी सभासद व कर्जदार आहे

सोलापूर:  मागील काही वर्षांत राज्यातील अडचणीतील जिल्हा बँकांची संख्या वरचेवर वाढत असल्याने राज्य बँक पर्याय ठरु शकते असे वाटत आहे. थेट विकास सोसायट्यांमार्फत शेतकºयांना कर्जवाटपासाठी राज्य बँकेने नेमलेल्या समितीने प्रायोगिक तत्त्वावर काही जिल्ह्यात विकास सोसायटीमार्फत थेट कर्जपुरवठा करण्याची शिफारस केली आहे; मात्र समितीच्या अहवालावर नाबार्डकडे काथ्याकूट सुरू असल्याचे सांगण्यात आले.

राज्य कृषी तथा भूविकास बँक कायमची बंद झाल्यानंतर शेतकºयांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँका पुढे आल्या होत्या. केवळ शेतकºयांसाठी विहीर, पाईपलाईन तसेच शेतीविषयक बाबींसाठी कर्ज देण्यासाठी राज्यात भूविकास बँकेची सुरुवात झाली होती. कालांतराने जिल्हा बँकांनाही शेतीसाठी कर्ज देण्याची मर्यादा वाढविल्याने भूविकास बँका डबघाईला आल्या व बंदही पडल्या. 

यामुळे शेतकºयांची बँक म्हणून केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे पाहिले जात असतानाच आर्थिक शिस्त पाळली नसल्याच्या कारणामुळे राज्यातील ८ ते १० जिल्हा बँका कमालीच्या तोट्यात आहेत. तोट्यातील जिल्हा बँकांची संख्या वरचेवर वाढत असल्याने थेट राज्य बँक विकास सोसायट्यामार्फत शेतकºयांना कर्ज देण्याचा मुद्दा ऐरणीवर आला.  राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी थेट कर्ज देण्याची घोषणाही केली होती.

राज्य बँकेने मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये यासाठी जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रातील शेतकºयांना राज्य बँकेमार्फत पीक कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पथदर्शी योजना तयार करण्याची समिती नेमली होती. यामध्ये राज्य बँकेचे सरव्यवस्थापक दिलीप दिघे, सोलापूर जिल्हा  बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे, बुलढाणा जिल्हा बँकेचे अशोक खरात तसेच मुंबई जिल्हा उपनिबंधक दिगंबर साळुंखे यांचा समावेश होता. या समितीने अडचणीतील जिल्हा बँकांना राज्य बँकेने थेट विकास सोसायट्यामार्फत कर्जपुरवठा करण्याबाबत अहवालही दिला आहे. 

कोणाला मिळणार कर्ज ....- राज्यात अनेक शेतकरी हे केवळ विकास सोसायटीचे सभासद आहेत; मात्र जिल्हा बँकांकडे पैसे नसल्याने त्यांना कर्ज मिळू शकत नाही  तसेच याशिवाय एखादा शेतकरी विकास सोसायटीचा पूर्वी सभासद व कर्जदार आहे, त्याचे बागायती क्षेत्र वाढल्याने कर्ज मर्यादाही वाढली आहे; मात्र बँकेची आर्थिक स्थिती नसल्याने कर्ज देऊ शकत नाही,अशांना कर्ज देण्याची शिफारस समितीने केली आहे. - समितीच्या सदस्यांसोबत राज्य बँकेच्या अधिकाºयांनी केलेल्या चर्चेनुसार बुलढाणा व सोलापूर जिल्ह्यात  प्रायोगिक तत्त्वावर राज्य बँकेने थेट विकास सोसायटीमार्फत कर्जपुरवठा करण्याचे ठरले होते; मात्र यामुळे जिल्हा बँकांचे अस्तित्व संपेल असे नाबार्डला वाटत असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँकgovernment schemeसरकारी योजना