शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
3
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
4
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
5
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
6
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
7
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
10
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
11
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
12
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
13
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
14
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
15
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
16
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
17
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
18
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
19
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
20
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

पोळा सण विशेष; शेतकरी सायेब झाला, बैलबारदाना गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:48 PM

शेतीचे यांत्रिकीकरण: पशुधनाकडे दुर्लक्ष; पाऊस नसल्याने पोळा सणाच्या हौसेला मर्यादा

ठळक मुद्दे बैलपोळा सणाचा व्यवसाय हा ७५ टक्के कमी झाला बैलपोळ्याच्या सणाला आज औपचारिकतेचे स्वरूप आले

बाळासाहेब बोचरेसोलापूर: शेतकºयांची मुलं शिकली, सायेब झाली किंवा शेती सोडून बैलबारदाना गुंडाळून शहराकडे गेल्याने बैलपोळ्याच्या सणाला आज औपचारिकतेचे स्वरूप आले असल्याचे चित्र आहे. 

एक जमाना होता. जमीन नसली तरी शेतमजूर म्हणून काम करणाºयाकडे घरटी एकतरी जनावर असायचं. पण आज मोठ्या शेतकºयाला जनावरं सांभाळण्यासाठी मजूर मिळेनात तर छोट्या शेतकºयाला अन् मजुराला बैलबारदाना सांभाळणे परवडेनासे झाल्याने पशुधनातच घट झाल्याचे दिसून येते. बैलपोळ्याचा सण म्हणजे आपल्या शेतात वर्षभर राबणाºया बैलांना मनोभावे सजवून त्यांची पूजा करताना शेतकºयाला मनस्वी आनंद व्हायचा. आज मात्र केवळ दुभत्या गायीला पोसण्याइतपत शेतकºयांचे जनावरांबद्दलचे प्रेम उरले आहे. 

बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फेरफटका मारला असता. बैलपोळा सणाचा व्यवसाय हा ७५ टक्के कमी झाला असल्याची प्रतिक्रिया या व्यवसायात ४० वर्षे असलेले शाम खंडेलवाल यांनी सांगितले. याच व्यवसायात टिकून असलेल्या साखरे यांच्या तिसºया पिढीतील योगेश साखरे सांगतात की, आम्ही लहान असताना बैलपोळा सणाच्या अगोदर १५ दिवस शेतकºयांची इतकी गर्दी असायची की आमच्याशी बोलायलाही आजोबांना वेळ नसायचा. आज मात्र १० टक्केही व्यवसाय नसल्याचे चित्र आहे. 

दरम्यान, दुकानात बैलांचे साहित्य खरेदी करण्यासाठी आलेले डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकरी राजाराम नारायण गायकवाड म्हणाले, आमच्याकडे कायम ४० ते ५० जनावरे असायची. पण आता जनावरे सांभाळण्यासाठी मजूर मिळेनात, शिवाय ट्रॅक्टर आल्याने जनावरे कमी केली. सध्या शेतकºयाची अवस्था वाईट आहे. पाऊस नाही, पिकाला भाव नाही आणि जो ऊस गेला त्याचे अजून पैसे मिळाले नसल्याने व्याजावर प्रपंच चालवण्याची वेळ आली आहे.

आमची पिढी आहे तोपर्यंत जनावरे आहेत. यापुढची शिकलेली पिढी जनावरे पाळेल की नाही, याबद्दल शंकाच आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. थोडीफार शिकलेली शेतकºयांची मुलेही शेतात काम करणे आणि जनावरांची देखभाल करण्यापेक्षा शहरात कारखान्यात काम करण्याकडे वळू लागली आहेत. शिवाय उच्चशिक्षित मुले मोठ्या हुद्यावर गेली आहेत. आम्हाला देशी गायींच्या दुधाशिवाय दुसरं दूध आवडत नाही म्हणून खिलार गायी पाळल्यात. सगळी मिळून १२ जनावरे असल्याचे त्यांनी सांगितले. 

पैसा नाही, हौस कसली?च्पाऊसपाणी नसल्याने सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे. साखर कारखान्यांकडे शेतकºयांची दीडशे कोटीची येणे बाकी असताना कारखान्यांनी पोळ्यासाठी काहीच जाहीर केले नाही.  त्यामुळे गरजेपुरतेच साहित्य घेतले जात आहे. हौसेला मुरड घातली जात आहे. बैलांच्या गळ्यातील चंगाळी ही उत्तम पितळी धातूपासून बनविली जाते. त्याची जोड किमान तीन ते साडेतीन हजाराला मिळते. पण चायना घुंगराची नवीन चंगाळी केवळ ५०० रुपयात मिळते. त्यामुळे काटकसरीने पोळा करण्याशिवाय गत्यंतर नाही.  

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी