शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अत्यल्प पावसाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:51 IST

२७ मंडलांवर १०० तर सहा मंडलांत ३५ मि.मी. पेक्षा कमी पाऊस 

ठळक मुद्देजिल्हाभरात कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी पडू लागल्याअक्कलकोट व बार्शी तालुक्याचा काही भाग वगळता पाऊस गायब जिल्हाभरात एकूण १६३१.७३ मि.मी. तर सरासरी १४८.३४ मि.मी. इतकाच पाऊस पडला

सोलापूर : जिल्ह्यातील २७ मंडलांमध्ये आजही १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला असून, मार्डी, शेटफळ, टेंभुर्णी, म्हैसगाव, अर्जुननगर व इस्लामपूर मंडलात तर ३५ मि.मी. पेक्षाही कमी (अत्यल्प) पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्के इतकाच पाऊस पडल्याने शेतकºयांमधील चिंता वाढली आहे.

सोलापूर जिल्ह्यात ९१ महसूल मंडले असून या सर्व मंडलात २५ आॅगस्टपर्यंत एकूण ३१५९ मि.मी. तर सरासरी २८७ मि.मी.पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात एकूण १६३१.७३ मि.मी. तर सरासरी १४८.३४ मि.मी. इतकाच पाऊस पडला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर तब्बल अडीच महिने अक्कलकोट व बार्शी तालुक्याचा काही भाग वगळता पाऊस गायब झाला.

त्यानंतर १५ आॅगस्टपासून जिल्हाभरात कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी पडू लागल्या आहेत; मात्र पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. ९१ पैकी १७ मंडलात १०० मि.मी. पेक्षाही कमी पाऊस पडला आहे. यामधील ६ मंडलात तर पाऊस ३५ मि.मी. ही पडला नाही. मार्डी (उत्तर सोलापूर), शेटफळ (मोहोळ), म्हैसगाव, टेंभुर्णी(माढा), अर्जुननगर, इस्लामपूर (माळशिरस) या मंडलात अत्यल्प पाऊस पडला आहे. मार्डी व शेटफळ मंडलात प्रत्येकी ३३ मि.मी., म्हैसगाव मंडलात ३० मि.मी. , टेंभुर्णी व अर्जुननगर  मंडलात प्रत्य्रेकी ३५ मि.मी. तर इस्लामपूर मंडलात अवघा २८ मि. मी. पाऊस पडला आहे. 

तिºहे, वळसंग, मुस्ती, बोरामणी, जेऊर(अक्कलकोट), लऊळ, रोपळे(क), केत्तूर, जेऊर(करमाळा), सालसे, हतीद, नाझरा, संगेवाडी, सोनंद, जवळा, माळशिरस, वेळापूर, दहिगाव, मरवडे, हुलजंती, भोसे,आंधळगाव, मारापूर या मंडलात ४५ ते ९९ मि.मी. पाऊस पडला आहे.

अपेक्षित व कंसात प्रत्यक्षात पडलेला पाऊस- उत्तर तालुका- ३३०.१६ मि.मी.(१६८.६२ मि.मी.), दक्षिण तालुका- ३३०.१६ मि.मी., (१४८.८९ मि.मी.), बार्शी- ३३२.४६ मि.मी.(२९४ मि.मी.), अक्कलकोट- ३७८ मि.मी.(१८२ मि.मी.), मोहोळ- २९९.३१ मि.मी.(१६१.५९ मि.मी.), माढा- २५९.७५ मि.मी.(११६.५३ मि.मी.), करमाळा- २७३.८२ मि.मी.(९९.८० मि.मी.), पंढरपूर- २७५.८५ मि.मी.(१४९.५९ मि.मी.), सांगोला- २१८ मि.मी.(९६ मि.मी.), माळशिरस- २०५.४३ मि.मी.(१०८.३१ मि.मी.) मंगळवेढा- २५६.१२ मि.मी.(१०६.१५ मि.मी.) 

काही मंडलांमध्ये पाऊस कमी आहे. यामुळे या मंडलातील सर्वच प्रकारच्या पिकांवर परिणाम झाला आहे. काही मंडलातील काही गावांतील पिकांना उजनी धरण व अन्य धरणातील पाण्याचा फायदा होऊ शकतो.बसवराज बिराजदारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयagricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी