शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

श्रमदानाचे नक्कीच चीज होईल; दुष्काळ मिटेल !

By appasaheb.patil | Updated: May 6, 2019 16:03 IST

पाणी फाउंडेशन (वॉटर कप) स्पर्धेचे जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख याचा विश्वास

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना मदत करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याची गरजयंदा स्रेहालय प्रकल्प, अहमदनगर या संस्थेच्यावतीने वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना मदत करण्यात येत आहे

आप्पासाहेब पाटील

सिनेअभिनेता अमीर खान याच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र सुरूवात झाली आहे़ दुष्काळाशी दोन हात करून श्रमदानासाठी एकवटलेल्या गावांची कहाणी वेगळीच आहे़ अशा आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे नेतृत्व करून जिल्हा समन्वयकाची जबाबदारी स्वीकारणारे सत्यवान देशमुख यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न : यंदा सोलापूर जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेविषयी काय सांगाल ?

उत्तर : यंदा वॉटर कप स्पर्धेचा चौथा टप्पा आहे़ यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील २८० पैकी १५९ गावांत श्रमदानाचे काम सुरू झाले आहे़ ८ एप्रिल ते २२ एप्रिलपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे़ दुष्काळाचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी गावातील ग्रामस्थ एकत्र येऊ लागले आहेत़ श्रमदानाचे काम मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने भविष्यात पावसाचे पाणी साचून गावे पाणीदार होतील यात शंका नाही.

प्रश्न : सहभागी गावांचा प्रतिसाद कसा आहे ? कितपत परिणाम दिसून येईल.

उत्तर : यंदाच्या वर्षी गावांचा सहभाग अतिशय चांगला आहे़ गाव पाणीदार करण्यासाठी गावातील लोक एकत्र येऊ लागलेले आहेत़ सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत आपल्या गावपरिसरातील माळरानावर श्रमदान करण्यात ग्रामस्थ, सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, लोकप्रतिनिधी आदींचा सहभाग वाढत आहे़ या कामाचा नक्कीच परिणाम दिसून येणार आहे़ भविष्यात चांगला पाऊस झाल्याने नक्कीच गावे पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होतील.

प्रश्न : महाश्रमदान कसे झाले ?

उत्तर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील सहा गावांत महाश्रमदानाचे आयोजन केले होते़ शिवाय काही गावांनी उत्स्फूर्तपणे महाश्रमदानाचे स्वरूप देऊन मोठ्या प्रमाणात श्रमदान केले़ 

ईश्वर चिठ्ठीद्वारे गावांची मदतयंदा स्रेहालय प्रकल्प, अहमदनगर या संस्थेच्यावतीने वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना मदत करण्यात येत आहे़ प्रत्येक शनिवारी सहभागी गावांची मदत निधी देण्यासाठी चिठ्ठीव्दारे निवड केली जात आहे़ या उपक्रमाला ईश्वर चिठ्ठी असे नाव देण्यात आले आहे़ आतापर्यंत १०० हून अधिक गावांना प्रत्येकी १ लाख रूपयांची मदत स्रेहालय संस्थेतर्फे देण्यात आली़ 

संस्था, संघटनांनी पुढे यावेवॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना मदत करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याची गरज आहे़ या जमा झालेल्या देणगीच्या माध्यमातून श्रमदानस्थळी मशीनचा वापर करून मोठ्या प्रमाणात काम करण्यात येईल अशीही माहिती जिल्हा समन्वयक देशमुख यांनी दिली़

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ