शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

श्रमदानाचे नक्कीच चीज होईल; दुष्काळ मिटेल !

By appasaheb.patil | Updated: May 6, 2019 16:03 IST

पाणी फाउंडेशन (वॉटर कप) स्पर्धेचे जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख याचा विश्वास

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना मदत करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याची गरजयंदा स्रेहालय प्रकल्प, अहमदनगर या संस्थेच्यावतीने वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना मदत करण्यात येत आहे

आप्पासाहेब पाटील

सिनेअभिनेता अमीर खान याच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र सुरूवात झाली आहे़ दुष्काळाशी दोन हात करून श्रमदानासाठी एकवटलेल्या गावांची कहाणी वेगळीच आहे़ अशा आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे नेतृत्व करून जिल्हा समन्वयकाची जबाबदारी स्वीकारणारे सत्यवान देशमुख यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न : यंदा सोलापूर जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेविषयी काय सांगाल ?

उत्तर : यंदा वॉटर कप स्पर्धेचा चौथा टप्पा आहे़ यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील २८० पैकी १५९ गावांत श्रमदानाचे काम सुरू झाले आहे़ ८ एप्रिल ते २२ एप्रिलपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे़ दुष्काळाचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी गावातील ग्रामस्थ एकत्र येऊ लागले आहेत़ श्रमदानाचे काम मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने भविष्यात पावसाचे पाणी साचून गावे पाणीदार होतील यात शंका नाही.

प्रश्न : सहभागी गावांचा प्रतिसाद कसा आहे ? कितपत परिणाम दिसून येईल.

उत्तर : यंदाच्या वर्षी गावांचा सहभाग अतिशय चांगला आहे़ गाव पाणीदार करण्यासाठी गावातील लोक एकत्र येऊ लागलेले आहेत़ सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत आपल्या गावपरिसरातील माळरानावर श्रमदान करण्यात ग्रामस्थ, सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, लोकप्रतिनिधी आदींचा सहभाग वाढत आहे़ या कामाचा नक्कीच परिणाम दिसून येणार आहे़ भविष्यात चांगला पाऊस झाल्याने नक्कीच गावे पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होतील.

प्रश्न : महाश्रमदान कसे झाले ?

उत्तर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील सहा गावांत महाश्रमदानाचे आयोजन केले होते़ शिवाय काही गावांनी उत्स्फूर्तपणे महाश्रमदानाचे स्वरूप देऊन मोठ्या प्रमाणात श्रमदान केले़ 

ईश्वर चिठ्ठीद्वारे गावांची मदतयंदा स्रेहालय प्रकल्प, अहमदनगर या संस्थेच्यावतीने वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना मदत करण्यात येत आहे़ प्रत्येक शनिवारी सहभागी गावांची मदत निधी देण्यासाठी चिठ्ठीव्दारे निवड केली जात आहे़ या उपक्रमाला ईश्वर चिठ्ठी असे नाव देण्यात आले आहे़ आतापर्यंत १०० हून अधिक गावांना प्रत्येकी १ लाख रूपयांची मदत स्रेहालय संस्थेतर्फे देण्यात आली़ 

संस्था, संघटनांनी पुढे यावेवॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना मदत करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याची गरज आहे़ या जमा झालेल्या देणगीच्या माध्यमातून श्रमदानस्थळी मशीनचा वापर करून मोठ्या प्रमाणात काम करण्यात येईल अशीही माहिती जिल्हा समन्वयक देशमुख यांनी दिली़

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ