शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सोलापूरकरांनो रेल्वेने कोठेही जा.. नो वेटिंग; कोरोनामुळे प्रवासी संख्येत घट 

By appasaheb.patil | Updated: March 25, 2021 15:41 IST

परीक्षेसाठी व कामानिमित्त जाणाऱ्याची संख्या अधिक

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचा परिणाम आता रेल्वेच्या प्रवासावर दिसून येत आहे. सोलापूर विभागातून कोणत्याही मेल, एक्स्प्रेस, पॅसेजर गाडीने प्रवास करा.. तिकीट बुक होतेच... सीट बुकिंगसाठी वेटिंग करावे लागत नाही. कोरोनामुळे प्रवासी संख्येत किंचित घट झाली असली तरी परीक्षेसाठी व कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या रेल्वेसाठी समाधानकारक आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही शहर व जिल्ह्यात लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे, संचारबंदी व अन्य कडक निर्बंधाचे पाऊल काही शहरांनी उचलले आहे. शिवाय काही शहरांनी शहर प्रवेशासाठी कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे, त्यामुळे या शहरातून त्या शहरात किंवा या राज्यातून त्या राज्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे.

रोज ३२ एक्स्प्रेस धावतात...

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून दररोज मुंबई, पुणे, हैदराबाद आदी विविध प्रमुख मार्गांवर ३२ मेल, एक्स्प्रेस, पॅसेजर गाड्या धावतात. यातील उद्यान, सिद्धेश्वर, कर्नाटक, हुसेनसागर, हैदराबाद, कोणार्क एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांची संख्या चांगली आहे. पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली असली तरी परीक्षा, कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून रेल्वेने प्रवास करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

परीक्षेनंतर रेल्वेचे आरक्षण होईल वेटिंग...

एप्रिलनंतर म्हणजे मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. दरवर्षी उन्हाळ्यात एप्रिल, मे, जून महिन्यातील रेल्वेचे आरक्षण वेटिंगवर असते. मात्र यंदा कोरोनामुळे अशी स्थिती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. मात्र परीक्षेनंतर निश्चितच रेल्वेचे आरक्षण वेटिंगवर जाईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मुंबई, पुण्याला जाण्यासाठी वेटिंग

सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) भारतीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), बँका, रेल्वे व अन्य विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील भरतीसाठीच्या परीक्षा चालू आहेत. शिवाय कामानिमित्त सोलापूर विभागातून मुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या अधिक दिसून येत आहे. कोरोनामुळे रेल्वेत आरक्षित तिकीट असणाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे कधी कधी मुंबई, पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना वेटिंगचा सामना करावा लागत आहे.

 

कोरोनामुळे सध्या विशेष एक्स्प्रेस धावतात. रेल्वेची प्रवासी सेवा रूळावर येत आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या सर्व नियमांच्या अधीन राहून रेल्वे प्रशासन काम करीत आहे. कोरोनाची स्थिती पाहता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या समाधानकारक आहे. रेल्वेला हवे तेवढे प्रवासी मिळत आहेत.

-प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर मंडल

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेreservationआरक्षणcentral railwayमध्य रेल्वे