शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

बालमृत्यू आणि माता मृत्यू रोखण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने आखला 'ॲक्शन प्लॅन'

By appasaheb.patil | Updated: September 23, 2022 17:47 IST

लोकमत न्युज नेटवर्क

सोलापूर - बालविवाह निर्मुलन हा बाल मृत्यू आणि माता मृत्यू रोखण्यासाठी महत्वाचा घटक असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्राथमिक शिक्षण विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मुलन प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा (TOT) आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी सीईओ स्वामी बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, सुधा साळुंखे, निशित कुमार संस्थापक अध्यक्ष SBC 3,पूजा यादव कार्यक्रम प्रमुख,विकास कांबळ, जिल्हा समन्वयक (सोलापूर व लातूर),नंदू जाधव (जिल्हा समन्वयक धुळे व जलगाव),जिल्हा महिला व बाल विकास विभाग UNICEF, SBC 3, व प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.बालमृत्यू आणि मातामृत्यू ही मोठी समस्या असून या समस्येचे प्रमुख कारण बालविवाह असल्याचे सांगून सीईओ स्वामी म्हणाले, बालवयात लग्न झालेल्या मुलींचे गर्भाशय विकसित झालेले नसल्याने तीच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. सोलापूर जिल्हा परिषदेने या अगोदरच जिवनाची हमी बालमृत्यू कमी हे अभियान सुरू केले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात या अभियानाचे चांगले काम सुरू आहे. तसेच नुकतेच दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान जाहीर केले आहे. 

कोविड काळातही सोलापूर जिल्हा परिषदेने *माझे मुल माझी जबाबदारी* या उपक्रमाची अंमलबजावणी करुन कित्येक दुर्धर आजाराने ग्रस्त मुलांचा शोध घेतला व योग्य वेळी त्यांच्यावर उपचार करून त्या बालकांना जिवदान दिले आहे.

या सर्व अभियानाच्या पार्श्वभूमीवर बालविवाह निर्मुलन प्रशिक्षण युनिसेफ व प्राथमिक शिक्षण विभागाने आयोजित केले त्यामुळे या दोन्ही अभियानास पुरक असा हा उपक्रम असून युनिसेफ आणि प्राथमिक शिक्षण विभागाचे मी अभिनंदन करत असल्याचे सांगितले. प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षक जिल्हाभरात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करतील व सोलापूर जिल्ह्यात लवकरच बालविवाह निर्मुलन होईल. यावेळी सर्वांना बालविवाह निर्मुलनाची शपथ देण्यात आली.

या प्रशिक्षणात परिचय, प्रशिक्षण प्रवाह,  महाराष्ट्रातील बाल विवाहाची स्थिती किती, कुठे व परिणाम, बाल विवाहाच्या विविध स्तरावर काय करायचे ? सक्षम नियोजन, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम व बाल न्याय अधिनियम यांची सांगड, बालविवाहाची नोंदणी, बाल विवाह पूर्व, बाल विवाह घडत असताना, बाल विवाह झाल्यानंतर माहिती, सक्षम - बाल विवाह निर्मूलन प्रशिक्षण अहवाल आदी मुद्दयांवर चर्चा करणेत आली. 

 “सायकली” मुळे तीन हजार मुली

शाळेकडे वळल्या - सीईओ स्वामी ………………सोलापूर जिल्हा परिषदेचा *सायकल बॅंक* उपक्रमही बालविवाह निर्मुलनामध्ये उपयोगी ठरत आहे. केवळ सायकल नसल्यामुळे मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण वाढत चालले होते. मुलींनी शाळा सोडल्यानंतर त्यामधील काहींचे बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती समजली. हे थांबविण्यासाठी लोकसहभागातून मुलींसाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत सायकल बॅंक स्थापन करण्यात आली. आजपर्यंत सुमारे तीन हजार सायकली लोकसहभागातून जमा झाल्या असून तीन हजार मुली शिक्षणाकडे पुन्हा वळल्या असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. मुलींच्या शिक्षणासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी पुढे यावे असे आवाहन केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद