शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Solapur: यंदा फेब्रुवारीमध्येच संपले ऊस क्षेत्र; आतापर्यंत २५ कारखाने झाले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 14:13 IST

Solapur: राज्यातील इतर जिल्ह्यांचा साखर हंगाम वेगात सुरू असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र कारखान्यांचे पट्टे पडू लागले आहेत. राज्यात सर्वाधिक गाळप हंगाम सुरू झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३७ पैकी २५ पेक्षा अधिक कारखाने बंद झाले

- अरुण बारसकरसोलापूर : राज्यातील इतर जिल्ह्यांचा साखर हंगाम वेगात सुरू असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र कारखान्यांचे पट्टे पडू लागले आहेत. राज्यात सर्वाधिक गाळप हंगाम सुरू झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३७ पैकी २५ पेक्षा अधिक कारखाने बंद झाले, तर नऊ कारखाने चार-पाच दिवसांत बंद होतील, असे सांगण्यात आले.

राज्यात यंदा आतापर्यंतचा उच्चांक पार करीत २०४, तर सोलापूर जिल्ह्यात ३७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. सोलापूर जिल्ह्याने सोलापूरचाच विक्रम मोडीत काढला आहे. मागील वर्षी राज्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३३ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यात यावर्षी वाढ होत संख्या ३७ इतकी झाली आहे.

यंदा उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने गाळप हंगाम सुरू करताना अडचणी आल्या होत्या. काही जिल्ह्यांत १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू झाले, मात्र सोलापूर जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी पावसाच्या पाण्याचा अडथळा होता. त्यामुळे ऑक्टोबर अखेर व नोव्हेंबरचा पहिला आठवडा कारखाने सुरू होण्यास लागला. उशिरा कारखाने सुरू होऊनही सोलापूर जिल्ह्यात ऊस शिल्लक राहिला नसल्याने जानेवारी महिन्यात एक कारखाना बंद करावा लागला. २७ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील २५ साखर कारखाने बंद झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांतील कारखाने मात्र सुरू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या अहवालावरून दिसत आहे. १५ मार्चपर्यंत सर्वच कारखान्यांचा पट्टा पडेल असे दिसते.

मागील वर्षी उसाचा एकरी उतारा सरासरी ४५ ते ४० टन इतका होता. यंदा वजनात मोठी घट झाली आहे. एकरी २० ते २२ टन इतकाच उतारा पडला आहे. उतारा कमी पडल्याने शेतकऱ्यांचे व गाळप हंगाम लवकर आटोपल्याने कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. किमान १५० दिवस पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू राहिले पाहिजेत.- महेश देशमुख, चेअरमन, लोकमंगल ॲग्रो बीबीदारफळ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSolapurसोलापूर