शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

Solapur: यंदा फेब्रुवारीमध्येच संपले ऊस क्षेत्र; आतापर्यंत २५ कारखाने झाले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 14:13 IST

Solapur: राज्यातील इतर जिल्ह्यांचा साखर हंगाम वेगात सुरू असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र कारखान्यांचे पट्टे पडू लागले आहेत. राज्यात सर्वाधिक गाळप हंगाम सुरू झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३७ पैकी २५ पेक्षा अधिक कारखाने बंद झाले

- अरुण बारसकरसोलापूर : राज्यातील इतर जिल्ह्यांचा साखर हंगाम वेगात सुरू असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र कारखान्यांचे पट्टे पडू लागले आहेत. राज्यात सर्वाधिक गाळप हंगाम सुरू झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३७ पैकी २५ पेक्षा अधिक कारखाने बंद झाले, तर नऊ कारखाने चार-पाच दिवसांत बंद होतील, असे सांगण्यात आले.

राज्यात यंदा आतापर्यंतचा उच्चांक पार करीत २०४, तर सोलापूर जिल्ह्यात ३७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. सोलापूर जिल्ह्याने सोलापूरचाच विक्रम मोडीत काढला आहे. मागील वर्षी राज्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३३ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यात यावर्षी वाढ होत संख्या ३७ इतकी झाली आहे.

यंदा उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने गाळप हंगाम सुरू करताना अडचणी आल्या होत्या. काही जिल्ह्यांत १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू झाले, मात्र सोलापूर जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी पावसाच्या पाण्याचा अडथळा होता. त्यामुळे ऑक्टोबर अखेर व नोव्हेंबरचा पहिला आठवडा कारखाने सुरू होण्यास लागला. उशिरा कारखाने सुरू होऊनही सोलापूर जिल्ह्यात ऊस शिल्लक राहिला नसल्याने जानेवारी महिन्यात एक कारखाना बंद करावा लागला. २७ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील २५ साखर कारखाने बंद झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांतील कारखाने मात्र सुरू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या अहवालावरून दिसत आहे. १५ मार्चपर्यंत सर्वच कारखान्यांचा पट्टा पडेल असे दिसते.

मागील वर्षी उसाचा एकरी उतारा सरासरी ४५ ते ४० टन इतका होता. यंदा वजनात मोठी घट झाली आहे. एकरी २० ते २२ टन इतकाच उतारा पडला आहे. उतारा कमी पडल्याने शेतकऱ्यांचे व गाळप हंगाम लवकर आटोपल्याने कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. किमान १५० दिवस पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू राहिले पाहिजेत.- महेश देशमुख, चेअरमन, लोकमंगल ॲग्रो बीबीदारफळ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSolapurसोलापूर