शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सोलापूर रेल्वे विभागात १० हजार प्रवाशांसाठी  केवळ २२० पोलीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 10:51 IST

सोलापूर : प्रवाशांची वाढती संख्या, असुरक्षितता आणि गुन्ह्यांचे प्रमाण यावर नियंत्रण आणण्यासाठी इतर राज्यांच्या तुलनेत सोलापूर विभागाला लोहमार्ग पोलिसांचे मनुष्यबळ पुरवण्याची मागणी विभागीय व्यवस्थापकांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे.वाडी-मनमाड आणि लातूर-मिरज या ९४८ कि़मी़च्या क्षेत्रफळातून दररोज किमान १० हजार प्रवासी प्रवास करतात़ या प्रवाशांसाठी लोहमार्ग पोलिसांची  संख्या अवघी २२० इतकी ...

ठळक मुद्देसोलापूर विभागात लोहमार्ग पोलिसांची संख्या ही अपुरीच ४५ ते ५० प्रवाशांमागे एक पोलीस कर्मचारीदररोज किमान १० हजार प्रवासी प्रवास करतात़

सोलापूर : प्रवाशांची वाढती संख्या, असुरक्षितता आणि गुन्ह्यांचे प्रमाण यावर नियंत्रण आणण्यासाठी इतर राज्यांच्या तुलनेत सोलापूर विभागाला लोहमार्ग पोलिसांचे मनुष्यबळ पुरवण्याची मागणी विभागीय व्यवस्थापकांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

वाडी-मनमाड आणि लातूर-मिरज या ९४८ कि़मी़च्या क्षेत्रफळातून दररोज किमान १० हजार प्रवासी प्रवास करतात़ या प्रवाशांसाठी लोहमार्ग पोलिसांची  संख्या अवघी २२० इतकी आहे़ अर्थात ४५-५० प्रवाशांमागे एक लोहमार्ग पोलीस असल्याची खंत विभागीय व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे

रेल्वेचे जाळे पश्चिम महाराष्ट्रात मोठे आहे विभागात लातूर, उस्मानाबाद, मिरज, पंढरपूर, कुर्डूवाडी, सोलापूर, पुणे मार्गावरुन दररोज किमान ४५ रेल्वे गाड्या सोलापूर स्थानकावर येतात, थांबतात आणि जातात़ रेल्वेतील अलीकडे गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता             आहे ते मनुष्यबळ अत्यल्प असल्याचे विभागीय व्यवस्थापकांचे मत आहे.

सोलापूर विभागात लोहमार्ग पोलिसांची एकूण संख्या ही २२० आहे़ याचे प्रमाण काढले असता ४५ ते ५० प्रवाशांमागे एक पोलीस कर्मचारी ठरतो़ यापैकी सर्वच  पोलीस हे रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी नाहीत़ यापैकी १/४ अंश पोलीस हे कार्यालयीन  कामकाज, न्यायालयीन कामकाज आणि इतर कामात गुंतलेले असतात़ 

अशी आहे वस्तुस्थिती- दानापूर (बिहार) - १२००- भोपाळ (मध्यप्रदेश) - ५१०- सिकंदराबाद (तेलंगणा) - ४५५- झाशी (उत्तर प्रदेश) - ४४५- सोलापूर (महाराष्ट्र) - २२०

रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्यात आघाडीवर असलेल्या प्रमुख राज्यांच्या तुलनेत सोलापूर विभागात लोहमार्ग पोलिसांची संख्या सर्वात खाली आहे़ प्रवाशांची असुरक्षितता, वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इतर राज्यांच्या तुलनेत पोलिसांचे पुरेसे बल मिळणे अपेक्षित आहे़ त्यादृष्टीने पोलीस महासंचालकांकडे मागील महिन्यात पत्रव्यवहार करून त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला आहे़- हितेंद्र मल्होत्रा, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, सोलापूर 

प्रवाशांच्या तुलनेत सोलापूर विभागात लोहमार्ग पोलिसांची संख्या ही अपुरीच असेल़ हे मनुष्यबळ इतक्यात लगेच पुरवणे शक्य नाही़ विभागीय व्यवस्थापकांकडून पत्रव्यवहाराद्वारे तसा प्रस्ताव आलाय का ते पाहून घेऊ.सर्व तांत्रिक अडचणीच्या अभ्यासाअंती मनुष्यबळ पुरवणे शक्य होणार आहे़ - जयजित सिंग अतिरिक्त पोलीस महासंचालक 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेPoliceपोलिसRailway Passengerरेल्वे प्रवासी