शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Solapur Politics; भक्तांचा आग्रह, ‘तुम्ही निवडणुकीत उतरा’,महाराज म्हणाले, ‘विचार करून निर्णय घेतो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 13:04 IST

सोलापूर : भक्तांनी डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांना आग्रह केला, महाराज राजकारण स्वच्छ होण्यासाठी देशाची गरज म्हणून तुम्ही लोकसभेला उभे ...

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीसंदर्भात भक्तांचा कानोसा घेण्यासाठी शेळगी येथील शिवदासमय मंगल कार्यालयात बैठक गुरूबंधू व मालक यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला मला वेळ द्या - डॉ. जयसिद्धेश्वर महाराज

सोलापूर : भक्तांनी डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांना आग्रह केला, महाराज राजकारण स्वच्छ होण्यासाठी देशाची गरज म्हणून तुम्ही लोकसभेला उभे राहा. त्यावर डॉ. जयसिद्धेश्वर महाराज म्हणाले, भक्तांचा आग्रह मला मान्य आहे, पण गुरूबंधू व मालक यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला मला वेळ द्या. 

लोकसभा निवडणुकीसंदर्भात भक्तांचा कानोसा घेण्यासाठी रविवारी सायंकाळी शेळगी येथील शिवदासमय मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भक्तांबरोबरच पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसिंग मेंगजी, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख पुरूषोत्तम बरडे, महापालिकेचे सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक विनायक वीटकर, शिवानंद पाटील, अमर पुदाले आदी उपस्थित होते.

सुरूवातीला पालकमंत्री देशमुख यांनी बैठक आयोजनामागचा हेतू विशद केला. लोकसभा निवडणूक आता केव्हाही जाहीर होऊ शकते. गेले आठवडाभर सोलापूर लोकसभेसाठी कोण याची चर्चा सुरू आहे. मंगळवारी महास्वामींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून दिली. त्यांच्यात काय चर्चा झाली हे माहीत नाही. पण त्यानंतर महास्वामींनी गुरूबंधू व सहकाºयांची चर्चा करून निर्णय देतो असे सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर भक्तांचा कानोसा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे सांगितले. 

यावेळी बोलताना बसवराज ईश्वरकट्टी यांनी देशावर येणारी संकटे पाहता महास्वामींनी सुदर्शन चक्र उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जंगम समाजाचे अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर, शरणबसप्पा केंगनाळकर, अक्कलकोटचे एम. बी. पाटील यांनी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होऊ शकतात तर महास्वामींनी का निवडणूक लढवू नये असे मत मांडले. सभागृहनेते कोळी, नगरसेवक वीटकर, माजी नगरसेवक अनंत जाधव, बिज्जू प्रधाने यांनी मते मांडली. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बरडे यांनी भक्तांचा आग्रह असल्याने महाराजांनी नाराज करू नये असे सांगितले. 

महाराजांनी राजकारणात पडू नये- गलिच्छ राजकारणात महाराजांनी पडू नये असे मत गौरव जक्कापुरे यांनी मांडले. डॉ. शिवाचार्य महाराज यांचे ष. ब्र. हे पद खूप मोठे आहे, त्याची खासदारकीशी तुलना होऊ शकत नाही. यावर अक्कलकोटचे धानय्या स्वामी म्हणाले, धर्मशास्त्रात सन्याशाला योग्यवेळी कोणता रोल करावा याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. महास्वामींसारखे तपस्वी राजकारणात उतरले तर सामान्य लोकांचे कल्याण आहे.

खासदार चांगले पण संपर्क कमी- सोलापूरचे सध्याचे खासदार चांगले आहेत पण त्यांचा जनसंपर्क कमी आहे. त्यामुळे खासदार बदलण्याची चर्चा मार्च २0१८ पासून सुरू झाल्याचे माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी सांगितले. महास्वामींनी लोकसभा लढविली तर राजकारण स्वच्छ होईल. त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यापासून विरोधकांचे टेन्शन वाढले आहे. त्यावर डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांनी सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या मताला सहमती देत, मला यावर निर्णय घेण्यास काही दिवस आणि वेळ द्या. माझ्या गुरूबंधूशी यावर चर्चा करेन. कोणाच्याही बाबतीत नकारात्मक चर्चा करू नका असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

‘लोकमत’च्या झेरॉक्स प्रती- या बैठकीत लोकमतच्या हॅलो सोलापूरमध्ये ८ फेब्रुवारी रोजी भाजपच्या उमेदवारासंदर्भात आलेल्या  वृत्ताच्या छायांकित प्रती वाटण्यात आल्या. त्यामध्ये डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे नाव चर्चेत असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे या बैठकीत हा विषय चर्चेचा ठरला. अनेकांनी हे कात्रण वाचून जवळ ठेवले. 

टॅग्स :Solapurसोलापूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखBJPभाजपाPoliticsराजकारण