शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

सोलापूर बाजारभाव; पावसाने ओढ दिल्याने भाज्यांची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:29 IST

दरात वाढ : सफरचंद, केळी आवक वाढली

ठळक मुद्दे साबुदाणा, भगर, चिक्कू, सफरचंद, केळासह उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढलीदुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाला आणि फळांची आवक मोठ्या प्रमाणात घटली

सोलापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साबुदाणा, भगर, चिक्कू, सफरचंद, केळासह उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. साबुदाण्याचा दर ^५० ते ७० रुपये किलो आहे तर खजुराचा खजुराचा किलोचा ८० ते ९० रुपयांच्या जवळपास झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाला आणि फळांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.

गतवर्षी खजुराचा दर ६० रुपयांपासून ते ६५ रुपये होता. तो यावर्षी ९० ते ९० रुपयांच्या घरात गेला आहे. केळीच्या भावातही २० टक्के भाववाढ झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर सुमारे ३० ते ४० टक्क्यांच्या आसपास वाढले आहेत. 

कोथिंबीर पेंढीचा दर हा २५ ते ३० रुपये असा आहे. बटाटे आणि वांगे या भाज्यांचे दर ४० ते ५० रुपये किलो झाले आहेत. महिन्यापूर्वी हेच दर १० ते २० रुपये किलो होते. नवरात्रोत्सवात फळांना ग्राहकांची जास्त मागणी जास्त होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिक्कूचा प्रतिकिलो दर ३० ते ४० रुपयांचा दर या आठवड्यात ५० रुपयांच्या घरात गेला आहे. सफरचंदची आवकड वाढल्याने दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलो, मोसंबीचे ६० रुपये किलो, डाळींब ४० रुपयाला किलो असे भाव आहेत.

कांदा, बटाटा आवक घटली...पावसाने ओढ दिल्याने कांदा, बटाटा, वांग्यांसह पालेभाज्यांची आवड घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी असलेल्या दरापेक्षा ५० टक्के दर सध्या भाज्यांचे वाढलेले आहेत. विशेषत: कांदा, बटाटा आणि वांगे या तीन भाज्या अधिक महाग झाल्या आहेत.

फुलांचे भावझेंडू - ४०-५० रुपये किलोशेवंती  - १५० रुपये किलोगुलाब - ९० रुपये किलो

नवरात्रोत्सवात भाज्या, फळे आणि फुलांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. नेहमी पडणारा परतीचा पाऊस शहर आणि जिल्ह्यात न पडल्यामुळे भाज्या आणि फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी या वस्तूंचे दर वाढले आहेत.- श्रीशैल घुली,भाजी आणि फूल विक्रेते.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारfruitsफळेagricultureशेतीFarmerशेतकरी