शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

काँग्रेसच्या काळात सर्वसामान्यांची नव्हे तर कार्यकर्ते, चेलेचपाटे, चमच्यांची गरिबी हटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 10:21 IST

केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर टिका

ठळक मुद्दे- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी याच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळावा- मी विधान परिषदेत होतो तेव्हा शिंदे आणि देशमुखांना पाहून म्हणायचो की, एक हसमुख आणि दुसरे देशमुख. दोघांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला - गडकरी

सोलापूर : पंडित जवाहरलाल नेहरू ते राहुल गांधी यांच्यापर्यंत सर्वांनी गरिबी हटावचा नारा दिला, पण काँग्रेसच्या काळात सर्वसामान्य माणसांची नव्हे तर कार्यकर्ते, नेते, चेलेचपाटे आणि चमच्यांची गरिबी हटली. त्याबद्दल काँग्रेसला दाद द्यावी लागेल, अशी टीका केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी पार्क स्टेडियमवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. 

यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार विकास महात्मे, महापौर शोभा बनशेट्टी, डॉ. जयसिद्धेश्वर, आमदार प्रशांत परिचारक, अविनाश महागावकर, शिवसेना नेते शिवाजी सावंत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, प्रा. अशोक निंबर्गी, नरसिंग मेंगजी, इंद्रजित पवार, श्रीमंत बंडगर, शिवशरण पाटील आदी उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, काँग्रेसच्या काळात गरिबी हटली नाही. पण काँग्रेसच्या काळात कोणाला मेडिकल कॉलेज, कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज, कोणाला डी.एड. कॉलेज मिळालं. या कॉलेजला प्रवेश देण्यासाठी त्यांनी पैसे वसूल केले. कोणाला प्राथमिक शाळा मिळाली. शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही आणि गावोगावी काँग्रेस-राष्ट्रवादीची रोजगार हमी, अशी परिस्थिती राहिली. गडकरी म्हणाले की, मी विधान परिषदेत होतो तेव्हा शिंदे आणि देशमुखांना पाहून म्हणायचो की, एक हसमुख आणि दुसरे देशमुख. दोघांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला. काँग्रेसला ६० वर्षे देश चालविण्याची संधी मिळाली, पण त्यांनी देशाची बेइमानी आणि विश्वासघात केला. याच काँग्रेस पक्षाने ७० हजार कोटी रुपयांची विमानं खरेदी केली, पण विदर्भातील, सोलापुरातील शेतकºयांच्या पाण्याच्या योजना पूर्ण केल्या नाहीत. 

दोन्ही काँग्रेसची मुलं मांडीवर खेळायला लागली - सोलापूर जिल्ह्यातील टेंभू-म्हैसाळ योजनेचा उल्लेख करून गडकरी म्हणाले, काँग्रेस सरकारने १० टक्के ठेकेदारांकडून अ‍ॅडव्हान्स घेऊन सिंचनाची कंत्राटं दिली. १५ वर्षांनंतर टेंभू-म्हैसाळची योजना बंद पडली होती. लोखंडाच्या पाईपला गंज चढला होता. कंत्राटदार पळून गेले होते. पाप काँग्रेस-राष्ट्रवादीचं. लग्न यांनी केलं. मुलं यांना झाली. हे पळून गेले आणि त्यांची मुलं देवेंद्रच्या मांडीवर बाबा बाबा म्हणून खेळायला लागली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या मुलांना रोजगार कसा मिळेल, अशी चिंता आहे. 

सोलापुरात हवेतून जाणारी बस येऊ शकते- गडकरी म्हणाले, नागपूरमध्ये हवेतून चाललेल्या बस आणल्या आहेत. रोप-वे, केबल कार यांसारख्या २८ कंपन्या यासाठी संयुक्तपणे काम करतात. या बसमध्ये २६० लोक बसू शकतात. सोलापूर महापालिकेने यासंदर्भात ठराव करावा. महापौरांनी यासंदर्भात आमदार, नगरसेवक यांना माहिती सांगावी. महापालिका निविदा न काढताही या कामाचा आराखडा तयार करू शकते. मेट्रोचे ट्रॅक टाकण्यासाठी प्रतिकिलोमीटर ३५० कोटी खर्च येतो तर हवाई बसच्या ट्रॅकसाठी प्रतिकिलोमीटर ५० कोटींपेक्षा कमी खर्च येतो, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरNitin Gadkariनितीन गडकरीcongressकाँग्रेस