शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

सोलापूर जिल्ह्यात १७०० वनराई बंधारे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 10:57 IST

लोकांचा सहभाग: एक रुपया खर्च न करता पाणी अडविण्याची मोहीम

ठळक मुद्देअनियमित पावसामुळे शेतीचे व्यवस्थापन करणे अवघडविकेंद्रीत पद्धतीने जलसाठे होण्याची आवश्यकताटंचाई परिस्थितीत वनराई बंधारे उभारण्यासाठी भर

राजकुमार सारोळे सोलापूर : जिल्ह्यात एक रुपयाही खर्च न करता ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून १७00 बंधारे बांधून पूर्ण करण्यात आल्याची माहिती झेडपीचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. 

उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथे श्रमदानातून उभारण्यात आलेल्या वनराई बंधाºयाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. झेडपी, राज्य शासनाचा कृषी विभाग, केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि पाथरी येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून बुधवारी या बंधाºयाची उभारणी केली.

या बंधाºयाची पाहणी सीईओ डॉ. भारुड यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, वित्त आणि लेखा अधिकारी महेश अवताडे, शिक्षण अधिकारी संजय राठोड, निवृत्त ग्रुप कॅप्टन प्रतापसिंह परदेशी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, गटविकास अधिकारी रंजना कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार,पाथरीच्या सरपंच अलका बंडगर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी,  नंदकुमार पाटील, सुभाष डोंगरे, नीता चलवादे, अविनाश गोडसे, सचिन जाधव आदी  उपस्थित होते.

 प्रारंभी कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर यांनी वनराई बंधारे उभारण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी बोलताना निवृत्त कॅप्टन प्रतापसिंह परदेशी यांनी राज्यातील प्रत्येक गावात वनराई बंधारे उभारण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. अनियमित पावसामुळे शेतीचे व्यवस्थापन करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत शेतीला शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी विकेंद्रीत पद्धतीने जलसाठे होण्याची आवश्यकता असून वनराई बंधारे त्यासाठी  उपयुक्त ठरतील असेही ते म्हणाले.  त्यावर सीईओ डॉ. भारुड यांनी  टंचाई परिस्थितीत वनराई बंधारे उभारण्यासाठी भर दिला जाईल, असे सांगितले.

बंधाºयाचे उद्दिष्ट- झेडपीचा एक पैसा खर्च न करता केवळ टाकाऊ सिमेंटच्या पोत्यापासून हे बंधारे साकारण्यात येत आहेत. जिल्ह्यात प्रत्येक गावाशेजारच्या ओढ्यावर पाच याप्रमाणे ५७00 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. १७00 बंधारे बांधून पूर्ण असून, येत्या काही दिवसात उर्वरित बंधारे पूर्ण करून घेतले जाणार आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदFarmerशेतकरीWaterपाणी