शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सोलापूर जिल्ह्यात १७०० वनराई बंधारे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 10:57 IST

लोकांचा सहभाग: एक रुपया खर्च न करता पाणी अडविण्याची मोहीम

ठळक मुद्देअनियमित पावसामुळे शेतीचे व्यवस्थापन करणे अवघडविकेंद्रीत पद्धतीने जलसाठे होण्याची आवश्यकताटंचाई परिस्थितीत वनराई बंधारे उभारण्यासाठी भर

राजकुमार सारोळे सोलापूर : जिल्ह्यात एक रुपयाही खर्च न करता ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून १७00 बंधारे बांधून पूर्ण करण्यात आल्याची माहिती झेडपीचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. 

उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथे श्रमदानातून उभारण्यात आलेल्या वनराई बंधाºयाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. झेडपी, राज्य शासनाचा कृषी विभाग, केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि पाथरी येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून बुधवारी या बंधाºयाची उभारणी केली.

या बंधाºयाची पाहणी सीईओ डॉ. भारुड यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, वित्त आणि लेखा अधिकारी महेश अवताडे, शिक्षण अधिकारी संजय राठोड, निवृत्त ग्रुप कॅप्टन प्रतापसिंह परदेशी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, गटविकास अधिकारी रंजना कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार,पाथरीच्या सरपंच अलका बंडगर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी,  नंदकुमार पाटील, सुभाष डोंगरे, नीता चलवादे, अविनाश गोडसे, सचिन जाधव आदी  उपस्थित होते.

 प्रारंभी कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर यांनी वनराई बंधारे उभारण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी बोलताना निवृत्त कॅप्टन प्रतापसिंह परदेशी यांनी राज्यातील प्रत्येक गावात वनराई बंधारे उभारण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. अनियमित पावसामुळे शेतीचे व्यवस्थापन करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत शेतीला शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी विकेंद्रीत पद्धतीने जलसाठे होण्याची आवश्यकता असून वनराई बंधारे त्यासाठी  उपयुक्त ठरतील असेही ते म्हणाले.  त्यावर सीईओ डॉ. भारुड यांनी  टंचाई परिस्थितीत वनराई बंधारे उभारण्यासाठी भर दिला जाईल, असे सांगितले.

बंधाºयाचे उद्दिष्ट- झेडपीचा एक पैसा खर्च न करता केवळ टाकाऊ सिमेंटच्या पोत्यापासून हे बंधारे साकारण्यात येत आहेत. जिल्ह्यात प्रत्येक गावाशेजारच्या ओढ्यावर पाच याप्रमाणे ५७00 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. १७00 बंधारे बांधून पूर्ण असून, येत्या काही दिवसात उर्वरित बंधारे पूर्ण करून घेतले जाणार आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदFarmerशेतकरीWaterपाणी